शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

खासगी क्लासचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

------------------------ सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे अंबाजोगाई : बहुतांश शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता जवळपासच्या शहरात राहत असून, तिथून आपला ...

------------------------

सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे

अंबाजोगाई : बहुतांश शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता जवळपासच्या शहरात राहत असून, तिथून आपला कारभार सांभाळत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामीण नागरिकांनी केली. आहे. विशेष म्हणजे, सध्या शेती हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना विविध कागदपत्रांची गरज असते. अशावेळी कर्मचारी मुख्यालयी नसल्याने त्यांच्या शोधात नागरिकांना शहरात यावे लागत आहे.

-----------------------------

रस्ते खोदल्याने झाला चिखल

अंबाजोगाई : शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने काम बंद होते. मागील काही दिवसांपूर्वी शिथिलता दिल्यानंतर काम सुरू करण्यात आले. मात्र आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने खोदकाम केल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या मातीने रस्ते चिखलमय झाले आहेत. या चिखलामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

------------------------

इंटरनेटअभावी शेकडो ग्राहक त्रस्त

अंबाजोगाई : तालुक्यात दूरसंचार विभागाची इंटरनेट सेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही बँकांमध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत राहावे लागते. विद्यार्थ्यांनाही यामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

------------------------------------

अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री

अंबाजोगाई : पावसाळा सुरू झाला असून, अस्वच्छतेच्या वातावरणात अन्न पदार्थाची विक्री केल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. शहरातील मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी खाद्य पदार्थांची दुकाने लावली लावली जात आहेत. यावर न. पा. तसेच अन्न, औषध प्रशासनाने कारवाई करून उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

-------------------------

बेरोजगारांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करावेत

अंबाजोगाई : शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरतीवर बंदी असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना बँकांनी अर्थसाहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास कानसूरकर यांनी केली आहे.