शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

माजलगाव दणाणले ; शेतक-यांच्या प्रश्नासाठी सेनेचा तहसीलवर बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:47 IST

माजलगाव तालुका सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत विकसनशील आहे. त्यामुळे या ठिकाणी ऊसाचे मोठे उत्पादन आहे. मात्र येथील कारखान्यांनी शेतकºयांच्या हिताच्या २६५ जातीच्या ऊसाची नोंद घेणे बंद केले आहे. ते तात्काळ सुरू करावेत, अन्यथा तीनही कारखान्याचे धुरांडे शिवसेना बंद पाडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बुधवारी दिला.

ठळक मुद्दे..अन्यथा कारखाने बंद पाडू : शिवसेना

माजलगाव : माजलगाव तालुका सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत विकसनशील आहे. त्यामुळे या ठिकाणी ऊसाचे मोठे उत्पादन आहे. मात्र येथील कारखान्यांनी शेतकºयांच्या हिताच्या २६५ जातीच्या ऊसाची नोंद घेणे बंद केले आहे. ते तात्काळ सुरू करावेत, अन्यथा तीनही कारखान्याचे धुरांडे शिवसेना बंद पाडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बुधवारी दिला. माजलगावात काढलेल्या बैलगाडी मोर्चात ते बोलत होते.

माजलगाव शिवसेनेच्या वतीने शेतक-यांना बोंडअळीमुळे नुकसान भरपाई द्यावी, विज बील माफ करून २४ तास वीज पुरवठा करावा, २६५ जातीच्या उसाची नोंद घ्यावी, उसाला तीन हजार रूपये भाव द्यावा, शेतीमाल विक्रीसाठी लादण्यात आलेली आॅनलाईन प्रक्रिया रद्द करावी, यासारख्या विविध मागण्यासाठी तहसिल कार्यालयावर जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढला.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत नवले, उपजिल्हाप्रमुख नारायण काशिद, तालुकाप्रमुख सतिष सोळंके, आप्पासाहेब जाधव, शहर प्रमुख अशोक आळणे, युवासेनेचे तालुका अधिकारी अ‍ॅड.दत्ता रांजवण, डॉ.उध्दव नाईकनवरे, रमेश खामकर, प्रल्हाद सोळंके, विश्वनाथ नंदिकोल्हे, अमोल डाके, अनंत सोळंके, दासु पाटील बादाडे, संजय शिंदे, माऊली काशिद, विठ्ठल जाधव, सतिष बोठे, सुनिल खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत नवले, उपजिल्हाप्रमुख नारायण काशिद, तालुकाप्रमुख सतिष सोळंके यांची ही भाषणे झाली.यावेळी तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने बैलगाड्यांसह मोर्चात सहभागी झाले होते. घोषणांनी माजलगाव शहर दणाणून गेलेहोते.पहिल्यांदाच ऐतिहासिक बैलगाडी मोर्चामाजलगाव तालुक्यात शेतक-यांच्या मागण्यासाठी प्रथमच शिवसेनेच्या वतीने भव्य असा बैलगाडी मोर्चा तहसिल कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चामध्ये जवळपास २०० बैलगाडी सहभागी होत्या. त्यांची रांग ही दोन कि.मी. पर्यंत होती. परंतु शिस्त असल्यामुळे हा मोर्चा शांततेत पार पडला. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता.

शेतकरी, व्यापाºयांसाठी हेल्पलाईन - जाधवतालुक्यातील शेतकरी, व्यापारी, महिला-मुली यांच्यावर कुणी अन्याय करत असेल तर मदतीचा हात म्हणून शिवसेनेकडून हेल्पलाईन (मो.९३९३१८९५९५) सुरू करण्यात आली आहे. मदतीसाठी पाच मिनीटात शिवसैनिक किंवा मी स्वत: धावून येईल, असे आप्पासाहेब जाधव यांनी सांगीतले.

पालकमंत्री आमदारांना देणे-घेणे नाहीसचिन मुळूक म्हणाले, प्रशासन शेतक-यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री व स्थानिक आमदारांना शेतक-यांच्या प्रश्नांशी देणे-घेणे राहिलेले नाही. विधानभवनात बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकºयांच्या प्रश्नांवर शब्दही उच्चारला नाही, असे सांगितले. त्यातच तालुक्यातील बहुतांश शेतकरी ऊस उत्पादक आहेत. मागील तीन वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीत जोपासलेल्या ऊसाला कारखानदारांकडून कवडीमोल भाव देण्यात येत असून त्यात शेतक-यांच्या हिताची असलेल्या २६५ जातीच्या ऊसाची नोंद न घेण्याचे धोरण स्विकारले आहे. परंतु आपण हे धोरण कदापी सहन करणार नसून कारखान्यांनी नोंद न घेतल्यास तीनही कारखान्यांचे धुरांडे बंद पाडल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नसल्याचा इशारा मुळूक यांनी दिला.