शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पोलीस हद्दीच्या फलकाचा अभाव, प्रवाशांची मोठी कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:30 IST

अंबाजोगाई-लातूर हा मुख्य महामार्ग वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण नुकतेच झाले आहे. चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावर पोलीस ...

अंबाजोगाई-लातूर हा मुख्य महामार्ग वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण नुकतेच झाले आहे. चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावर पोलीस हद्दीचा फलक लावण्यात आलेला नाही. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर वाहन चालकांना अथवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पोलीस ठाण्याच्या मदतीची नितांत आवश्यकता भासते. मात्र, या रस्त्यावर बीड व लातूर अशा पोलिसांच्या दोन हद्दी आहेत. बीड जिल्ह्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याची हद्द तर लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलीस ठाण्याची हद्द. या दोन पोलीस ठाण्यांचा प्रामुख्याने आधार घ्यावा लागतो. जर एखादी दुर्घटना घडली तर जवळचे पोलीस ठाणे गाठल्यास ते आमच्या हद्दीत येत नाही, अशी उडवाउडवीचे उत्तरे देऊन मदत टाळली जाते. त्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना पुन्हा दूरचा पल्ला पार करीत पाहिजे ते पोलीस ठाणे गाठावे लागते. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सर्रासपणे सुरू आहे. याचा मोठा फटका दूरदूरच्या प्रवाशांना प्रवास करतांना झालेला आहे. या दोन्ही हद्दीतील पोलीस अधिकारीही प्रवाशांना मदत करण्यासाठी धजावत नसल्याने प्रवाशांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होतात. या अडचणी कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पोलिसांच्या हद्दीत फलक लावावेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होईल. अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी केली आहे.