शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
4
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
5
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
6
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
7
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
8
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
9
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
10
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
11
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
12
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
13
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
14
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू
15
नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर
16
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
17
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
18
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
19
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!
20
FD मध्ये गुंतवणूक करायचीय? हे आहेत 10 बेस्ट बँक ऑप्शन्स, येथे मिळतोय जवळपास 9% परतावा; जाणून घ्या सविस्तर

लाल दिव्यासाठी ‘लॉबिंग’ !

By admin | Updated: February 25, 2017 00:29 IST

बीड बहुमताअभावी जिल्हापरिषदेत निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेचप्रसंग कसा सुटतो हे पाहणे मोठे रोमांचक ठरणार आहे.

प्रताप नलावडे बीडबहुमताअभावी जिल्हापरिषदेत निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेचप्रसंग कसा सुटतो हे पाहणे मोठे रोमांचक ठरणार आहे. तूर्त लाल दिव्यासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. राकाँतर्फे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगल सोळंके, सारिका सोनवणे व काँग्रेसच्या आशा दौंड या तिघींची नावे पुढे येत आहेत.सर्वाधिक २५ सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या पाठोपाठ १९ सदस्यांसह भाजपचा क्रमांक लागतो. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना धोबीपछाड दिल्यानंतर जिल्हा परिषद राकाँच्याच ताब्यात अबाधित ठेवण्याचे आव्हान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यापुढे आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्यामुळे अनेकांना लाल दिव्याचे वेध लागले आहेत. जिल्हापरिषदेच्या राजकारणात अग्रेसर असलेल्या राष्ट्रवादीमध्ये गट तितके नेते आहेत. सध्या सर्वाधिक सदस्य धनंजय मुंडे गटाकडे आहेत. परळी तालुक्यातील ६, अंबाजोगाई तालुक्यातील ४ व केज तालुक्यातील २ असे एकूण डझनभर सदस्य धनंजय मुंडे गटाचे मानले जातात. ज्याच्याकडे सर्वाधिक सदस्य तो अध्यक्ष हा राकाँचा जुनाच अलिखित नियम. त्यामुळे धनंजय मुंडे ठरवतील तो अध्यक्ष पदाच्या खुर्चीत असेल असे संकेत आहेत. तसे झाले तर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय सारिका बजरंग सोनवणे यांची वर्णी लागू शकते. काँग्रेसने परळी तालुक्यात राष्ट्रवादीशी आघाडी केली. याबदल्यात याआधी उपाध्यक्षपद भूषविलेल्या काँग्रेसच्या आशा संजय दौंड यांचे देखील अध्यक्षपदी ‘प्रमोशन’ होऊ शकते.दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून राजकीय विजनवासात असलेले माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगल सोळंके या देखील अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार मानल्या जातात. सोळंके हे अजित पवारांचे खंदे समर्थक असून, त्यांनी माजलगावात सर्वच्या सर्व ७ जागांवर राकाँला विजय प्राप्त करून दिला आहे. शिवाय, वडवणी - धारूर तालुक्यात त्यांचा प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नीला लाल दिव्याची लॉटरी लागू शकते.इकडे अल्पमतात असलेल्या भाजपनेही सत्तास्थापनेसाठीचा ३१ हा जादुई आकडा गाठण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. रणांगणातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपने रणनीती आखणे सुरू केले आहे.