शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

३३ वर्षांपूर्वी चोरी झालेले दागिने परत मिळाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:32 IST

अनिल गायकवाड कुसलंब - नेहमी म्हटले जाते, ज्यांच्या नशिबात जी गोष्ट असेल ती काहीही झाले तरी परत मिळतेच. ...

अनिल गायकवाड

कुसलंब - नेहमी म्हटले जाते, ज्यांच्या नशिबात जी गोष्ट असेल ती काहीही झाले तरी परत मिळतेच. नशिबातील गोष्ट कधीही हिरावली जाऊ शकत नाही, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा एका घटनेच्या निमित्ताने आला. पाटोदा तालुक्यातील निरगुडी येथील एका महिलेचे तब्बल ३३ वर्षांपूर्वी चोरीला गेलेले मंगळसूत्रातील मणी आता ३३ वर्षांनंतर पुन्हा परत मिळाले आहेत.

प्रलंबित जुन्या गुन्ह्यांमधील मुद्देमालांची प्रकरणे निकाली काढताना पाटोद्याचे एपीआय महेश आंधळे व त्यांच्या टीमने या महिलेचा शोध घेऊन चोरीला गेलेले दागिने त्यांच्याकडे सुपूर्द केले .

२७ जून १९८८ रोजी पाटोदा तालुक्यातील निरगुडी येथील आशाबाई विठ्ठल गायकवाड (त्यावेळी वय २२ वर्षे) या आपल्या पतीसह निरगुडी परिसरातून जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या पतीला मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचे मणी हिसकावून घेतले. यानंतर आशाबाई गायकवाड यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन याविषयी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यावेळी आरोपींविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. हे प्रकरण पुढे न्यायालयात गेले व पुढील प्रक्रिया झाली, परंतु यादरम्यान आशाबाई गायकवाड या कामानिमित्त आपले गाव सोडून दुसरीकडे स्थायिक झाल्या. त्यावेळी पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल त्यांना परत देण्यासाठी त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा शोध लागला नाही. पुढे पोलिसांकडे प्रलंबित मुद्देमालांच्या यादीत हे दागिने पडून राहिले. पोलिसांकडे गुन्ह्यांमध्ये पडून असलेल्या मुद्देमालाचे प्रत्येकवर्षी व्हॅल्युएशन केले जाते. सध्या पोलीस अधीक्षक आर. राजा व डीवायएसपी विजय लगारे यांच्या आदेशानुसार अशाप्रकारची प्रलंबित जुनी प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार एपीआय महेश आंधळे यांनी या ३३ वर्षांपूर्वीच्या घटनेतील मुद्देमाल संबंधित महिलेला परत मिळावा, यासाठी आपल्या टीमसह त्या महिलेचा शाेध सुरू केला.

ए. एस. आय. येवले, पोलीस नाईक सुभाष मोठे, अशाेक तांबे, बळीराम कातखडे, बाळू सानप आदी कर्मचाऱ्यांनी या महिलेच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले. ही महिला सध्या बीड या ठिकाणी वास्तव्यास असल्याची व एका कारखान्यावर काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या महिलेला पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन आपले दागिने घेऊन जा, असे सांगितले. सदर घटनेला ३३ वर्षे होऊन गेल्याने आशाबाई गायकवाड यांना त्याचा विसरही पडला होता. मात्र पाटोदा पोलिसांच्या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा त्यांची अमानत त्यांना परत मिळाली. शुक्रवारी त्या पाटोदा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या व सर्व शहानिशा करून पोलिसांनी त्यांना त्यांचे दागिने परत केले. इतक्या वर्षांनंतर आपले दागिने परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला.

पोलिसांकडे गुन्ह्यांमध्ये पडून असलेल्या मुद्देमालाचे प्रत्येकवर्षी व्हॅल्युएशन केले जाते. सध्या वरिष्ठांच्या आदेशानुसार अशा प्रकारची प्रलंबित जुनी प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्येच हे १९८८ मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल अजूनही ठाण्यातच असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांना त्यांचे दागिने परत सुपूर्द केले.

महेश आंधळे, स. पो. निरीक्षक, पाटोदा