शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

३३ वर्षांपूर्वी चोरी झालेले दागिने परत मिळाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:32 IST

अनिल गायकवाड कुसलंब - नेहमी म्हटले जाते, ज्यांच्या नशिबात जी गोष्ट असेल ती काहीही झाले तरी परत मिळतेच. ...

अनिल गायकवाड

कुसलंब - नेहमी म्हटले जाते, ज्यांच्या नशिबात जी गोष्ट असेल ती काहीही झाले तरी परत मिळतेच. नशिबातील गोष्ट कधीही हिरावली जाऊ शकत नाही, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा एका घटनेच्या निमित्ताने आला. पाटोदा तालुक्यातील निरगुडी येथील एका महिलेचे तब्बल ३३ वर्षांपूर्वी चोरीला गेलेले मंगळसूत्रातील मणी आता ३३ वर्षांनंतर पुन्हा परत मिळाले आहेत.

प्रलंबित जुन्या गुन्ह्यांमधील मुद्देमालांची प्रकरणे निकाली काढताना पाटोद्याचे एपीआय महेश आंधळे व त्यांच्या टीमने या महिलेचा शोध घेऊन चोरीला गेलेले दागिने त्यांच्याकडे सुपूर्द केले .

२७ जून १९८८ रोजी पाटोदा तालुक्यातील निरगुडी येथील आशाबाई विठ्ठल गायकवाड (त्यावेळी वय २२ वर्षे) या आपल्या पतीसह निरगुडी परिसरातून जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या पतीला मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचे मणी हिसकावून घेतले. यानंतर आशाबाई गायकवाड यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन याविषयी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यावेळी आरोपींविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. हे प्रकरण पुढे न्यायालयात गेले व पुढील प्रक्रिया झाली, परंतु यादरम्यान आशाबाई गायकवाड या कामानिमित्त आपले गाव सोडून दुसरीकडे स्थायिक झाल्या. त्यावेळी पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल त्यांना परत देण्यासाठी त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा शोध लागला नाही. पुढे पोलिसांकडे प्रलंबित मुद्देमालांच्या यादीत हे दागिने पडून राहिले. पोलिसांकडे गुन्ह्यांमध्ये पडून असलेल्या मुद्देमालाचे प्रत्येकवर्षी व्हॅल्युएशन केले जाते. सध्या पोलीस अधीक्षक आर. राजा व डीवायएसपी विजय लगारे यांच्या आदेशानुसार अशाप्रकारची प्रलंबित जुनी प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार एपीआय महेश आंधळे यांनी या ३३ वर्षांपूर्वीच्या घटनेतील मुद्देमाल संबंधित महिलेला परत मिळावा, यासाठी आपल्या टीमसह त्या महिलेचा शाेध सुरू केला.

ए. एस. आय. येवले, पोलीस नाईक सुभाष मोठे, अशाेक तांबे, बळीराम कातखडे, बाळू सानप आदी कर्मचाऱ्यांनी या महिलेच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले. ही महिला सध्या बीड या ठिकाणी वास्तव्यास असल्याची व एका कारखान्यावर काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या महिलेला पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन आपले दागिने घेऊन जा, असे सांगितले. सदर घटनेला ३३ वर्षे होऊन गेल्याने आशाबाई गायकवाड यांना त्याचा विसरही पडला होता. मात्र पाटोदा पोलिसांच्या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा त्यांची अमानत त्यांना परत मिळाली. शुक्रवारी त्या पाटोदा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या व सर्व शहानिशा करून पोलिसांनी त्यांना त्यांचे दागिने परत केले. इतक्या वर्षांनंतर आपले दागिने परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला.

पोलिसांकडे गुन्ह्यांमध्ये पडून असलेल्या मुद्देमालाचे प्रत्येकवर्षी व्हॅल्युएशन केले जाते. सध्या वरिष्ठांच्या आदेशानुसार अशा प्रकारची प्रलंबित जुनी प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्येच हे १९८८ मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल अजूनही ठाण्यातच असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांना त्यांचे दागिने परत सुपूर्द केले.

महेश आंधळे, स. पो. निरीक्षक, पाटोदा