शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

धारूर तालुक्यातील सिंचन प्रकल्पामुळे तालुका हरितक्रांतीकडे; ऊसतोड कामगारांचे कोयते जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

अनिल महाजन धारूर : धारूर तालुक्याची डोंगराळ तालुका व ऊसतोड कामगार पुरवणारा तालुका म्हणून ओळख. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत ...

अनिल महाजन

धारूर : धारूर तालुक्याची डोंगराळ तालुका व ऊसतोड कामगार पुरवणारा तालुका म्हणून ओळख. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत झालेल्या विविध साठवण तलावांमुळे लाखो लिटर पाणी अडवण्यात यश आल्याने हा तालुका आता हरितक्रांतीच्या दिशेने वाटचाल करत असून, हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे. काही ऊसतोड कामगारांच्या हातचा कोयता यामुळे सुटणार आहे.

धारूर तालुका हा डोंगराळ दुष्काळी तालुका. या तालुक्यात खरिपाचे एक पीक पावसाच्या भरवशावर घ्यायचे. पुढे सहा महिने राज्यात, शेजारील राज्यात ऊस तोडायला जायचे. यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. ऊसतोड कामगार पुरवणारा तालुका, अशी ओळख या तालुक्याची सर्वत्र होती. मात्र, या तालुक्यात पावसाचे पडणारे पाणी डोंगर भागात कुठेही अडवल्या न गेल्याने हे सरळ नदीपात्रात वाहून जात होते. मात्र, १९९५ च्या युती शासनाच्या काळात या तालुक्यात चारदरी, घागरवाडा, धारूर साठवण तलाव झाले व मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणीच अडवले गेले. त्यानंतरच्या काळात बऱ्याच वर्षांपासून मागणी असलेले खोडस व मोरफळी साठवण तलाव हेही पूर्ण झाल्याने या ठिकाणीही पाणी अडवले गेले व या भागात शेती सिंचनाखाली येण्यास मोठी मदत झाली.

आंबेवडगाव येथे असणारा कुंडलिका साठवण तलाव हा तर आसपासच्या दहा गावांना मोठा आधार ठरला, तर मोहखेड येथील सरस्वती मध्यम प्रकल्प रेपेवाडी येथील साठवण तलाव या भागात मोठा आधार ठरला. अरणवाडी साठवण तलावामुळे डोंगरातील गावांत बदल होणार आहे. हे मोठे साठवण तलाव व आता होणारा पिंपरवाडा साठवण तलाव, त्याचप्रमाणे डोंगरदऱ्यांत झालेले छोटे-मोठे पाझर तलाव यामुळे मोठ्या प्रमाणात या तालुक्यातले पाणी या तालुक्यात अडवले गेले.

डोंगरपट्ट्यात हरितक्रांती झाल्याचे आज दिसून येत आहे व यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही संख्या वाढली. भाजीपाला उत्पादक शेतकरीही वाढले. त्याचप्रमाणे नगदी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कलही वाढल्याचे दिसून येते.

या तालुक्यात सिंचनाचे प्रकल्प वाढल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन झाला व या भागातील अनेक ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयते जाऊन त्यांचीही शेती ओलिताखाली आली. तालुका हा हरितक्रांतीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. यापुढील काळात यापेक्षा मोठे बदल तालुक्यात झालेले दिसून येणार आहेत.

140821\14bed_6_14082021_14.jpg