शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

ग्रामस्थांनीच घेतला पुढाकार, प्रथमच बिनविरोधसाठी यशस्वी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:28 IST

परळी : गावकऱ्यांनी ठरविल्यामुळेच तालुक्यातील रेवली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. गावातील सदस्य पदाच्या ...

परळी : गावकऱ्यांनी ठरविल्यामुळेच तालुक्यातील रेवली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. गावातील सदस्य पदाच्या एकूण ९ जागांपैकी ८ जागा बिनविरोध झाल्यात जमा आहेत. या ८ जागांसाठी केवळ ८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता निवडणूक बिनविरोध झाल्याची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. गावच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. विकासासाठी व गावात गेल्या पाच वर्षांत झालेल्या परिवर्तनामुळे ग्रामस्थांनी रेवली ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निश्चय केला. त्यादृष्टीने सर्वांनीच केलेल्या प्रयत्नांना बहुतांश प्रमाणात यश आले असून, केवळ एका जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.

परळी तालुक्यातील सिरसाळ्यापासून जवळच असलेल्या रेवली गावाची मतदार संख्या अडीच हजारांच्या आसपास असून, या गावात पाचशेच्या जवळपास घरे आहेत. दुष्काळी भागातील रेवलीत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. उत्पन्नाचे साधनही मोठे नव्हते. परंतु, गेल्या पाच वर्षात सरपंच मनोहर केदार यांनी सर्वांना विश्वासात घेऊन सिंचनाचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. गावात अमूलाग्र बदल घडवून आणला. रेवली शिवारात जमिनीत पावसाच्या पाण्याचे नियोजन केले. चर खोदले तसेच बंधारे बांधल्यामुळे सिंचन क्षमता वाढली. शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड सुरू केली. पिण्याच्या पाण्यासाठी भारत निर्माण योजनेतून प्रयत्न केले. ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. जिल्हा परिषद शाळा सुधारण्याचाही प्रयत्न केला. अंगणवाडी बांधली, गावात रस्ते केले. रेवली डाक तांडा रस्त्याचे कामही केले. यामुळे ग्रामस्थांनी सरपंच केदार यांच्या कामावर विश्वास व्यक्त करत यावेळची निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले.

नऊपैकी आठ जागा बिनविरोध

बिनविरोध उमेदवारांमध्ये रेखा मनोहर केदार, वैजनाथ माणिक कांदे ,आशा कांदे, शकुंतला रतन कवडे, अण्णासाहेब शत्रुघ्न मोठे, आशा उत्तम उपाडे, सुनिता ज्योतीनाथ कांदे, शेषराव लक्ष्मण बनसोडे यांचा समावेश आहे. नऊपैकी आठ जागा बिनविरोध झाल्याने गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत परळी तहसील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला.