शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

स्मार्ट आवरगावची वाटचाल महाराष्ट्राला आदर्श ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST

सीईओ अजित पवार : दोन तास थांबून ग्रामस्थांशी साधला संवाद धारूर : ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांनी आपली एक ...

सीईओ अजित पवार : दोन तास थांबून ग्रामस्थांशी साधला संवाद

धारूर : ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अगदी त्याचप्रमाणे आवरगावही वाटचाल करत आहे. त्यामुळे भविष्यात आवरगाव महाराष्ट्रासाठी नक्कीच आदर्श ठरेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी व्यक्त केला. धारूर तालुक्यातील आवरगाव या स्मार्टग्रामला भेट देत ग्रामपंचायतने केलेल्या कामाचे पवार यांनी कौतुक केले. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांची उपस्थिती होती. सीईओ पवार दोन तास आवरगावमध्ये होते. यावेळी त्यांनी चांगले काम करणाऱ्या आवरगावच्या सरपंच पद्मिनीबाई जगताप, अमोल जगताप, ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे, अंगणवाडीताई नीता नखाते, आशाताई अंजली नखाते यांची प्रशंसा केली. यावेळी पवार यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली. गावातील नियोजन पाहून त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. गावाला मिळालेला पुरस्कार आणि त्या पुरस्काराची रक्कमही तत्काळ मिळवून देऊ, असे आश्वासन यावेळी पवार यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी ज्येष्ठ नागरिक सर्जेराव जगताप, डिंगाबर नखाते, अजित जगताप, लालासाहेब जगताप, बालासाहेब नखाते, कुलदीप जगताप, पुष्पराज जगताप, महादेव जगताप, राहुल नखाते, राहुल जगताप, महेश नखाते, मनोज नखाते, विनोद नखाते, बळवंत नखाते, सुरेंद्र नखाते, उत्तम लोखंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Template

Image Attachment

Photo Manager

Social Media

Metadata

Attach Document

Translate

Backup

Agency

QrCode

Attch Audio/Video

030921\063803_2_bed_12_03092021_14.jpeg

आवरगाव