शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

माजलगाव शहरात लॉकडाऊन आहे की नाही कळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कारखेड़ा माजलगाव : शहरात लॉकडाऊन लागू असताना गल्लीबोळातील दुकाने मात्र उघडी ठेवली जात असून, आईसक्रीम विक्रेते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कारखेड़ा माजलगाव : शहरात लॉकडाऊन लागू असताना गल्लीबोळातील दुकाने मात्र उघडी ठेवली जात असून, आईसक्रीम विक्रेते उघडपणे व्यवसाय करत आहेत. तर शहरातील नागरिकही खुलेआम फिरत असताना पोलीस किंवा नेमलेल्या पथकाकडून त्यांना साधे हटकलेही जात नाही. यामुळे नागरिकच नियमांचे पालन करत नसतील तर या लॉकडाऊनचा काय फायदा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बीड जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे तसेच नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे प्रशासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊन केला. संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू असताना माजलगाव शहरात नागरिक बिनधास्त फिरत आहेत. शहरातील गल्लीबोळातील दुकाने खुलेआम सुरू असतात. शहरात रात्रीच्या वेळी जागोजागी गाडे लावून आईस्क्रीम विक्रेते आपला व्यवसाय करताना दिसत आहेत तर नागरिकही खरेदी निमित्ताने घराबाहेर पडत आहेत.

बाहेरगावाहून येणाऱ्या तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना कोणीही हटकताना दिसत नसून, ते बिनदिक्कत शहरात येत आहेत. याकडे पोलिसांचे व नगरपालिकेने नेमलेल्या पथकाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. रात्रीच्या वेळी शहरात अनेक ठिकाणी मुले घोळका करून थांबलेली पाहायला मिळतात. यामुळे एकमेकांचा संपर्क कमी होण्याऐवजी वाढताना दिसून येत आहे. यामुळे माजलगाव शहरात लॉकडाऊन आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलीस व पथके नावालाच

माजलगाव शहरात गल्लीबोळातील दुकाने खुलेआम सुरू असताना व नागरिक दिवस - रात्र बिनधास्त फिरत असताना एकाही चौकात पोलीस किंवा नगरपालिकेने नेमलेल्या पथकातील कर्मचारी दिसून येत नाहीत. यामुळे माजलगाव शहरात ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती आहे. तर मोंढ्यात गर्दी होत असताना एकही पोलीस फिरकत नाही. हॉटेलवाल्यांना केवळ पार्सल देण्याची मुभा दिलेली असताना येथे अनेक हॉटेल, पुरीभाजी सेंटर, चहाची हॉटेल येथे नागरिक बिनधास्त येवून बसून जेवण करत होते. त्यामुळे नेमलेली पथके आपले काम करत आहेत की नाहीत, याबाबत येथील तहसीलदार अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली

शहरात विविध व्यवसाय करणारे व्यापारी आपली दुकाने उघडून जेव्हा ग्राहक करतात, तेव्हा निम्म्यापेक्षा जास्त व्यापारी, हातगाडीवाले, फळविक्रेते, हॉटेल चालक व तेथे काम करणारे कामगार विनामास्क वावरत असतानाही नगरपालिकेने नेमलेले पथक यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही.

शहरात नागरिक फिरत असतील व मास्क न वापरता व्यापारी दुकाने उघडत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस व नेमलेल्या पथकाला सांगण्यात येईल.

- वैशाली पाटील, तहसीलदार

===Photopath===

310321\purusttam karva_img-20210331-wa0004_14.jpg~310321\purusttam karva_img-20210331-wa0002_14.jpg