शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

महागाई दुप्पट अन् मजुरीत केवळ २३ रुपये वाढ; रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणे परवडेना

By शिरीष शिंदे | Updated: April 5, 2024 12:52 IST

महाराष्ट्र रोजगार ग्रामीण योजना अर्थात मनरेगा ही केंद्र व राज्य शासन यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे.

बीड : महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या संदर्भाने नुकतेच गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यात मजुरीसाठीचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या गोवा राज्यात प्रती दिन मजुरी ३५६ आहे, परंतु राज्यात मजुरी दर २९७ आहे. राज्यासह बीड जिल्ह्यातील मजुरीमध्ये केवळ २३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महागाईच्या जमान्यात रोहयो कामावर जाणे परवडत नसल्याचे मजुरांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र रोजगार ग्रामीण योजना अर्थात मनरेगा ही केंद्र व राज्य शासन यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना सुरू करताना अनेक बाबी डोळ्यासमोर ठेवल्या गेल्या. गावातच जलसंधारणाची कामे, बांधबंदिस्ती दुरुस्ती, भूमिगत पाट, मातीची धरणे, समतल चर, मजगी घालणे, दगडी संरोधक, सिंचन कालवे, सिंचन तलाव, जलाशयांचे नूतनीकरण यासह अनेक कामे मनरेगा योजनांतर्गत केली जात आहेत. या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसादही मिळत आहे. मजुरी कमी असली तर कामाची हमी असल्याने अनेक जण या कामावर जात आहेत. बहुतांश वेळा काम करूनही मजुरी वेळेवर मिळत नसल्याची प्रकरणे मागच्या काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. आधीच मजुरी कमी त्यात विलंब यामुळे मजुरांची कोंडी होत आहे. वास्तविकत: मजुरीमध्ये भरघोस वाढ करणे अपेक्षित होते. परंतु, कमी वाढ करून एका प्रकारे मजुरांची थट्टाच केली जात आहे. महागाई वाढत असल्याने गोरगरिबांना जीवन जगणे कठीण झाले आहे. हाताला काम पाहिजे हे सत्य असले तरी दिवसभर राबून मोजकेच रुपये मिळत असतील तर कशामुळे रोहयो कामावर जावे, असा प्रश्न मजुरांपुढे निर्माण झाला आहे.

कामावर जावे की नाही महागाई वाढत चालली आहे, परंतु मजुरीमध्ये फारशी वाढ होत नसल्याने कामावर जावे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकामावर गेल्यास प्रती दिन मजुरी ३०० रुपयापेक्षा अधिक मिळते. रोहयोची मजुरी अधिक वाढली पाहिजे.-संजय काळे, धानोरा

मजुरीत वाढ करारोजगाराची हमी आहे, गावाच्या जवळ किंवा गावातच काम मिळत असल्याने ही योजना लाभदायक आहे. परंतु, अकुशल मजुरी फारच कमी आहे. आजच्या घडीला प्रत्येक गोष्ट महागली आहे. घराबाहेर पडले की खर्चाला सुरुवात होते. त्यामुळे मजुरीत वाढ झाली पाहिजे.-अलका कुदळे, येळंबघाट

प्रत्येक राज्याचा दर वेगवेगळाएका अधिकाऱ्याने सांगितले की, मजुरी कमी असल्याची ओरड प्रत्येक राज्यात आहे. परंतु, हे दर महागाईच्या तुलनेत कन्झ्युमर प्राइज इंडेक्सच्या कृषी मजुरीच्या आधारावर निश्चित करण्यात आलेले असतात. सध्याच्या कन्झ्युमर प्राइज इंडेक्स दर हा ७.७ असल्याने त्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक राज्याचा दर हा वेगवेगळा असल्याने त्यानुसार मजुरी वाढवली असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

असे आहेत दरराज्य- वाढलले मजुरीचे दर (रुपयांमध्ये)आंध्र प्रदेश-३००अरुणाचल प्रदेश-२३४आसाम-२४९बिहार-२४५छत्तीसगढ-२४३गोवा-३५६हरियाणा-३७४महाराष्ट्र-२९७

टॅग्स :Beedबीड