शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

ऊसतोड कामगार महिलांचा निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:36 IST

बीड : स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून ऊसतोड मजूर महिला कष्टप्रद कामे करतात. यामुळे त्यांचा ...

बीड : स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून ऊसतोड मजूर महिला कष्टप्रद कामे करतात. यामुळे त्यांचा निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढला पाहिजे. त्यासाठी महिला मजुरांची नोंदणी होणे गरजेचे आहे, असे मत महिला किसान अधिकार मंचच्या अध्यक्षा सीमा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

महिला किसान अधिकार मंचच्या वतीने येथे १८ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सीमा कुलकर्णी बोलत होत्या. पल्लवी हर्षे, रितिका सुब्रमण्यम, मनीषा तोकले, अशोक तांगडे, द्वारका वाघमारे, स्वाती सातपुते, हेमंत पायाळ यांची उपस्थिती होती. सीमा कुलकर्णी म्हणाल्या, बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी आहे. ६० ते ७५ टक्के कामे स्त्रियांना करावी लागतात. पुरुषांच्या मजुरीच्या तुलनेत केवळ ५० ते ७५ टक्के मजुरीच स्त्रियांना मिळते. त्यामुळे महिला मजुरांना योग्य मोबदला मिळण्यासह शिक्षण, आरोग्य व इतर सुविधांसाठी त्यांचा निर्णयप्रक्रियेत सहभाग गरजेचा आहे. त्यामुळे लवाद, ऊसतोड कामगार महामंडळ यामध्ये महिला मजुरांना प्राधान्य हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महिला मजुरांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी महिला किसान अधिकार मंचतर्फे राज्यभर काम हाती घेतले जाईल, असे त्या म्हणाल्या. मनीषा तोकले यांनी सांगितले की, महिला मजुरांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्या कधी व्यक्तच होत नाहीत. त्यामुळे महिलांचे प्रश्न व्यवस्थेला कळत नाहीत. आता मात्र मकाममुळे महिलांचा आवाज धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

...

180821\18bed_7_18082021_14.jpg

पत्रकार परिषद