शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

राजकीय भाऊबंदकीवर आयजींची चौफेर टोलेबाजी !

By admin | Updated: March 17, 2017 00:20 IST

बीड : पोलीस जनतेचाच एक भाग आहे. जनतेचे प्रतिबिंब पोलिसांमध्ये उमटत असते.

बीड : पोलीस जनतेचाच एक भाग आहे. जनतेचे प्रतिबिंब पोलिसांमध्ये उमटत असते. पोलीस व जनतेत सुसंवादाचा अभाव आहे, अशी खंत व्यक्त करुन कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा दुरावा कमी झाला पाहिजे असे प्रतिपादन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी केले.अजित पाटील यांनी जिल्ह्यातील राजकीय भाऊबंदकी व पोलिसांवर येणाऱ्या ताणाची जाहीर कबुली देत चौफेर टोलेबाजी केली. बीडची प्रतिमा गुन्हेगारीमुळे मलिन झाली होती. मात्र, आता मुंबईनंतर बीड पोलिसांचे नाव निघत असल्याचे डॉ. योगेश क्षीसागर भाषणात म्हणाले होते. त्याचा धागा पकडून पाटील म्हणाले, या मताशी मी सहमत आहे. कारण मुंबईनंतर परळीत काका- पुतण्यात दरी निर्माण झाली. गेवराई व बीडही त्याला अपवाद राहिले नाही. नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका शांततेत पार पडतील की नाही? याची मला अधिक काळजी होती, अशी जाहीर कबुली देतानाच पाटील यांनी अधीक्षक श्रीधर यांनी सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. पदाधिकाऱ्यांनी ठरवले तर बीडमध्ये प्रत्येक कार्यक्रम डीजेशिवाय होऊ शकतो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के वाटा आहे. मात्र, स्वतंत्रपणे काम करु दिले जात नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. महिलांना अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाण्यांचा कारभार त्यांना देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.जुन्या अधीक्षक कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घाणीचे ढिगारे असतात. त्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच पाटील यांनी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांची पाटी कोरी आहे. त्यांनी स्वच्छतेचा ध्यास घेऊन शहर चांगले करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.पालिकेच्या स्वच्छतेविषयक कार्यक्रमास मी आवर्जून उपस्थित राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. आयजी म्हणून हे सर्व सांगण्याचा मला अधिकार असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. हशा अन् टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रम आटोपला.