शिरूर कासार : कोरोना संक्रमण काळात सतत अग्रेसर राहिलेल्या शांतीवन प्रकल्पाने पुन्हा एकदा मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. तालुक्यातील कोरोनाची बाधा झालेल्या गरीब कुटुंबांना एक महिना पुरेल इतके किराणा सामान किट वाटपाचा शुभारंभ शुक्रवारी सिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात झाला. शांतीवन, आनंदवन यांच्या कामात गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानची कायम भागीदारी राहील, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर उपस्थित होते. व्यासपीठावर शिरूरआष्टी पाटोदा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे, सर्जेराव तांदळे, अजय धोंडे, जयदत्त धस, जिल्हा परिषद सदस्य सविता बडे, पंचायत समिती सभापती उषा सरवदे, चंपाबाई पानसंबळ, ॲड. भाग्यश्री ढाकणे ,नगरसेविका वर्षा सानप आदी उपस्थित होते. आनंदवन, शांतीवन आणि गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथे कोविड सेंटर सुरू करून मोफत सेवा देण्याचे काम केले. कोरोनामुळे काम करणे अवघड होत असल्याने गरीब कुटुंबाला किमान एक महिना पुरेलएवढा किराणा सामान वाटप करण्यात आले. प्राथमिक स्वरूपात पन्नास कुटुंबांना किटचे वाटप करण्यात आले. तालुक्यात गावात जाऊन गरजूंना उर्वरित किट पोहच केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्रास्ताविक शांतीवनचे दीपक नागरगोजे यांनी केले. आमदार बाळासाहेब आजबे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जि. प. सदस्य रामराव खेडकर, तालुकाध्यक्ष डॉ. मधुसूदन खेडकर, रामदास बडे, डॉ. रमणलाल बडजाते, इंदुबाई गोल्हार, पिंपळनेरचे सरपंच बबनराव जायभाये, दहिवंडीच्या सरपंच शीला आघाव, आनंदगावचे प्रल्हाद विघ्ने, मानूरचे विठ्ठल वणवे, घोगसपारगावचे देवा गर्कळ, बावीचे नवनाथ ढाकणे, एम. एन. बडे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा, फय्याजभाई शेख आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन सचिन कुंभारकर यांनी केले. सेवाश्रमचे सुरेश राजहंस यांनी आभार मानले.
030721\0512img-20210702-wa0053.jpg
दोन हजार कुटूंबाना किराणा किट वाटपाचा शुभारंभ मा.पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत