शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

माजलगाव धरण साठ्यात १२ तासांत दीड मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:38 IST

माजलगाव : माजलगाव धरणाच्या वरील भागातील गावांमध्ये शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात रविवारी पहाटेपासून मोठी आवक सुरू ...

माजलगाव : माजलगाव धरणाच्या वरील भागातील गावांमध्ये शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात रविवारी पहाटेपासून मोठी आवक सुरू आहे. १२ तासात दीड मीटर पाणी धरणात आले.

आता या धरणातून केव्हाही पाणी सोडण्यात येऊ शकते. यामुळे प्रशासनाने सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी माजलगाव धरणात १८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मान्सूनपूर्व पावसामुळे धरणात २-३ टक्के पाणीसाठा वाढला होता. ३१ ऑगस्ट रोजी धरण परिसरात चांगला पाऊस झाल्यानंतर पाणी पातळी ३५ टक्क्यांपर्यंत गेली होती. शनिवारी रात्री व रविवारी पहाटे शिरूर, आष्टी, पाटोदा आदी भागांत जोरदार पाऊस झाल्याने सिंदफणा नदीतून धरणात रविवारी सकाळी पाण्याची ८२ हजार क्युसेकने मोठी आवक सुरू झाली होती.

शनिवारी रात्री धरणात ६० टक्के पाणी उपलब्ध होते. त्यात रात्रीतून वाढ होऊन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत धरणात ९० टक्के पाणी झाले होते. हे धरण भरण्यासाठी ४३१.८० मीटर एवढी पाणी पातळी आवश्यक आहे. धरणात ४३१.३७ मीटरइतके पाणी आले. धरणात सध्या ४२०.९० दलघमी एकूण पाणीसाठा असून २७८.९० दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरण रात्री उशिरापर्यंत भरण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती धरणाचे अभियंता बी. आर. शेख यांनी दिली.

पाणीप्रश्न सुटणार

मागील बारा तासांत या धरणात जवळपास दीड मीटर पाणी आले, तर तीस टक्के पाणीसाठा वाढला होता. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. हे धरण भरत आल्याने बीड व माजलगाव शहरासह अनेक खेड्यांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.

सतर्कतेचा इशारा

माजलगाव धरण आता केव्हाही भरू शकते. यामुळे प्रशासनाने सिंदफणा नदीकाठच्या गावांना लेखी व दौंडी द्वारे सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात कोणीही व्यक्ती व जनावरांसह थांबू नये असा इशारा येथील तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिला आहे.

050921\purusttam karva_img-20210831-wa0029_14.jpg