शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हद्दीच्या फलकाचा अभाव, प्रवाशांची मोठी कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:30 IST

अंबाजोगाई-लातूर हा मुख्य महामार्ग वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण नुकतेच झाले आहे. चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावर पोलीस ...

अंबाजोगाई-लातूर हा मुख्य महामार्ग वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण नुकतेच झाले आहे. चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावर पोलीस हद्दीचा फलक लावण्यात आलेला नाही. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर वाहन चालकांना अथवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पोलीस ठाण्याच्या मदतीची नितांत आवश्यकता भासते. मात्र, या रस्त्यावर बीड व लातूर अशा पोलिसांच्या दोन हद्दी आहेत. बीड जिल्ह्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याची हद्द तर लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलीस ठाण्याची हद्द. या दोन पोलीस ठाण्यांचा प्रामुख्याने आधार घ्यावा लागतो. जर एखादी दुर्घटना घडली तर जवळचे पोलीस ठाणे गाठल्यास ते आमच्या हद्दीत येत नाही, अशी उडवाउडवीचे उत्तरे देऊन मदत टाळली जाते. त्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना पुन्हा दूरचा पल्ला पार करीत पाहिजे ते पोलीस ठाणे गाठावे लागते. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सर्रासपणे सुरू आहे. याचा मोठा फटका दूरदूरच्या प्रवाशांना प्रवास करतांना झालेला आहे. या दोन्ही हद्दीतील पोलीस अधिकारीही प्रवाशांना मदत करण्यासाठी धजावत नसल्याने प्रवाशांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होतात. या अडचणी कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पोलिसांच्या हद्दीत फलक लावावेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होईल. अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी केली आहे.