शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

जिल्ह्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:33 IST

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आणखी प्रभावीपणे ही संख्या कमी करण्यासाठी बीड जिल्ह्यात पुन्हा २५ ...

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आणखी प्रभावीपणे ही संख्या कमी करण्यासाठी बीड जिल्ह्यात पुन्हा २५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतला असून, १३ मे रोजी याचे आदेश काढण्यात आले आहेत. हे निर्बंध १५ मे रोजी रात्री १२ वाजेपासून २५ मेपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

लॉकडाऊनच्या काळात सर्व औषधालये, दवाखाने, निदान क्लिनिक, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतूक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, पेट्रोल पंप, टपाल सेवा आदी अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापनावगळता इतर कोणत्याही आस्थापना या कालावधीत सुरू राहणार नाहीत.

तर, दूध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सुरू राहील. गॅस वितरण मात्र, दिवसभर सुरू राहणार आहे. बँक ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत केवळ शासकीय व्यवहार, पेट्रोल पंप व गॅस एजन्सी धारकांचे व्यवहार, कृषी निविष्ठांशी संबंधित व्यवहार, वैद्यकीय कारणास्तव केले जाणारे व्यवहार, सर्व शासकीय योजनेचे लाभार्थी यांचे वेतनाबाबतचे व्यवहार, अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणाऱ्या आस्थापनांना या वेळेत बँकेत जाऊन व्यवहार करण्यास मुभा देण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात एटीएम कॅशच्या वाहनांना परवानगी असेल तसेच दुपारी १ ते ४.४५ वाजेपर्यंत बँक कर्मचाऱ्यांना केवळ अंतर्गत कामकाजास मुभा देण्यात आली आहे.

शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे सुरू राहतील. (कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल.) लसीकरणासाठी ४५ वर्षांवरील ज्या व्यक्तींचा दुसऱ्या डोससाठी मेसेज आला आहे, आरोग्य विभागाचे पत्र आले आहे. त्यांनाच लसीकरणचा डोस घेण्यासाठी जाण्यास परवानगी असणार आहे.

कृषी व्यवसायाशी संबंधित बियाणे, खते, औषधे यांची जी दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेले बियाणे, खते, औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरवणात येणार आहेत. नरेगाची कामे सुरू राहतील. त्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा व कोविड १९ विषयक जे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक असेल. स्वस्थ धान्य धान्य दुकानदारांनी २१ मे पासून सकाळी ७ ते ११ या वेळेतच लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील. लाभार्थ्यांनी आधार, रेशनकार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे.

दहा दिवस मद्यविक्री पूर्णवेळ बंद

जिल्ह्यातील सर्वप्रकारची मद्यविक्री पूर्णवेळ बंद राहणार आहेत. १५ मे रोजी रात्री १२ वाजेपासून २५ मेपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत या कालावधीत निर्बंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सील करण्यात येऊन त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.