शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

मानवी आहारात रानभाज्या महत्त्वाच्या - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : मानवी आहारात रानभाज्यांचे मोठे महत्त्व आहे. निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे. हा ठेवा जतन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : मानवी आहारात रानभाज्यांचे मोठे महत्त्व आहे. निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे. हा ठेवा जतन करण्याचे काम नवीन पिढीच्या माध्यमातून झाले पाहिजे, असे प्रतिपादन परभणी येथील कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम यांनी केले. येथील कृषी महाविद्यालय, कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव व शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे होते, तर उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, डॉ. विलास पाटील हे होते. मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, शरद शिनगारे, डॉ. संदीप घोणसीकर, डॉ. प्रताप नाळवंडीकर, डॉ. गोविंद मुंडे, राजाराम बर्वे यांची उपस्थिती होती. गाव शिवारात नैसर्गिकरित्या येणाऱ्या वनस्पती आरोग्यवर्धक असून, मानवाच्या समतोल आहारात रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असेही डॉ. कदम म्हणाले. शेतकऱ्यांनी रानभाज्यांच्या व्यवसायातून उत्पन्न वृद्धिंगत करावे, पोषण मूल्यांतून आरोग्य संवर्धन बळकट करावे. रानभाज्यातून आहारात खनिजे, जीवनसत्त्वे, क्षार व औषधी गुणधर्म परिपूर्ण व मुबलक प्रमाणात मिळतात. त्याचा वापर प्रत्येक ऋतुमध्ये करणे क्रमप्राप्त आहे, असे प्राचार्य ठोंबरे यांनी समारोपात सांगितले. यावेळी सहभागी शेतकरी व महिला यांना सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आदर्श शेतीनिष्ठ शेतकरी विद्या रूद्राक्ष व ज्ञानोबा कदम यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मोहन धुप्पे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बसलिंगअप्पा कलालबंडी यांनी आभार मानले.

४५ प्रकारच्या रानभाज्या

रानभाजी महोत्सवात ४५ प्रकारच्या विविध रानभाज्या व ३० रानभाज्यांच्या वेगवेगळ्या पाककृती तयार करून प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. यात वाघाटे, रानकांदा, पानाचा ओवा, आंबाडी, अगरडा, टाकला, करटोली, घोळ, पुदीना, फांजी, कुंडलिक काकडी, कवट, हादगा, पिंपळ, उंबर, शेवगा, कुरूडू, मोह, तांदूळजा, भुई आवळा, बांबू, कपाळ फोडी, पाथरी, रानकेळी, काटेमाठ, केना, आंबुशी, भोकर, करवंद, रानवांगे, जंगली टमाटे, पाषाण शेपू, डोंगरी कोरफड आदी रानभाज्यांचा समावेश होता.

130821\4517img-20210813-wa0047.jpg

अंबाजोगाईतील रानभाजी महोत्सव.