शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन अपरिहार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST

प्रभात बुडूख बीड : कोरोना संसर्ग काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी कोरोनासंदर्भात नियम पाळण्याचे संदेश दिले ...

प्रभात बुडूख

बीड : कोरोना संसर्ग काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी कोरोनासंदर्भात नियम पाळण्याचे संदेश दिले जातात. मात्र, अनेकजण नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संसर्ग वाढतोय. प्रमाणापेक्षा जास्त रुग्ण आढळले तर ही संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावा लागेल. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे. ‘लोकमत’ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या विकासासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या संदर्भात आपले मत व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप म्हणाले, यापूर्वी देखील बीड जिल्ह्यात काम केले आहे. त्यामुळे या ठिकाणचे प्रश्न व प्रशासनाकडून काय करणे गरजेचे आहे, याची जाणीव असल्यामुळे आणि जिल्हाधिकारी या प्रमुख पदावर असल्यामुळे तो प्रयत्न सतत असेल. यासाठी लोकप्रतिनिधींकडूनदेखील सहकार्य मिळणेदेखील महत्त्वाचे आहे. त्याचसोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गंत संवाद असणे गरजेचे आहे. त्याचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विषय नवीन असल्यामुळे माहिती नसते आणि फायली जागेवर ठप्प राहतात. त्यामुळे त्यांना संबंधित कामांचे प्रशिक्षण पुढील काळात दिले जाईल. प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी सुसंवाद असेल, तर अनेक प्रश्न सुटतात, असे ते म्हणाले.

लवादातील प्रकरणांसाठी सुटीचा दिवस

भूसंपादनाची अनेक प्रकरणं मागील काही काळापासून लवादाकडे प्रलंबित होते. ही प्रकरणं निकाली काढण्यासाठी शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवसांचा उपयोग केला जाणार आहे. त्याचे कामदेखील सुरू केले असून, काही प्रकरणांचा निपटारादेखील करण्यात आला असून, भूसंपादनाची प्रकरणं किचकट असले तरी कायद्याप्रमाणे निकाली काढण्यात येणार आहेत.

शेतकरी आत्महत्या रोखता येऊ शकतात

शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात सखोल माहिती घेतली, त्यावेळी कळले की कर्ज हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे बँकेतील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधणे गरजेचे आहे. ते भेटायला आले तर त्यांना वेळ देऊन समस्येचे निरसन करावे. शेतकऱ्यांनीदेखील खचून न जाता प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घ्यावी. कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती गावागावांत जाऊन द्यावी व त्याचा लाभ कसा देता येईल याविषयी धोरण राबवावे, तर आत्महत्या रोखण्यास नक्कीच यश येईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

===Photopath===

070321\072_bed_18_07032021_14.jpg

===Caption===

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप