शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मानवी आहारात रानभाज्या महत्त्वाच्या - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : मानवी आहारात रानभाज्यांचे मोठे महत्त्व आहे. निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे. हा ठेवा जतन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : मानवी आहारात रानभाज्यांचे मोठे महत्त्व आहे. निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे. हा ठेवा जतन करण्याचे काम नवीन पिढीच्या माध्यमातून झाले पाहिजे, असे प्रतिपादन परभणी येथील कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम यांनी केले. येथील कृषी महाविद्यालय, कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव व शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे होते, तर उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, डॉ. विलास पाटील हे होते. मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, शरद शिनगारे, डॉ. संदीप घोणसीकर, डॉ. प्रताप नाळवंडीकर, डॉ. गोविंद मुंडे, राजाराम बर्वे यांची उपस्थिती होती. गाव शिवारात नैसर्गिकरित्या येणाऱ्या वनस्पती आरोग्यवर्धक असून, मानवाच्या समतोल आहारात रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असेही डॉ. कदम म्हणाले. शेतकऱ्यांनी रानभाज्यांच्या व्यवसायातून उत्पन्न वृद्धिंगत करावे, पोषण मूल्यांतून आरोग्य संवर्धन बळकट करावे. रानभाज्यातून आहारात खनिजे, जीवनसत्त्वे, क्षार व औषधी गुणधर्म परिपूर्ण व मुबलक प्रमाणात मिळतात. त्याचा वापर प्रत्येक ऋतुमध्ये करणे क्रमप्राप्त आहे, असे प्राचार्य ठोंबरे यांनी समारोपात सांगितले. यावेळी सहभागी शेतकरी व महिला यांना सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आदर्श शेतीनिष्ठ शेतकरी विद्या रूद्राक्ष व ज्ञानोबा कदम यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मोहन धुप्पे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बसलिंगअप्पा कलालबंडी यांनी आभार मानले.

४५ प्रकारच्या रानभाज्या

रानभाजी महोत्सवात ४५ प्रकारच्या विविध रानभाज्या व ३० रानभाज्यांच्या वेगवेगळ्या पाककृती तयार करून प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. यात वाघाटे, रानकांदा, पानाचा ओवा, आंबाडी, अगरडा, टाकला, करटोली, घोळ, पुदीना, फांजी, कुंडलिक काकडी, कवट, हादगा, पिंपळ, उंबर, शेवगा, कुरूडू, मोह, तांदूळजा, भुई आवळा, बांबू, कपाळ फोडी, पाथरी, रानकेळी, काटेमाठ, केना, आंबुशी, भोकर, करवंद, रानवांगे, जंगली टमाटे, पाषाण शेपू, डोंगरी कोरफड आदी रानभाज्यांचा समावेश होता.

130821\4517img-20210813-wa0047.jpg

अंबाजोगाईतील रानभाजी महोत्सव.