शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
2
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
3
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
4
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
5
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
6
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
8
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
9
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
10
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
12
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
13
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
14
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
15
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
16
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
17
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
18
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
19
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

यंदा भरपूर पाऊस; पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:41 IST

बीड : जिल्ह्यातून गोदावरी नदी अनेक गावांतून वाहते. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग प्रमाणापेक्षा जास्त करण्यात आल्यानंतर जवळपास ६३ गावे ...

बीड : जिल्ह्यातून गोदावरी नदी अनेक गावांतून वाहते. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग प्रमाणापेक्षा जास्त करण्यात आल्यानंतर जवळपास ६३ गावे पुराच्या विळख्यात अडकतात. यावर्षी भरपूर पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

बीड जिल्ह्यात गोदावरी, सिंदफना, बिंदुसरा, वाण, मांजरा, सिना या प्रमुख नद्या आहेत. मात्र, सर्वाधिक पुराचा धोका हा दरवर्षी गोदावरी नदीकाठच्या गावांना असतो. त्यामुळे पूर आल्यानंतर नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येते. या कामासाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासनातील मिळून ३६ अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले असते. पुराचा संभाव्य धोका ओळखून स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना नोटीस दिली जाते. अनेक शहरात धोकादायक इमारती आहेत. त्यांच्यावर देखील कारवाई केली जाते. पूर परिस्थितीमधून नागरिकांच्या जीवितांचे रक्षण करण्यासाठी अग्निशमन दलातील जवान देखील सज्ज असतात.

दरम्यान, जिल्ह्यातील काही उपनद्यांना देखील मोठा पाऊस झाल्यानंतर पूर येतो. त्यामुळे गावखेड्यातील नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार भरपूर पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन निवारण कक्षाकडून या परिस्थितीचा सामना करण्याची तयारी करण्यात आली आहे.

...

जिल्ह्यातील प्रमुख नद्या ६

नदीशेजारील गावे ८७

पूरबाधित होणारे तालुके ४

जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान

६७० मि.मी.

...

प्रशासनाची काय तयारी?

फायर फायटर ६

रेस्क्यू व्हॅन ३

फायर बोटी २

कटर ४

लाईफ जॅकेट्‌स ३०

....

पूरबाधित क्षेत्र

जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रामध्ये तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत. नैसर्गिक आपत्ती विभागाने अशा भागांचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. त्यानंतरही पुनर्वसनासाठी पुरेशी जागा उपलब्ध करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, संभाव्य पुराचा धोका ओळखून अन्य उपाययोजना करणे देखील गरजेचे आहे.

...

अग्निशमन दल सज्ज

पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणेचीही युद्धपातळीवर मदत घेतली जाते. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये बाजार समिती व नगरपालिका मिळून अग्निशमन दलाचे कर्मचारी, अधिकारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची मदत पूरपरिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनास होते. त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आलेली असते.

....

शहरांमधील जुन्या इमारती धोकादायक

जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये जुन्या इमारतींचे सर्वेक्षण नगरपालिका व पंचायतीच्यावतीने केले जाते. मात्र, इमारती धोकादायक असताना देखील त्यावर कारवाई करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे शहरातील जुन्या व कालमर्यादा संपलेल्या इमारती कायम धोकादायक आहेत. त्यामुळे योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील गोदावरीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा वेळोवेळी स्थानिक प्रशासनाकडून दिला जातो. तसेच पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तयारी करण्यात आली आहे.

- मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड.