शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

परळीत रविवारपासून राखेची उघडी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:17 IST

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर व टोकवाडीच्या राख बंधाºयातील राखेची रस्त्यावरुन होणारी वाहतूक रविवारपासून बंद झाली आहे. राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखावे या मागणीसाठी शनिवारी कन्हेरवाडीत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती.

ठळक मुद्देदाऊतपूर - टोकवाडी बंधा-यातून राख उचलण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर व टोकवाडीच्या राख बंधाºयातील राखेची रस्त्यावरुन होणारी वाहतूक रविवारपासून बंद झाली आहे. राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखावे या मागणीसाठी शनिवारी कन्हेरवाडीत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने औष्णिक विद्युत मुख्य अभियंत्यांना वाहतूक व्यवस्था कडक करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार दोन्ही राख तळ्यातून राख उचलणे बंद केले आहे. त्यामुळे रस्त्यावरून होणाºया राखेच्या थराचे प्रदूषण थांबले आहे.

परळी तालुक्यातील दाऊतपूर, दादाहारी वडगाव, संगम परिसरातील परळी औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मितीसाठी लागणाºया दगडी कोळशाच्या वापर केला जातो. कोळसा जळाल्यानंतर ही राख पाईपद्वारे राख तळ्यात सोडली जाते. त्या राखेचा उपयोग वीटभट्टीसाठी केला जातो. त्या राखेची वाहतूक १०० ट्रॅक्टर, २०० टिप्पर व ५० ट्रकद्वारे तळ्यातून वाहतूक केली जाते.

राखेची ही वाहतूक व्यवस्थित केली जात नसल्याने रस्त्यावरच राख सांडली जाते. ही राख हवेने उडून इतर वाहनांना अडचणीचे ठरत असून, अपघाताची भीती वाढली आहे. धर्मापुरी फाटा ते दादाहारी वडगाव या रस्त्यावर तर दिवसाही राख सांडलेली असते. त्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे दादाहारी वडगावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे म्हणाले.

शनिवारी कन्हेरवाडीच्या रस्त्यावर राख सांडल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या प्रकरणी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार शरद झाडगे यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केली.

उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांना राखेच्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार रविवारपासून तळ्यातील राख जेसीबीने उचलणे थांबविले आहे.

बीडसह तीन जिल्ह्यात राखेची वाहतूकही राख लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, नेकनूर, केज, अंबाजोगाई, बीड, माजलगाव, पैठण आदी भागांसह अन्य शहरातील वीट उत्पादकांना पुरविली जाते. राखेच्या वाहनांवर आच्छादन न टाकता उघड्या वाहनातून शहरातील विविध मार्गांवरून वाहतूक केली जात असल्याने परळीकरही हैराण आहेत.