शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

साहित्यामध्ये जात-पात, धर्माचे रंग नसावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जात-पात, धर्माचे रंग आल्यामुळे राजकारण बदनाम झाले. परंतु साहित्य क्षेत्रातही हे रंग पाहावयास मिळतात, ही दुर्दैवी बाब होय. जिथे साहित्यातून विचार दिला जातो, तिथे तरी जाती-धर्माच्या भिंती नसाव्यात, असे प्रतिपादन ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी केले.दोन दिवस चाललेल्या या ...

ठळक मुद्देमराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचा समारोप पंकजा मुंडे यांनी घेतला साहित्यातील राजकारणाचा खरपूस समाचार; स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जात-पात, धर्माचे रंग आल्यामुळे राजकारण बदनाम झाले. परंतु साहित्य क्षेत्रातही हे रंग पाहावयास मिळतात, ही दुर्दैवी बाब होय. जिथे साहित्यातून विचार दिला जातो, तिथे तरी जाती-धर्माच्या भिंती नसाव्यात, असे प्रतिपादन ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी केले.

दोन दिवस चाललेल्या या संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्षा प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर तर पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, कौतिकराव ठाले, सुशीला मोराळे, नामदेवराव क्षीरसागर, कवयित्री संजीवनी तडेगावकर, भास्कर बडे, डॉ. ऋषिकेश कांबळे, रमेश पोकळे, संतोष हंगे आदी उपस्थित होते.

साहित्य आणि राजकारणातील वाद हा नेहमीच चालत आला आहे. अतिथींची यादी पाहता या संमेलनावरही राजकीय प्रभाव होता. या प्रसंगी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, अनेक वर्षांपासून स्त्री - पुरुष भेदावर चर्चा चालूच आहे. स्त्री मुक्ती, समानता, स्वातंत्र्य यावर बोलले जाते. अनेक महाकाव्यातील कथेचे दाखले दिले जातात. परंतु या महाकाव्यातून बोध दिला जातो तो महत्त्वाचा आहे. स्त्री आणि पुरुषांनी एकमेकांचा सन्मान राखला तर आपोआपच सर्व प्रश्न सुटतील. त्याची सुरुवात आपण आपल्या कुटुंबापासून केली पाहिजे.

आपल्यापेक्षा कमी शक्ती असलेल्या स्त्रीला जर प्रत्येकीने शक्ती दिली पाहिजे. स्त्रीचा सन्मान राखत त्यांना मुख्य प्रवाहात बरोबरीने आणने गरजेचे आहे. उद्घाटन समारंभात सुप्रिया सुळे यांनी शासनाच्या ध्येयधोरणावर अप्रत्यक्ष टीका केली होती. शाळा बंद करण्याचा निर्णय हाणून पाडू, असे ठणकावले आणि दुसºया दिवशी संमेलनात मराठी शाळा बंद करू नये, असा ठराव घेतला. हा धागा पकडून त्यांनी साहित्यात येत असलेल्या राजकारणाचा सडेतोड समाचार घेतांना ‘वस्तुस्थिती’ जाणून घेतली पाहिजे असा सल्ला दिला.पटसंख्या कमी असलेल्या शाळाही बंद करु नयेत असा ठराव या संमेलनात घेतला. याबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, शाळांच्या संदर्भात चुकीचे गैरसमज पसरविले जात आहेत. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. ज्या ठिकाणी पटसंख्या कमी आहे आणि दुसरी शाळा एक किलोमीटरच्या आत नाही अशा ठिकाणच्या शाळा शासनाने बंद केलेल्या नाहीत.अनाथ मुलांसाठी नोकरीत एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या चांगल्या निर्णयाच्या अभिनंदनाचा ठराव या संमेलनामध्ये होईल, असे मला वाटले होते. परंतु तसे घडले नाही. हे सांगताना त्यांनी साहित्य क्षेत्रातही कसे राजकारण शिरले आहे, हे अप्रत्यक्षरीत्या उपस्थितांच्या लक्षात आणून दिले.