शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

मानवी आहारात रानभाज्या महत्त्वाच्या - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : मानवी आहारात रानभाज्यांचे मोठे महत्त्व आहे. निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे. हा ठेवा जतन ...

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : मानवी आहारात रानभाज्यांचे मोठे महत्त्व आहे. निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे. हा ठेवा जतन करण्याचे काम नवीन पिढीच्या माध्यमातून झाले पाहिजे, असे प्रतिपादन परभणी येथील कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम यांनी केले. येथील कृषी महाविद्यालय, कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव व शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे होते, तर उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, डॉ. विलास पाटील हे होते. मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, शरद शिनगारे, डॉ. संदीप घोणसीकर, डॉ. प्रताप नाळवंडीकर, डॉ. गोविंद मुंडे, राजाराम बर्वे यांची उपस्थिती होती. गाव शिवारात नैसर्गिकरित्या येणाऱ्या वनस्पती आरोग्यवर्धक असून, मानवाच्या समतोल आहारात रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असेही डॉ. कदम म्हणाले. शेतकऱ्यांनी रानभाज्यांच्या व्यवसायातून उत्पन्न वृद्धिंगत करावे, पोषण मूल्यांतून आरोग्य संवर्धन बळकट करावे. रानभाज्यातून आहारात खनिजे, जीवनसत्त्वे, क्षार व औषधी गुणधर्म परिपूर्ण व मुबलक प्रमाणात मिळतात. त्याचा वापर प्रत्येक ऋतुमध्ये करणे क्रमप्राप्त आहे, असे प्राचार्य ठोंबरे यांनी समारोपात सांगितले. यावेळी सहभागी शेतकरी व महिला यांना सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आदर्श शेतीनिष्ठ शेतकरी विद्या रूद्राक्ष व ज्ञानोबा कदम यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मोहन धुप्पे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बसलिंगअप्पा कलालबंडी यांनी आभार मानले.

४५ प्रकारच्या रानभाज्या

रानभाजी महोत्सवात ४५ प्रकारच्या विविध रानभाज्या व ३० रानभाज्यांच्या वेगवेगळ्या पाककृती तयार करून प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. यात वाघाटे, रानकांदा, पानाचा ओवा, आंबाडी, अगरडा, टाकला, करटोली, घोळ, पुदीना, फांजी, कुंडलिक काकडी, कवट, हादगा, पिंपळ, उंबर, शेवगा, कुरूडू, मोह, तांदूळजा, भुई आवळा, बांबू, कपाळ फोडी, पाथरी, रानकेळी, काटेमाठ, केना, आंबुशी, भोकर, करवंद, रानवांगे, जंगली टमाटे, पाषाण शेपू, डोंगरी कोरफड आदी रानभाज्यांचा समावेश होता.