शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता

By admin | Updated: October 25, 2014 23:49 IST

बीड : जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी तब्बल ६० टक्के क्षेत्रावर लागवड झालेल्या कापसाच्या पिकाचे पावसाने ताण दिल्यामुळे तब्बल ३० ते ४० टक्याच्या पुढे उत्पादनात घट येण्याची

बीड : जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी तब्बल ६० टक्के क्षेत्रावर लागवड झालेल्या कापसाच्या पिकाचे पावसाने ताण दिल्यामुळे तब्बल ३० ते ४० टक्याच्या पुढे उत्पादनात घट येण्याची शक्यता शेती तज्ज्ञातून व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे़ अवेळी पावसाचा फटका सोयाबीनलाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे़बीड जिल्ह्यातील एकुण वहिती जमिनीपैकी ८२ टक्के जमीन कोरडवाहू आहे़ त्यातच यंदा अवेळी पडलेला पाऊस आणि कमी प्रमाण यामुळे ६० टक्के क्षेत्रावर लागवड केलेल्या कपासीची मोठी वाताहात झाली आहे़ हंगामाच्या सुरूवातीला पावसाने आखडता हात घेतल्याने कपाशीची वाढ जोमाने झाली नाही़ त्यातच बोंडे भरण्याच्या काळात पावसाने ताण दिल्याने एका कपाशीच्या झाडाला सात ते आठ बोंडाच्यावर फळ धारणा झालेली नाही़त्यातच रस शोषणारे किड, मिलीबग याचा मोठा प्रादुर्भाव कपाशीवर झाल्याने शेतकऱ्यांना किडरोग व्यवस्थापनासाठी अतिरीक्त खर्च करायची वेळी आली आहे़ पाच पाच फवारण्या करूनही कपाशीची वाढ म्हणावी तशी झाली नाही़, असे उदंड वडगावचे शेतकरी कैलास चव्हाण यांनी सांगितले़ सोयाबीन या पिकाचीही मोठी वाताहात झाली आहे़ अवेळी पडलेल्या पावसाने सोयाबीनची सुरूवातीला जोमाने वाढ झाली, परंतू फळधारणा होण्याच्या काळात पाणी कमी पडल्याने फुलगळती झाली़ त्यामुळे सोयाबीन उत्पादकांनाही मोठा फटका बसणार आहे़ कापसाचे उत्पादन सरासरी एकरी दोन ते तीन क्विंटलच्या पुढे जाणार नाही, असा अंदाज शेतीतज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी व्यक्त केला़ सोयाबीनचे उत्पादनही घटून एक ते तीन क्विंटलच्या पुढे उतारा मिळणार नाही़, अशी परिस्थिती आहे़ कापूस उत्पादकांना उत्पादनात तब्बल ३० ते ४० टक्क्यांची झळ सोसावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ सोयाबीनची मोठी लागवड केली जात असलेल्या परळी, अंबाजोगाई, धारूर या तालुक्यातही पावसाने अखडता हात घेतल्याने सोयाबीनच्या एका झाडाला १० ते २० शेंगाच्या वर फळधारणा झालेली नाही़ त्यामुळे त्या भागातील सोयाबीन उत्पादक मोठ्या चिंतेत आहेत़ (वार्ताहर)