शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता

By admin | Updated: October 25, 2014 23:49 IST

बीड : जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी तब्बल ६० टक्के क्षेत्रावर लागवड झालेल्या कापसाच्या पिकाचे पावसाने ताण दिल्यामुळे तब्बल ३० ते ४० टक्याच्या पुढे उत्पादनात घट येण्याची

बीड : जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी तब्बल ६० टक्के क्षेत्रावर लागवड झालेल्या कापसाच्या पिकाचे पावसाने ताण दिल्यामुळे तब्बल ३० ते ४० टक्याच्या पुढे उत्पादनात घट येण्याची शक्यता शेती तज्ज्ञातून व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे़ अवेळी पावसाचा फटका सोयाबीनलाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे़बीड जिल्ह्यातील एकुण वहिती जमिनीपैकी ८२ टक्के जमीन कोरडवाहू आहे़ त्यातच यंदा अवेळी पडलेला पाऊस आणि कमी प्रमाण यामुळे ६० टक्के क्षेत्रावर लागवड केलेल्या कपासीची मोठी वाताहात झाली आहे़ हंगामाच्या सुरूवातीला पावसाने आखडता हात घेतल्याने कपाशीची वाढ जोमाने झाली नाही़ त्यातच बोंडे भरण्याच्या काळात पावसाने ताण दिल्याने एका कपाशीच्या झाडाला सात ते आठ बोंडाच्यावर फळ धारणा झालेली नाही़त्यातच रस शोषणारे किड, मिलीबग याचा मोठा प्रादुर्भाव कपाशीवर झाल्याने शेतकऱ्यांना किडरोग व्यवस्थापनासाठी अतिरीक्त खर्च करायची वेळी आली आहे़ पाच पाच फवारण्या करूनही कपाशीची वाढ म्हणावी तशी झाली नाही़, असे उदंड वडगावचे शेतकरी कैलास चव्हाण यांनी सांगितले़ सोयाबीन या पिकाचीही मोठी वाताहात झाली आहे़ अवेळी पडलेल्या पावसाने सोयाबीनची सुरूवातीला जोमाने वाढ झाली, परंतू फळधारणा होण्याच्या काळात पाणी कमी पडल्याने फुलगळती झाली़ त्यामुळे सोयाबीन उत्पादकांनाही मोठा फटका बसणार आहे़ कापसाचे उत्पादन सरासरी एकरी दोन ते तीन क्विंटलच्या पुढे जाणार नाही, असा अंदाज शेतीतज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी व्यक्त केला़ सोयाबीनचे उत्पादनही घटून एक ते तीन क्विंटलच्या पुढे उतारा मिळणार नाही़, अशी परिस्थिती आहे़ कापूस उत्पादकांना उत्पादनात तब्बल ३० ते ४० टक्क्यांची झळ सोसावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ सोयाबीनची मोठी लागवड केली जात असलेल्या परळी, अंबाजोगाई, धारूर या तालुक्यातही पावसाने अखडता हात घेतल्याने सोयाबीनच्या एका झाडाला १० ते २० शेंगाच्या वर फळधारणा झालेली नाही़ त्यामुळे त्या भागातील सोयाबीन उत्पादक मोठ्या चिंतेत आहेत़ (वार्ताहर)