शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव आगाराची सात शहरांवर मदार, दररोज दोन लाखांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:22 IST

पुरूषोत्तम करवा माजलगाव : येथील आगारातून ग्रामीण भागातील फेऱ्या कमी झाल्या आहेत. शहरी भागातील चालणाऱ्या बसमुळे उत्पन्नात वाढ ...

पुरूषोत्तम करवा

माजलगाव : येथील आगारातून ग्रामीण भागातील फेऱ्या कमी झाल्या आहेत. शहरी भागातील चालणाऱ्या बसमुळे उत्पन्नात वाढ झाली असली तरी केवळ सात शहरांवर आगाराची मदार असून, ग्रामीण भागातील बसमधून केवळ विद्यार्थीच प्रवास करत आहेत. त्यामुळे सध्या हे आगार दररोज दोन लाख रुपये तोट्यात चालले आहे.

माजलगाव आगाराचे कोरोनापूर्वी उत्पन्न चांगले होते. लॉकडाऊननंतर या आगारातून केवळ शहरी भागात बस सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला या बस रिकाम्या धावत होत्या. त्यानंतर थोड्या फार प्रमाणात प्रवासी वाढू लागले. या आगारातून मोठ्या प्रमाणावर लांब पल्ल्याच्या बस सुरू असून, यात कोल्हापूर, नांदेड, मुंबई, लातूर, सोलापूर, मेहकर व बुलडाणा या सात ठिकाणी जाणाऱ्या बसचे उत्पन्न आगाराच्या ६५-७० टक्के एवढे आहे. यामुळे या आगाराची सात शहरांवर मदार असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. येथून जाणाऱ्या बस पूर्वी २० हजार किलोमीटर चालत असत. परंतु आता महिन्याला केवळ १७ हजार किलोमीटर चालतात.

या आगाराचा सध्या दररोजचा खर्च ६ लाख ५० हजार रुपये असून, उत्पन्न केवळ ४ लाख ५० हजार मिळत आहे. यापैकी ३ लाख रुपये उत्पन्न सात शहरांतून मिळते. यामुळे सध्या हे आगार दररोज दोन लाख रुपयांनी तोट्यात चालले आहे. सध्या या आगारातून चालणाऱ्या निमआराम, शिवशाही, स्लीपर कोच या बस मोठ्या प्रमाणावर तोट्यात दिसून येत आहेत. रातराणी बस फायद्यात चालत असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली.

माजलगाव आगारातून ग्रामीण भागात ९० टक्के बस सेवा सुरू करण्यात आली असली तरी या बसकडे प्रवासी पाठ फिरवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या बसमध्ये केवळ विद्यार्थीच येत आहेत. सध्या या आगारातून एक हजार विद्यार्थ्यांना पास वाटप करण्यात आले असले तरी आणखी तीन हजार विद्यार्थी पासपासून दूर आहेत.

या आगारातून लातूरला प्रत्येक तासाला बस जात आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत प्रत्येक तासाला लातूरला जाण्यासाठी बस उपलब्ध असून, येण्यासाठी १० वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत बस सुरू आहेत. लातूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी जास्त फेऱ्या चालू असल्याची माहिती आगार प्रमुख दत्तात्रय काळमपाटील यांनी दिली.