शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
8
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
9
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
10
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
11
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
12
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
13
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
14
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
15
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
16
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
17
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
18
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
19
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
20
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

मेथीची जुडी शेतकऱ्याकडून दहाला दोन, ग्राहकाच्या पदरात पंधराला एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:35 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे आवक मोठ्या ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. परंतु त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यांच्या पदरी निराशाच येत असल्याने टोमॅटोचा तर लाल चिखल करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

शहराच्या आजुबाजूला असलेल्या ग्रामीण भागातून दररोज सकाळी मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. मोरेवाडी परिसर, मोंढारोड, सायगाव नाका, आंबेडकर चौक, अण्णा भाऊ साठे चौक या ठिकाणी दररोज सकाळी भाजीपाला बाजार भरतो. गेल्या काही दिवसात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा कमी दरात हा भाजीपाला मिळत असला तरी, शेतकरी वर्गाचे मात्र मोठे नुकसान होत आहे. कष्टाने उत्पादन करूनही त्यांच्या उत्पादनास हवा तसा भाव मिळत नसल्याचे दिसत आहे.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

मोठ्या आशेने शेतात टोमॅटोची लागवड केली होती. पावसामुळे पीकही चांगले आले. पण आता टोमॅटोला २५ रुपयांपेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही.

- हनुमंत जगताप, शेतकरी

शेतात वांगी, बटाटे यासह मेथी, पालक, चुका तसेच इतर भाजीपाला लागवड केली होती. भाजीपाल्याचे उत्पादनही चांगले आले. पण आता बाजारात आवक वाढल्याने मालाला भाव नाही. अर्ध्या किमतीत मालाची विक्री करावी लागत आहे.

- रवींद्र देवरवाडे, शेतकरी

ग्राहकांच्या खिशाला झळ

बाजारात भाजीपाल्याची मोठी आवक झाली असली तरी, प्रत्यक्षात त्याचा फायदा मात्र ग्राहकांना मिळत नाही. फार तर दोन ते तीन रुपये कमी दराने हा भाजीपाला विक्री केला जात आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.

- प्रशांत शेलमुकर, अंबाजोगाई

भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे, परंतु यामध्ये शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान आहे. प्रत्यक्षात ग्राहकालाही याचा विशेष फायदा होत नाही. परंतु नुकसान होऊ नये.

- आनंद टाकळकर, अंबाजोगाई

दरात एवढा फरक का?

शेतकरी वर्गाकडून मोठे भाजीपाला विक्रेते एकाचवेळी सर्व माल खरेदी करतात. त्यावेळी बोली लावताना दर पाडून मागितले जातात. शेतकरीही एकाचवेळी सर्व माल देऊन टाकतात. परंतु हाच माल पुन्हा ग्राहकांना देताना दर वाढविला जातो. व्यापारी वाहतूक खर्च, इतर बाबी लावतात. त्याही पुढे किरकोळ विक्रेते आपलीही कमाई म्हणून दरामध्ये वाढ करतात. सामान्यांच्या खिशातून मात्र पैसे काढले जातात.

कोणत्या भाजीला काय भाव...

भाजीपाला - शेतकऱ्यांचा भाव - ग्राहकाला मिळणारा भाव

वांगी - २५ - ४०

टोमॅटो - २५ - ४०

मेथी - २० - ४०

चवळी - ३० - ६०

पालक - २० - ४०

गवारी - ४० - ६०

पत्तागोबी - ३० - ५०

हिरवी मिरची - ४० - ६०

दोडका - ४० - ६०

शेवगा - ३० - ४०

भेंडी - ३० - ५०