शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव दणाणले ; शेतक-यांच्या प्रश्नासाठी सेनेचा तहसीलवर बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:47 IST

माजलगाव तालुका सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत विकसनशील आहे. त्यामुळे या ठिकाणी ऊसाचे मोठे उत्पादन आहे. मात्र येथील कारखान्यांनी शेतकºयांच्या हिताच्या २६५ जातीच्या ऊसाची नोंद घेणे बंद केले आहे. ते तात्काळ सुरू करावेत, अन्यथा तीनही कारखान्याचे धुरांडे शिवसेना बंद पाडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बुधवारी दिला.

ठळक मुद्दे..अन्यथा कारखाने बंद पाडू : शिवसेना

माजलगाव : माजलगाव तालुका सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत विकसनशील आहे. त्यामुळे या ठिकाणी ऊसाचे मोठे उत्पादन आहे. मात्र येथील कारखान्यांनी शेतकºयांच्या हिताच्या २६५ जातीच्या ऊसाची नोंद घेणे बंद केले आहे. ते तात्काळ सुरू करावेत, अन्यथा तीनही कारखान्याचे धुरांडे शिवसेना बंद पाडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बुधवारी दिला. माजलगावात काढलेल्या बैलगाडी मोर्चात ते बोलत होते.

माजलगाव शिवसेनेच्या वतीने शेतक-यांना बोंडअळीमुळे नुकसान भरपाई द्यावी, विज बील माफ करून २४ तास वीज पुरवठा करावा, २६५ जातीच्या उसाची नोंद घ्यावी, उसाला तीन हजार रूपये भाव द्यावा, शेतीमाल विक्रीसाठी लादण्यात आलेली आॅनलाईन प्रक्रिया रद्द करावी, यासारख्या विविध मागण्यासाठी तहसिल कार्यालयावर जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढला.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत नवले, उपजिल्हाप्रमुख नारायण काशिद, तालुकाप्रमुख सतिष सोळंके, आप्पासाहेब जाधव, शहर प्रमुख अशोक आळणे, युवासेनेचे तालुका अधिकारी अ‍ॅड.दत्ता रांजवण, डॉ.उध्दव नाईकनवरे, रमेश खामकर, प्रल्हाद सोळंके, विश्वनाथ नंदिकोल्हे, अमोल डाके, अनंत सोळंके, दासु पाटील बादाडे, संजय शिंदे, माऊली काशिद, विठ्ठल जाधव, सतिष बोठे, सुनिल खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत नवले, उपजिल्हाप्रमुख नारायण काशिद, तालुकाप्रमुख सतिष सोळंके यांची ही भाषणे झाली.यावेळी तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने बैलगाड्यांसह मोर्चात सहभागी झाले होते. घोषणांनी माजलगाव शहर दणाणून गेलेहोते.पहिल्यांदाच ऐतिहासिक बैलगाडी मोर्चामाजलगाव तालुक्यात शेतक-यांच्या मागण्यासाठी प्रथमच शिवसेनेच्या वतीने भव्य असा बैलगाडी मोर्चा तहसिल कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चामध्ये जवळपास २०० बैलगाडी सहभागी होत्या. त्यांची रांग ही दोन कि.मी. पर्यंत होती. परंतु शिस्त असल्यामुळे हा मोर्चा शांततेत पार पडला. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता.

शेतकरी, व्यापाºयांसाठी हेल्पलाईन - जाधवतालुक्यातील शेतकरी, व्यापारी, महिला-मुली यांच्यावर कुणी अन्याय करत असेल तर मदतीचा हात म्हणून शिवसेनेकडून हेल्पलाईन (मो.९३९३१८९५९५) सुरू करण्यात आली आहे. मदतीसाठी पाच मिनीटात शिवसैनिक किंवा मी स्वत: धावून येईल, असे आप्पासाहेब जाधव यांनी सांगीतले.

पालकमंत्री आमदारांना देणे-घेणे नाहीसचिन मुळूक म्हणाले, प्रशासन शेतक-यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री व स्थानिक आमदारांना शेतक-यांच्या प्रश्नांशी देणे-घेणे राहिलेले नाही. विधानभवनात बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकºयांच्या प्रश्नांवर शब्दही उच्चारला नाही, असे सांगितले. त्यातच तालुक्यातील बहुतांश शेतकरी ऊस उत्पादक आहेत. मागील तीन वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीत जोपासलेल्या ऊसाला कारखानदारांकडून कवडीमोल भाव देण्यात येत असून त्यात शेतक-यांच्या हिताची असलेल्या २६५ जातीच्या ऊसाची नोंद न घेण्याचे धोरण स्विकारले आहे. परंतु आपण हे धोरण कदापी सहन करणार नसून कारखान्यांनी नोंद न घेतल्यास तीनही कारखान्यांचे धुरांडे बंद पाडल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नसल्याचा इशारा मुळूक यांनी दिला.