शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

घाटनांदूर पाणी योजनेच्या जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

नृसिंह सूर्यवंशी/ लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांदूर : पूस फिल्टर योजनेतूून घाटनांदूरसह अकरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. ...

नृसिंह सूर्यवंशी/

लोकमत न्यूज नेटवर्क

घाटनांदूर : पूस फिल्टर योजनेतूून घाटनांदूरसह अकरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीचे व्हाॅल्व अनेक ठिकाणी खराब झाले आहेत. यामुळे या पाईपलाईनमधून सध्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

पूस पाणीपुरवठा योजनेवर पूर्वी २० खेडेगावांना पाणीपुरवठा केला जात होता. कालांतराने अनेक गावांनी स्वतःची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्याने या योजनेवर फक्त अकरा गावे अवलंबून आहेत. त्यांना या प्रादेशिक पाणी योजनेतून नियमित पाणीपुरवठा होतो. त्यात घाटनांदूरसह पूस, वरवटी, अंबलवाडी, गिरवली आपेट, गिरवली बावणे, तळणी, हनुमंतवाडी, दत्तपूर, तेलघना, अंबलटेक या गावांचा समावेश आहे. पूर्वी ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे होती. नंतर ती जिल्हा परिषदेकडे वर्ग केली गेली. यानंतर या योजनेचे तीनतेरा वाजले. गत एक वर्षापासून पुन्हा देखभाल, दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे योजना दिली गेली. त्यामुळे पाणीपुरवठा नियमित आहे. असे असतानाही अनेक वर्षांपासून एअर व्हाॅल्वची दुरुस्ती मात्र झालीच नाही. यामुळे सध्या या जलवाहिनीवर असलेल्या अनेक एअर व्हाॅल्वमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

घाटनांदूर येथे महादेव पट्टी मंदिरानजीक, अंबाजोगाई-अहमदपूर रोडवरील एअर व्हाॅल्ववरून सध्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. जागोजागी पाईपलाईन फुटली आहे. त्यातूनही पाणी दररोज वाया जात आहे. अद्यापही अनेक भागात पुरेसा पाऊस नसल्याने पाणीटंचाई जाणवत आहे, तर एकीकडे फिल्टर झालेले लाखो, अब्जो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे कोण लक्ष देणार? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. तरी ही पाणी गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे.

....

जर कोणी विनाकारण व्हाॅल्व, पाईपलाईन फोडून पाण्याचा वापर करीत असेल किंवा पाण्याचा अपव्यय करीत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. सध्या जेथे पाण्याची गळती होत आहे. तेथे तातडीने कर्मचारी पाठवून त्याची दुरुस्ती करण्यात येईल. तसेच पाणी गळती थांबविण्यात येईल.

-श्रीमंत लव्हारे, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, पूस.

...