शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

परळीत रविवारपासून राखेची उघडी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:17 IST

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर व टोकवाडीच्या राख बंधाºयातील राखेची रस्त्यावरुन होणारी वाहतूक रविवारपासून बंद झाली आहे. राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखावे या मागणीसाठी शनिवारी कन्हेरवाडीत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती.

ठळक मुद्देदाऊतपूर - टोकवाडी बंधा-यातून राख उचलण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर व टोकवाडीच्या राख बंधाºयातील राखेची रस्त्यावरुन होणारी वाहतूक रविवारपासून बंद झाली आहे. राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखावे या मागणीसाठी शनिवारी कन्हेरवाडीत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने औष्णिक विद्युत मुख्य अभियंत्यांना वाहतूक व्यवस्था कडक करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार दोन्ही राख तळ्यातून राख उचलणे बंद केले आहे. त्यामुळे रस्त्यावरून होणाºया राखेच्या थराचे प्रदूषण थांबले आहे.

परळी तालुक्यातील दाऊतपूर, दादाहारी वडगाव, संगम परिसरातील परळी औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मितीसाठी लागणाºया दगडी कोळशाच्या वापर केला जातो. कोळसा जळाल्यानंतर ही राख पाईपद्वारे राख तळ्यात सोडली जाते. त्या राखेचा उपयोग वीटभट्टीसाठी केला जातो. त्या राखेची वाहतूक १०० ट्रॅक्टर, २०० टिप्पर व ५० ट्रकद्वारे तळ्यातून वाहतूक केली जाते.

राखेची ही वाहतूक व्यवस्थित केली जात नसल्याने रस्त्यावरच राख सांडली जाते. ही राख हवेने उडून इतर वाहनांना अडचणीचे ठरत असून, अपघाताची भीती वाढली आहे. धर्मापुरी फाटा ते दादाहारी वडगाव या रस्त्यावर तर दिवसाही राख सांडलेली असते. त्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे दादाहारी वडगावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे म्हणाले.

शनिवारी कन्हेरवाडीच्या रस्त्यावर राख सांडल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या प्रकरणी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार शरद झाडगे यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केली.

उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांना राखेच्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार रविवारपासून तळ्यातील राख जेसीबीने उचलणे थांबविले आहे.

बीडसह तीन जिल्ह्यात राखेची वाहतूकही राख लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, नेकनूर, केज, अंबाजोगाई, बीड, माजलगाव, पैठण आदी भागांसह अन्य शहरातील वीट उत्पादकांना पुरविली जाते. राखेच्या वाहनांवर आच्छादन न टाकता उघड्या वाहनातून शहरातील विविध मार्गांवरून वाहतूक केली जात असल्याने परळीकरही हैराण आहेत.