शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

माजलगाव धरण साठ्यात १२ तासांत दीड मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:38 IST

माजलगाव : माजलगाव धरणाच्या वरील भागातील गावांमध्ये शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात रविवारी पहाटेपासून मोठी आवक सुरू ...

माजलगाव : माजलगाव धरणाच्या वरील भागातील गावांमध्ये शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात रविवारी पहाटेपासून मोठी आवक सुरू आहे. १२ तासात दीड मीटर पाणी धरणात आले.

आता या धरणातून केव्हाही पाणी सोडण्यात येऊ शकते. यामुळे प्रशासनाने सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी माजलगाव धरणात १८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मान्सूनपूर्व पावसामुळे धरणात २-३ टक्के पाणीसाठा वाढला होता. ३१ ऑगस्ट रोजी धरण परिसरात चांगला पाऊस झाल्यानंतर पाणी पातळी ३५ टक्क्यांपर्यंत गेली होती. शनिवारी रात्री व रविवारी पहाटे शिरूर, आष्टी, पाटोदा आदी भागांत जोरदार पाऊस झाल्याने सिंदफणा नदीतून धरणात रविवारी सकाळी पाण्याची ८२ हजार क्युसेकने मोठी आवक सुरू झाली होती.

शनिवारी रात्री धरणात ६० टक्के पाणी उपलब्ध होते. त्यात रात्रीतून वाढ होऊन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत धरणात ९० टक्के पाणी झाले होते. हे धरण भरण्यासाठी ४३१.८० मीटर एवढी पाणी पातळी आवश्यक आहे. धरणात ४३१.३७ मीटरइतके पाणी आले. धरणात सध्या ४२०.९० दलघमी एकूण पाणीसाठा असून २७८.९० दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरण रात्री उशिरापर्यंत भरण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती धरणाचे अभियंता बी. आर. शेख यांनी दिली.

पाणीप्रश्न सुटणार

मागील बारा तासांत या धरणात जवळपास दीड मीटर पाणी आले, तर तीस टक्के पाणीसाठा वाढला होता. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. हे धरण भरत आल्याने बीड व माजलगाव शहरासह अनेक खेड्यांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.

सतर्कतेचा इशारा

माजलगाव धरण आता केव्हाही भरू शकते. यामुळे प्रशासनाने सिंदफणा नदीकाठच्या गावांना लेखी व दौंडी द्वारे सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात कोणीही व्यक्ती व जनावरांसह थांबू नये असा इशारा येथील तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिला आहे.

050921\purusttam karva_img-20210831-wa0029_14.jpg