शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

चारपिढ्यांपासून जीवघेणी कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:34 IST

अनिल लगड/ पावसाळ्यात कांबळी नदीला पूर आला की आमचा दहा, दहा दिवस गावाशी संपर्क तुटतो. पूर्वीच्या दोन पिढ्यांना तर ...

अनिल लगड/

पावसाळ्यात कांबळी नदीला पूर आला की आमचा दहा, दहा दिवस गावाशी संपर्क तुटतो. पूर्वीच्या दोन पिढ्यांना तर पावसाळ्याच्या दिवसात उपाशी राहून दिवस काढावे लागले. आताही आमच्यासह आमच्या लेकरा-बाळांना डोक्यावर घेऊन आम्हाला कंबरेइतक्या पाण्यातून नदीपार करावी लागते. आमच्या चारपिढ्या नेते, अधिकाऱ्यांच्या हातापाया पडल्या. पण आश्वासनापलीकडे आम्हाला काहीच मिळाले नाही. आमची नदी पार करण्याची जीवघेणी कसरत सुरूच आहे. अशी व्यथा हिवरा गावातील एका वस्तीवरील ग्रामस्थांनी ‘लोकमत’पुढे मांडल्या.

....

आष्टी तालुक्यातील हिवरा हे अडीच हजार लोकवस्तीचे गाव. या गावातून कांबळी नदी वाहते. धानोरा-सावरगाव रस्त्यावर चारवेळा ही नदी आडवी येते. पिंपरखेड, सुलेमान देवळा येथे या नदीवरील पूल कमी उंचीचा असल्याने अनेकवेळा पुलावरून पाणी वाहते. यावेळी वाहतूक ठप्प होते. दोन दोन दिवस अनेक गावांचा संपर्क तुटतो. हिवरा गावातून भोजेवाडी, दादेगावकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून जाताना चव्हाण, लगड या मोठ्या वस्त्या आहेत. या वस्त्यांचा तर गावांशी दहा, दहा दिवस संपर्क तुटतो. पावसाळ्यात दोन दोन महिने सायकल, दुचाकीदेखील जात नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक करता येत नाही. गावातील डेअरीला दूध घालता येत नाही. पावसाळ्यात पुराच्या दिवसात अनेक वेळा दूध ओतून द्यावे लागते. मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होते. अनेक दिवस घरीच रहावे लागते. नदी पार करताना मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पालकांसमोर असतो.

५० वर्षांपासून प्रश्न सुटेना

गेवराई तालक्यातील चकलांबा-चोरपुरी रस्त्यावर चिखलात जीप फसून एका चाळीस वर्षे महिलेला उपचाराअभावी जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असताना हिवरा गावातील या वस्तीवरील नागरिकांना कोणी आजारी पडले तर काय होईल याची कल्पनात न केलेली बरी. गेल्या ५० वर्षांपासून या वस्तीवरील शेतकरी आदिवासींसारखे जीवन जगत आहेत. हिवरा-दादेगाव रस्त्याचे कामात या ठिकाणी पूल उभारावा, अशी मागणी सरपंच केशव चव्हाण, बाबूराव चव्हाण, रामेश्वर चव्हाण, महादेव काळे व ग्रामस्थांनी ७ सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.

....

मंजूर झालेला रस्ता गेला कुठे?

भाजप-सेना युती सरकारने दोन वर्षांपूर्वी हिवरा-दादेगाव रस्त्याला मंजुरी दिली होती. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभही झाला. निधीही मंजूर झाला होता. रस्त्याच्या कामावर मजूरही दाखल झाले होते. परंतु कोरोनाच्या संकटाने काम रखडले असे सांगितले. मजूर परत गेले. पण, या रस्त्याचे पुढे काय झाले? याचे कोडे मात्र उलगडले नाही. तरी या रस्त्याच्या पुन्हा गती द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

180921\18_2_bed_6_18092021_14.jpg~180921\18_2_bed_7_18092021_14.jpg

कांबळी नदीतून जीवघेणा प्रवास

शेवंती फुले
~कांबळी नदीतून जीवघेणा प्रवास
शेवंती फुले