शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

नोकऱ्या गेल्यामुळे मानसिक तणाव वाढला, कुटुंबाला जगवायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:33 IST

बीड : संपूर्ण देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यासंदर्भातील वृत्ताने जनमानसावर गंभीर परिणाम होत आहे. आरोग्य यंत्रणा तोकडी पडत ...

बीड : संपूर्ण देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यासंदर्भातील वृत्ताने जनमानसावर गंभीर परिणाम होत आहे. आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे, दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. रुग्णांना उपचार करण्यासाठी अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. लस उपलब्ध नाही. असे एक ना अनेक प्रश्न सद्य:स्थितीत समोर आहेत. यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे अनेकजण घरात बंदिस्त झाले आहेत. त्यांना बाहेर पडण्यासाठी मार्गच राहिला नाही.

मनोरंजनाची साधने गेली आहेत. खेळाची मैदाने बंद झाली आहेत. घरी बसून त्यांच्या डोक्यात विविध प्रकारचे विचार येत आहेत. अनेकांची मानसिक स्थिती देखील बिघडली आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचा मुकाबला करताना सर्वांगीण आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. ताण वाढण्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यातच दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येचा परिणाम बाजारपेठ व उद्योगधंद्यावर झाला आहे. त्यामुळे नोकरी नसलेल्यांची संख्या देखील वाढली आहे. एकीकडे आर्थिक अडचण व दुसरीकडे कोरोनाची भीती या दुहेरी संकटामुळे काही जणांच्या मानसिकतेत प्रचंड बदल झाला असून, त्यांना विविध प्रकारे समुपदेशनाची गरज भासत आहे.

तरुणांचे प्रश्न वेगळेच

जिल्ह्यात मोठे उद्योग बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यामुळे बीडच्या तरुणांना नोकरीसाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह इतर शहरात जावे लागते. दरम्यान, लॉकडाऊन आणि कोरोना संसर्ग यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये जास्त प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. तर लसीचा तुटवडा असल्यामुळे ती घेण्यासाठी धावपळ सुरु आहे.

वर्क फ्रॉम होममुळे अनेक तरुण वैतागले असून, कंपन्या मर्यादीत कालावधीपेक्षा जास्त वेळ काम करून घेत आहेत. त्यामुळे देखील ताण वाढला असून, कुटुंबात असून ते सतत कामात असतात.

पुरुष सर्वाधिक ताणात

नोकरी गमावल्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा या चिंतेमुळे अनेक पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात तणावाखाली आहेत. तसेच विविध प्रश्न समोर उभा असल्यामुळे पुढील भविष्याची चिंता वाढली आहे.

कोण म्हणतो पुरुष व्यक्त होत नाहीत?

लॉकडाऊनमुळे पुरुष मंडळी घरीच बसून आहेत. रोजगार नाही, काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबामध्ये कलह देखील वाढला आहे. अनेकवेळा व्यक्त न होणारे पुरुष या काळात वाढत्या ताणामुळे व्यक्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच महिलांच्या देखील समस्या याच पद्धतीच्या असून, या काळात कुटुंबात सुसंवाद असणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

नोकरी गेली आता काय पर्याय?

लॉकडाऊनमुळे मागील वर्षापासून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दरम्यान, नोकरी गेल्यामुळे अनेकांनी पर्यायी मार्ग स्वीकारला आहे. काही जणांनी गृहउद्योग सुरु केले आहेत. तर, काहींनी गावी शेतात राबण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र जे भुतकाळाचा विचार करत बसले ते मात्र प्रचंड तणावाखाली वावरत आहेत. यातून अनुचित प्रकार घडल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.