शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

परळीत रविवारपासून राखेची उघडी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:17 IST

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर व टोकवाडीच्या राख बंधाºयातील राखेची रस्त्यावरुन होणारी वाहतूक रविवारपासून बंद झाली आहे. राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखावे या मागणीसाठी शनिवारी कन्हेरवाडीत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती.

ठळक मुद्देदाऊतपूर - टोकवाडी बंधा-यातून राख उचलण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर व टोकवाडीच्या राख बंधाºयातील राखेची रस्त्यावरुन होणारी वाहतूक रविवारपासून बंद झाली आहे. राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखावे या मागणीसाठी शनिवारी कन्हेरवाडीत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने औष्णिक विद्युत मुख्य अभियंत्यांना वाहतूक व्यवस्था कडक करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार दोन्ही राख तळ्यातून राख उचलणे बंद केले आहे. त्यामुळे रस्त्यावरून होणाºया राखेच्या थराचे प्रदूषण थांबले आहे.

परळी तालुक्यातील दाऊतपूर, दादाहारी वडगाव, संगम परिसरातील परळी औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मितीसाठी लागणाºया दगडी कोळशाच्या वापर केला जातो. कोळसा जळाल्यानंतर ही राख पाईपद्वारे राख तळ्यात सोडली जाते. त्या राखेचा उपयोग वीटभट्टीसाठी केला जातो. त्या राखेची वाहतूक १०० ट्रॅक्टर, २०० टिप्पर व ५० ट्रकद्वारे तळ्यातून वाहतूक केली जाते.

राखेची ही वाहतूक व्यवस्थित केली जात नसल्याने रस्त्यावरच राख सांडली जाते. ही राख हवेने उडून इतर वाहनांना अडचणीचे ठरत असून, अपघाताची भीती वाढली आहे. धर्मापुरी फाटा ते दादाहारी वडगाव या रस्त्यावर तर दिवसाही राख सांडलेली असते. त्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे दादाहारी वडगावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे म्हणाले.

शनिवारी कन्हेरवाडीच्या रस्त्यावर राख सांडल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या प्रकरणी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार शरद झाडगे यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केली.

उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांना राखेच्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार रविवारपासून तळ्यातील राख जेसीबीने उचलणे थांबविले आहे.

बीडसह तीन जिल्ह्यात राखेची वाहतूकही राख लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, नेकनूर, केज, अंबाजोगाई, बीड, माजलगाव, पैठण आदी भागांसह अन्य शहरातील वीट उत्पादकांना पुरविली जाते. राखेच्या वाहनांवर आच्छादन न टाकता उघड्या वाहनातून शहरातील विविध मार्गांवरून वाहतूक केली जात असल्याने परळीकरही हैराण आहेत.