शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

ग्रामीण भागात वाढल्या विजेच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:08 IST

पावसामुळे ग्रामस्थांचे हाल अंबाजोगाई : अंबाजोगाई व परिसरात झालेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय ...

पावसामुळे ग्रामस्थांचे हाल

अंबाजोगाई : अंबाजोगाई व परिसरात झालेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय झाले असून या रस्त्यांवरून प्रवास करताना ग्रामस्थांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांची वाट लागली आहे.

‘त्या’ योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा

अंबाजोगाई : आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान योजनेचा हप्ता जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात दिले जात आहे. कोरोना संकटात शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील निधी जमा करण्यात आला.

रस्त्यावरील वाहनामुळे नागरिकांना अडचण

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने ठेवण्यात येतात. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण जात आहे. सध्या कोरोनामुळे बाजारपेठ दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे अनेकजण बाजारात गर्दी करीत आहेत. परिणामी नागरिकांना रहदारी करण्यास अडचण होत आहे. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

नवीन वस्त्यांमध्ये वीजखांब नाही

अंबाजोगाई : शहरालगत असणाऱ्या जोगाईवाडी व पोखरी परिसरात नवीन वस्त्यांमध्ये पथदिव्यांची आवश्यकता आहे. मात्र अद्यापही वीज खांब लावण्यात न आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून सदर समस्येबाबत पाठपुरावा करण्यात आला, मात्र अजूनपर्यंत वीज खांब लावण्यात आले नाही. ग्रामपंचायतीने नवीन वस्त्यांमध्ये पथदिवे लावावेत. अशी मागणी होत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे रात्री बेरात्री नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले आहे.

आरक्षित जागेवर दुसऱ्यांचाच कब्जा

अंबाजोगाई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना बसण्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. मात्र एसटी. बसमध्ये महिला बसण्यासाठी असलेल्या आरक्षणाचाच लाभ पुरुषच घेत असल्याने महिलांना अनेकवेळा उभे राहून प्रवास करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.