शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

घाटनांदूर पाणी योजनेच्या जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

नृसिंह सूर्यवंशी/ लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांदूर : पूस फिल्टर योजनेतूून घाटनांदूरसह अकरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. ...

नृसिंह सूर्यवंशी/

लोकमत न्यूज नेटवर्क

घाटनांदूर : पूस फिल्टर योजनेतूून घाटनांदूरसह अकरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीचे व्हाॅल्व अनेक ठिकाणी खराब झाले आहेत. यामुळे या पाईपलाईनमधून सध्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

पूस पाणीपुरवठा योजनेवर पूर्वी २० खेडेगावांना पाणीपुरवठा केला जात होता. कालांतराने अनेक गावांनी स्वतःची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्याने या योजनेवर फक्त अकरा गावे अवलंबून आहेत. त्यांना या प्रादेशिक पाणी योजनेतून नियमित पाणीपुरवठा होतो. त्यात घाटनांदूरसह पूस, वरवटी, अंबलवाडी, गिरवली आपेट, गिरवली बावणे, तळणी, हनुमंतवाडी, दत्तपूर, तेलघना, अंबलटेक या गावांचा समावेश आहे. पूर्वी ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे होती. नंतर ती जिल्हा परिषदेकडे वर्ग केली गेली. यानंतर या योजनेचे तीनतेरा वाजले. गत एक वर्षापासून पुन्हा देखभाल, दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे योजना दिली गेली. त्यामुळे पाणीपुरवठा नियमित आहे. असे असतानाही अनेक वर्षांपासून एअर व्हाॅल्वची दुरुस्ती मात्र झालीच नाही. यामुळे सध्या या जलवाहिनीवर असलेल्या अनेक एअर व्हाॅल्वमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

घाटनांदूर येथे महादेव पट्टी मंदिरानजीक, अंबाजोगाई-अहमदपूर रोडवरील एअर व्हाॅल्ववरून सध्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. जागोजागी पाईपलाईन फुटली आहे. त्यातूनही पाणी दररोज वाया जात आहे. अद्यापही अनेक भागात पुरेसा पाऊस नसल्याने पाणीटंचाई जाणवत आहे, तर एकीकडे फिल्टर झालेले लाखो, अब्जो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे कोण लक्ष देणार? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. तरी ही पाणी गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे.

....

जर कोणी विनाकारण व्हाॅल्व, पाईपलाईन फोडून पाण्याचा वापर करीत असेल किंवा पाण्याचा अपव्यय करीत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. सध्या जेथे पाण्याची गळती होत आहे. तेथे तातडीने कर्मचारी पाठवून त्याची दुरुस्ती करण्यात येईल. तसेच पाणी गळती थांबविण्यात येईल.

-श्रीमंत लव्हारे, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, पूस.

...