शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

यंदा भरपूर पाऊस; पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:41 IST

बीड : जिल्ह्यातून गोदावरी नदी अनेक गावांतून वाहते. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग प्रमाणापेक्षा जास्त करण्यात आल्यानंतर जवळपास ६३ गावे ...

बीड : जिल्ह्यातून गोदावरी नदी अनेक गावांतून वाहते. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग प्रमाणापेक्षा जास्त करण्यात आल्यानंतर जवळपास ६३ गावे पुराच्या विळख्यात अडकतात. यावर्षी भरपूर पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

बीड जिल्ह्यात गोदावरी, सिंदफना, बिंदुसरा, वाण, मांजरा, सिना या प्रमुख नद्या आहेत. मात्र, सर्वाधिक पुराचा धोका हा दरवर्षी गोदावरी नदीकाठच्या गावांना असतो. त्यामुळे पूर आल्यानंतर नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येते. या कामासाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासनातील मिळून ३६ अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले असते. पुराचा संभाव्य धोका ओळखून स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना नोटीस दिली जाते. अनेक शहरात धोकादायक इमारती आहेत. त्यांच्यावर देखील कारवाई केली जाते. पूर परिस्थितीमधून नागरिकांच्या जीवितांचे रक्षण करण्यासाठी अग्निशमन दलातील जवान देखील सज्ज असतात.

दरम्यान, जिल्ह्यातील काही उपनद्यांना देखील मोठा पाऊस झाल्यानंतर पूर येतो. त्यामुळे गावखेड्यातील नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार भरपूर पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन निवारण कक्षाकडून या परिस्थितीचा सामना करण्याची तयारी करण्यात आली आहे.

...

जिल्ह्यातील प्रमुख नद्या ६

नदीशेजारील गावे ८७

पूरबाधित होणारे तालुके ४

जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान

६७० मि.मी.

...

प्रशासनाची काय तयारी?

फायर फायटर ६

रेस्क्यू व्हॅन ३

फायर बोटी २

कटर ४

लाईफ जॅकेट्‌स ३०

....

पूरबाधित क्षेत्र

जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रामध्ये तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत. नैसर्गिक आपत्ती विभागाने अशा भागांचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. त्यानंतरही पुनर्वसनासाठी पुरेशी जागा उपलब्ध करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, संभाव्य पुराचा धोका ओळखून अन्य उपाययोजना करणे देखील गरजेचे आहे.

...

अग्निशमन दल सज्ज

पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणेचीही युद्धपातळीवर मदत घेतली जाते. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये बाजार समिती व नगरपालिका मिळून अग्निशमन दलाचे कर्मचारी, अधिकारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची मदत पूरपरिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनास होते. त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आलेली असते.

....

शहरांमधील जुन्या इमारती धोकादायक

जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये जुन्या इमारतींचे सर्वेक्षण नगरपालिका व पंचायतीच्यावतीने केले जाते. मात्र, इमारती धोकादायक असताना देखील त्यावर कारवाई करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे शहरातील जुन्या व कालमर्यादा संपलेल्या इमारती कायम धोकादायक आहेत. त्यामुळे योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील गोदावरीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा वेळोवेळी स्थानिक प्रशासनाकडून दिला जातो. तसेच पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तयारी करण्यात आली आहे.

- मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड.