शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

कथाकथनातून ग्रामीण, शहरी भागातील संवेदनशील विषयांवर प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शेती, समाजकार्य अशा विविध ग्रामीण भागाशी निगडित विषयांवर कथा मांडून कथाकारांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शेती, समाजकार्य अशा विविध ग्रामीण भागाशी निगडित विषयांवर कथा मांडून कथाकारांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. एकापेक्षा एक सरस कथा सादर करुन उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

संमेलनाच्या दुस-या दिवशी सायंकाळच्या सत्रात कान्होपात्रा विचार मंचावर कथाकथन झाले. अध्यक्षस्थानी कमल नलावडे (उस्मानाबाद) या होत्या, तर पुष्पा दाभाडे (कन्नड), सत्यशीला तौर (जालना), स्वाती कानेगावकर (नांदेड), सरोज देशपांडे (परभणी), संगीता होळकर (कडा), शेख नज्मा मैनुद्दीन (धानोरा), अनिता येलमाटे (उदगीर), विजया इंगोले (अंबाजोगाई) यांनी कथाकथनात सहभाग नोंदवला.

सत्यशीला तौर यांनी ‘दिसं’ ही ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली कथा सादर केली. यामध्ये त्यांनी शिवाजी नामक व्यक्तीवर आधारित त्याचा जीवनपट मांडला. आजचा आणि उद्याचा दिवस कसा उजाडतो यावर त्यांनी मांडणी केली. स्वाती कानेगावकर यांनी ‘अपराध कोणता होता’ ही कथा सादर केली. यामध्ये निखिल व नेहा या बहीण-भावाची कथा सांगितली. निखिल हा पोलीस अधिकारी होतो, तर नेहाला डॉक्टर व्हायचे असते. नेहाने चांगला अभ्यास करुन परीक्षेला गेली. एकटी असल्याचा फायदा घेत एका रोमिओने तिला भर रस्त्यात जाळले. यामध्ये प्रामाणिक अभ्यास करुन डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणा-या नेहाचा नाहक जीव गेला. यात नेमका अपराध कोणाचा होता ? असे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर सरोज देशपांडे यांनी ‘पापड उद्योग’ ही विनोद कथा सादर केली. तीन मैत्रिणींनी मिळून त्रिवेणी पापड उद्योग उभारला. परंतु प्रचार व प्रसाराअभावी त्याला कोणीही विकत घेत नव्हते. अखेर कंटाळून त्यांनी घरी येणाºया पाहुण्यांना चहाऐवजी पापड देणे पसंद केले. तसेच आहेराऐवजी त्यांना पापडच देण्यात आले. विनोदी आणि मुद्देसूद मांडलेली कविता लोकांच्या मनाला भिडली. देशपांडे यांनी सभागृहाला मनमुराद हसवले.

संगीता होळकर यांनी ‘आधार’ ही कथा सादर केली. इतर मान्यवरांनी विविध कथा सादर करुन प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभागृह प्रेक्षकांनी खचाखच भरलेले होते.