शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

ग्रामस्थांनीच घेतला पुढाकार, प्रथमच बिनविरोधसाठी यशस्वी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:28 IST

परळी : गावकऱ्यांनी ठरविल्यामुळेच तालुक्यातील रेवली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. गावातील सदस्य पदाच्या ...

परळी : गावकऱ्यांनी ठरविल्यामुळेच तालुक्यातील रेवली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. गावातील सदस्य पदाच्या एकूण ९ जागांपैकी ८ जागा बिनविरोध झाल्यात जमा आहेत. या ८ जागांसाठी केवळ ८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता निवडणूक बिनविरोध झाल्याची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. गावच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. विकासासाठी व गावात गेल्या पाच वर्षांत झालेल्या परिवर्तनामुळे ग्रामस्थांनी रेवली ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निश्चय केला. त्यादृष्टीने सर्वांनीच केलेल्या प्रयत्नांना बहुतांश प्रमाणात यश आले असून, केवळ एका जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.

परळी तालुक्यातील सिरसाळ्यापासून जवळच असलेल्या रेवली गावाची मतदार संख्या अडीच हजारांच्या आसपास असून, या गावात पाचशेच्या जवळपास घरे आहेत. दुष्काळी भागातील रेवलीत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. उत्पन्नाचे साधनही मोठे नव्हते. परंतु, गेल्या पाच वर्षात सरपंच मनोहर केदार यांनी सर्वांना विश्वासात घेऊन सिंचनाचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. गावात अमूलाग्र बदल घडवून आणला. रेवली शिवारात जमिनीत पावसाच्या पाण्याचे नियोजन केले. चर खोदले तसेच बंधारे बांधल्यामुळे सिंचन क्षमता वाढली. शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड सुरू केली. पिण्याच्या पाण्यासाठी भारत निर्माण योजनेतून प्रयत्न केले. ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. जिल्हा परिषद शाळा सुधारण्याचाही प्रयत्न केला. अंगणवाडी बांधली, गावात रस्ते केले. रेवली डाक तांडा रस्त्याचे कामही केले. यामुळे ग्रामस्थांनी सरपंच केदार यांच्या कामावर विश्वास व्यक्त करत यावेळची निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले.

नऊपैकी आठ जागा बिनविरोध

बिनविरोध उमेदवारांमध्ये रेखा मनोहर केदार, वैजनाथ माणिक कांदे ,आशा कांदे, शकुंतला रतन कवडे, अण्णासाहेब शत्रुघ्न मोठे, आशा उत्तम उपाडे, सुनिता ज्योतीनाथ कांदे, शेषराव लक्ष्मण बनसोडे यांचा समावेश आहे. नऊपैकी आठ जागा बिनविरोध झाल्याने गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत परळी तहसील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला.