शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन अपरिहार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST

प्रभात बुडूख बीड : कोरोना संसर्ग काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी कोरोनासंदर्भात नियम पाळण्याचे संदेश दिले ...

प्रभात बुडूख

बीड : कोरोना संसर्ग काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी कोरोनासंदर्भात नियम पाळण्याचे संदेश दिले जातात. मात्र, अनेकजण नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संसर्ग वाढतोय. प्रमाणापेक्षा जास्त रुग्ण आढळले तर ही संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावा लागेल. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे. ‘लोकमत’ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या विकासासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या संदर्भात आपले मत व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप म्हणाले, यापूर्वी देखील बीड जिल्ह्यात काम केले आहे. त्यामुळे या ठिकाणचे प्रश्न व प्रशासनाकडून काय करणे गरजेचे आहे, याची जाणीव असल्यामुळे आणि जिल्हाधिकारी या प्रमुख पदावर असल्यामुळे तो प्रयत्न सतत असेल. यासाठी लोकप्रतिनिधींकडूनदेखील सहकार्य मिळणेदेखील महत्त्वाचे आहे. त्याचसोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गंत संवाद असणे गरजेचे आहे. त्याचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विषय नवीन असल्यामुळे माहिती नसते आणि फायली जागेवर ठप्प राहतात. त्यामुळे त्यांना संबंधित कामांचे प्रशिक्षण पुढील काळात दिले जाईल. प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी सुसंवाद असेल, तर अनेक प्रश्न सुटतात, असे ते म्हणाले.

लवादातील प्रकरणांसाठी सुटीचा दिवस

भूसंपादनाची अनेक प्रकरणं मागील काही काळापासून लवादाकडे प्रलंबित होते. ही प्रकरणं निकाली काढण्यासाठी शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवसांचा उपयोग केला जाणार आहे. त्याचे कामदेखील सुरू केले असून, काही प्रकरणांचा निपटारादेखील करण्यात आला असून, भूसंपादनाची प्रकरणं किचकट असले तरी कायद्याप्रमाणे निकाली काढण्यात येणार आहेत.

शेतकरी आत्महत्या रोखता येऊ शकतात

शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात सखोल माहिती घेतली, त्यावेळी कळले की कर्ज हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे बँकेतील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधणे गरजेचे आहे. ते भेटायला आले तर त्यांना वेळ देऊन समस्येचे निरसन करावे. शेतकऱ्यांनीदेखील खचून न जाता प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घ्यावी. कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती गावागावांत जाऊन द्यावी व त्याचा लाभ कसा देता येईल याविषयी धोरण राबवावे, तर आत्महत्या रोखण्यास नक्कीच यश येईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

===Photopath===

070321\072_bed_18_07032021_14.jpg

===Caption===

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप