शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता

By admin | Updated: October 25, 2014 23:49 IST

बीड : जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी तब्बल ६० टक्के क्षेत्रावर लागवड झालेल्या कापसाच्या पिकाचे पावसाने ताण दिल्यामुळे तब्बल ३० ते ४० टक्याच्या पुढे उत्पादनात घट येण्याची

बीड : जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी तब्बल ६० टक्के क्षेत्रावर लागवड झालेल्या कापसाच्या पिकाचे पावसाने ताण दिल्यामुळे तब्बल ३० ते ४० टक्याच्या पुढे उत्पादनात घट येण्याची शक्यता शेती तज्ज्ञातून व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे़ अवेळी पावसाचा फटका सोयाबीनलाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे़बीड जिल्ह्यातील एकुण वहिती जमिनीपैकी ८२ टक्के जमीन कोरडवाहू आहे़ त्यातच यंदा अवेळी पडलेला पाऊस आणि कमी प्रमाण यामुळे ६० टक्के क्षेत्रावर लागवड केलेल्या कपासीची मोठी वाताहात झाली आहे़ हंगामाच्या सुरूवातीला पावसाने आखडता हात घेतल्याने कपाशीची वाढ जोमाने झाली नाही़ त्यातच बोंडे भरण्याच्या काळात पावसाने ताण दिल्याने एका कपाशीच्या झाडाला सात ते आठ बोंडाच्यावर फळ धारणा झालेली नाही़त्यातच रस शोषणारे किड, मिलीबग याचा मोठा प्रादुर्भाव कपाशीवर झाल्याने शेतकऱ्यांना किडरोग व्यवस्थापनासाठी अतिरीक्त खर्च करायची वेळी आली आहे़ पाच पाच फवारण्या करूनही कपाशीची वाढ म्हणावी तशी झाली नाही़, असे उदंड वडगावचे शेतकरी कैलास चव्हाण यांनी सांगितले़ सोयाबीन या पिकाचीही मोठी वाताहात झाली आहे़ अवेळी पडलेल्या पावसाने सोयाबीनची सुरूवातीला जोमाने वाढ झाली, परंतू फळधारणा होण्याच्या काळात पाणी कमी पडल्याने फुलगळती झाली़ त्यामुळे सोयाबीन उत्पादकांनाही मोठा फटका बसणार आहे़ कापसाचे उत्पादन सरासरी एकरी दोन ते तीन क्विंटलच्या पुढे जाणार नाही, असा अंदाज शेतीतज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी व्यक्त केला़ सोयाबीनचे उत्पादनही घटून एक ते तीन क्विंटलच्या पुढे उतारा मिळणार नाही़, अशी परिस्थिती आहे़ कापूस उत्पादकांना उत्पादनात तब्बल ३० ते ४० टक्क्यांची झळ सोसावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ सोयाबीनची मोठी लागवड केली जात असलेल्या परळी, अंबाजोगाई, धारूर या तालुक्यातही पावसाने अखडता हात घेतल्याने सोयाबीनच्या एका झाडाला १० ते २० शेंगाच्या वर फळधारणा झालेली नाही़ त्यामुळे त्या भागातील सोयाबीन उत्पादक मोठ्या चिंतेत आहेत़ (वार्ताहर)