शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

राजकीय भाऊबंदकीवर आयजींची चौफेर टोलेबाजी !

By admin | Updated: March 17, 2017 00:20 IST

बीड : पोलीस जनतेचाच एक भाग आहे. जनतेचे प्रतिबिंब पोलिसांमध्ये उमटत असते.

बीड : पोलीस जनतेचाच एक भाग आहे. जनतेचे प्रतिबिंब पोलिसांमध्ये उमटत असते. पोलीस व जनतेत सुसंवादाचा अभाव आहे, अशी खंत व्यक्त करुन कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा दुरावा कमी झाला पाहिजे असे प्रतिपादन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी केले.अजित पाटील यांनी जिल्ह्यातील राजकीय भाऊबंदकी व पोलिसांवर येणाऱ्या ताणाची जाहीर कबुली देत चौफेर टोलेबाजी केली. बीडची प्रतिमा गुन्हेगारीमुळे मलिन झाली होती. मात्र, आता मुंबईनंतर बीड पोलिसांचे नाव निघत असल्याचे डॉ. योगेश क्षीसागर भाषणात म्हणाले होते. त्याचा धागा पकडून पाटील म्हणाले, या मताशी मी सहमत आहे. कारण मुंबईनंतर परळीत काका- पुतण्यात दरी निर्माण झाली. गेवराई व बीडही त्याला अपवाद राहिले नाही. नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका शांततेत पार पडतील की नाही? याची मला अधिक काळजी होती, अशी जाहीर कबुली देतानाच पाटील यांनी अधीक्षक श्रीधर यांनी सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. पदाधिकाऱ्यांनी ठरवले तर बीडमध्ये प्रत्येक कार्यक्रम डीजेशिवाय होऊ शकतो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के वाटा आहे. मात्र, स्वतंत्रपणे काम करु दिले जात नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. महिलांना अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाण्यांचा कारभार त्यांना देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.जुन्या अधीक्षक कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घाणीचे ढिगारे असतात. त्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच पाटील यांनी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांची पाटी कोरी आहे. त्यांनी स्वच्छतेचा ध्यास घेऊन शहर चांगले करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.पालिकेच्या स्वच्छतेविषयक कार्यक्रमास मी आवर्जून उपस्थित राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. आयजी म्हणून हे सर्व सांगण्याचा मला अधिकार असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. हशा अन् टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रम आटोपला.