शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मेथीची जुडी शेतकऱ्याकडून दहाला दोन, ग्राहकाच्या पदरात पंधराला एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:35 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे आवक मोठ्या ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. परंतु त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यांच्या पदरी निराशाच येत असल्याने टोमॅटोचा तर लाल चिखल करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

शहराच्या आजुबाजूला असलेल्या ग्रामीण भागातून दररोज सकाळी मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. मोरेवाडी परिसर, मोंढारोड, सायगाव नाका, आंबेडकर चौक, अण्णा भाऊ साठे चौक या ठिकाणी दररोज सकाळी भाजीपाला बाजार भरतो. गेल्या काही दिवसात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा कमी दरात हा भाजीपाला मिळत असला तरी, शेतकरी वर्गाचे मात्र मोठे नुकसान होत आहे. कष्टाने उत्पादन करूनही त्यांच्या उत्पादनास हवा तसा भाव मिळत नसल्याचे दिसत आहे.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

मोठ्या आशेने शेतात टोमॅटोची लागवड केली होती. पावसामुळे पीकही चांगले आले. पण आता टोमॅटोला २५ रुपयांपेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही.

- हनुमंत जगताप, शेतकरी

शेतात वांगी, बटाटे यासह मेथी, पालक, चुका तसेच इतर भाजीपाला लागवड केली होती. भाजीपाल्याचे उत्पादनही चांगले आले. पण आता बाजारात आवक वाढल्याने मालाला भाव नाही. अर्ध्या किमतीत मालाची विक्री करावी लागत आहे.

- रवींद्र देवरवाडे, शेतकरी

ग्राहकांच्या खिशाला झळ

बाजारात भाजीपाल्याची मोठी आवक झाली असली तरी, प्रत्यक्षात त्याचा फायदा मात्र ग्राहकांना मिळत नाही. फार तर दोन ते तीन रुपये कमी दराने हा भाजीपाला विक्री केला जात आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.

- प्रशांत शेलमुकर, अंबाजोगाई

भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे, परंतु यामध्ये शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान आहे. प्रत्यक्षात ग्राहकालाही याचा विशेष फायदा होत नाही. परंतु नुकसान होऊ नये.

- आनंद टाकळकर, अंबाजोगाई

दरात एवढा फरक का?

शेतकरी वर्गाकडून मोठे भाजीपाला विक्रेते एकाचवेळी सर्व माल खरेदी करतात. त्यावेळी बोली लावताना दर पाडून मागितले जातात. शेतकरीही एकाचवेळी सर्व माल देऊन टाकतात. परंतु हाच माल पुन्हा ग्राहकांना देताना दर वाढविला जातो. व्यापारी वाहतूक खर्च, इतर बाबी लावतात. त्याही पुढे किरकोळ विक्रेते आपलीही कमाई म्हणून दरामध्ये वाढ करतात. सामान्यांच्या खिशातून मात्र पैसे काढले जातात.

कोणत्या भाजीला काय भाव...

भाजीपाला - शेतकऱ्यांचा भाव - ग्राहकाला मिळणारा भाव

वांगी - २५ - ४०

टोमॅटो - २५ - ४०

मेथी - २० - ४०

चवळी - ३० - ६०

पालक - २० - ४०

गवारी - ४० - ६०

पत्तागोबी - ३० - ५०

हिरवी मिरची - ४० - ६०

दोडका - ४० - ६०

शेवगा - ३० - ४०

भेंडी - ३० - ५०