शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मेथीची जुडी शेतकऱ्याकडून दहाला दोन, ग्राहकाच्या पदरात पंधराला एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:35 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे आवक मोठ्या ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. परंतु त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यांच्या पदरी निराशाच येत असल्याने टोमॅटोचा तर लाल चिखल करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

शहराच्या आजुबाजूला असलेल्या ग्रामीण भागातून दररोज सकाळी मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. मोरेवाडी परिसर, मोंढारोड, सायगाव नाका, आंबेडकर चौक, अण्णा भाऊ साठे चौक या ठिकाणी दररोज सकाळी भाजीपाला बाजार भरतो. गेल्या काही दिवसात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा कमी दरात हा भाजीपाला मिळत असला तरी, शेतकरी वर्गाचे मात्र मोठे नुकसान होत आहे. कष्टाने उत्पादन करूनही त्यांच्या उत्पादनास हवा तसा भाव मिळत नसल्याचे दिसत आहे.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

मोठ्या आशेने शेतात टोमॅटोची लागवड केली होती. पावसामुळे पीकही चांगले आले. पण आता टोमॅटोला २५ रुपयांपेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही.

- हनुमंत जगताप, शेतकरी

शेतात वांगी, बटाटे यासह मेथी, पालक, चुका तसेच इतर भाजीपाला लागवड केली होती. भाजीपाल्याचे उत्पादनही चांगले आले. पण आता बाजारात आवक वाढल्याने मालाला भाव नाही. अर्ध्या किमतीत मालाची विक्री करावी लागत आहे.

- रवींद्र देवरवाडे, शेतकरी

ग्राहकांच्या खिशाला झळ

बाजारात भाजीपाल्याची मोठी आवक झाली असली तरी, प्रत्यक्षात त्याचा फायदा मात्र ग्राहकांना मिळत नाही. फार तर दोन ते तीन रुपये कमी दराने हा भाजीपाला विक्री केला जात आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.

- प्रशांत शेलमुकर, अंबाजोगाई

भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे, परंतु यामध्ये शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान आहे. प्रत्यक्षात ग्राहकालाही याचा विशेष फायदा होत नाही. परंतु नुकसान होऊ नये.

- आनंद टाकळकर, अंबाजोगाई

दरात एवढा फरक का?

शेतकरी वर्गाकडून मोठे भाजीपाला विक्रेते एकाचवेळी सर्व माल खरेदी करतात. त्यावेळी बोली लावताना दर पाडून मागितले जातात. शेतकरीही एकाचवेळी सर्व माल देऊन टाकतात. परंतु हाच माल पुन्हा ग्राहकांना देताना दर वाढविला जातो. व्यापारी वाहतूक खर्च, इतर बाबी लावतात. त्याही पुढे किरकोळ विक्रेते आपलीही कमाई म्हणून दरामध्ये वाढ करतात. सामान्यांच्या खिशातून मात्र पैसे काढले जातात.

कोणत्या भाजीला काय भाव...

भाजीपाला - शेतकऱ्यांचा भाव - ग्राहकाला मिळणारा भाव

वांगी - २५ - ४०

टोमॅटो - २५ - ४०

मेथी - २० - ४०

चवळी - ३० - ६०

पालक - २० - ४०

गवारी - ४० - ६०

पत्तागोबी - ३० - ५०

हिरवी मिरची - ४० - ६०

दोडका - ४० - ६०

शेवगा - ३० - ४०

भेंडी - ३० - ५०