शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

नियोजन समितीच्या सदस्यपदी लोमटे, वाघाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST

अंबाजोगाई : तालुक्यातून बीड जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ...

अंबाजोगाई : तालुक्यातून बीड जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र भगवानराव लोमटे, तर काँग्रेस पक्षाकडून माजी नगरसेवक सुनील वाघाळकर यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनुसार लोमटे व वाघाळकर यांची नियुक्ती अंबाजोगाई शहरातून झाली आहे. या दोघांच्या झालेल्या निवडीबद्दल सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाच्या वतीने काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर ठिकठिकाणी दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न वापरणे अनेकांना दंड बसत असल्यामुळे महागात पडले आहे.

शेतकऱ्यांची तारांबळ

अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे. अचानक पावसाच्या सरी, गारपीट, वादळी वारे होऊ लागल्याने शेतात असणारा हरभरा, गहू, ज्वारी, अंबा या पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. काही ठिकाणी पीक झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षीच बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

विजेचा लपंडाव सुरू

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सातत्याने सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वीज प्रवाह सातत्याने खंडित होऊ लागला आहे. अंबाजोगाई शहरातील अर्धे अंबाजोगाईकर सोमवारी रात्री अंधारातच होते. तर ग्रामीण भागातही अशी स्थिती निर्माण झाली होती. सतत होणाऱ्या खंडित प्रवाहामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. दुरूस्तीच्या नावाखाली तासनतास विद्युत पुरवठा खंडित ठेवला जात आहे. याचा मोठा त्रास नागरिकांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र जाधव यांनी केली आहे.

वराहांचा सुळसुळाट, नागरिक त्रस्त

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात प्रामुख्याने जुन्या गावांमध्ये रस्त्यावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साठले आहेत. अशा ठिकाणी वराहांचा सुळसुळाट गल्लीबोळांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे वराह मुख्य रस्त्यावर व अनेकांच्या घरांसमोर मोठी घाण करतात. याची मोठी दुर्गंधी निर्माण होते. अनेकदा या वराहांच्या रस्त्यावरील प्रादुर्भावामुळे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. नगर परिषद प्रशासनाने या वराहांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. मधुकर नागरगोजे यांनी केली आहे.