शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी सुधरा; नियम पाळा, कोरोना उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST

नितीन कांबळे कडा : एप्रिलमध्ये जिल्ह्याच्या हद्दीवर कोरोनाने सुरूवात केली आणि दोन हजार पंचेचाळीस लोकांना आजवर लागण होऊन ...

नितीन कांबळे

कडा : एप्रिलमध्ये जिल्ह्याच्या हद्दीवर कोरोनाने सुरूवात केली आणि दोन हजार पंचेचाळीस लोकांना आजवर लागण होऊन बेचाळीस लोकांना जीव गमवावा लागला. एवढे होत असताना कोरोना गेला म्हणून बिनधास्त नियम तोडून फिरल्याने आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. नागरिकांनो, नियम पाळा प्रशासनाला सहकार्य करा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे आजवर रुग्ण सापडले असून मुत्यूचे प्रमाण देखील वाढले होते. नंतर कोरोना आटोक्यात आला म्हणत नियमावली शिथिल होताच नागरिक सुसाट झाले. मास्क नाही, सोशल डिस्टन्स नाही, सॅनिटायझर नाही की कसले गांभीर्य नसल्याने आता गेलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढत बाधितांचा आकडा रोजच्या रोज वाढत चालल्याने प्रशासन सक्रिय झाले असले तरी नागरिकांना कसलेच देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील जनतेला नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

काय म्हणतात अधिकारी...

चिंता वाढली असून कोरोना संसर्ग वाढतोय कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रशासन कोरोनाला थोपवण्याचा प्रयत्न करत असले तरी, म्हणावे तेवढे यश जनतेच्या निष्काळजीपणामुळे येत नाहीये. तालुका पातळीवर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून कोरोनाची धग गावकुसापर्यंत जाऊ शकते. यासाठी प्रशासनाच्या नियमाचे पालन करून सहकार्य करावे. लक्षणे दिसताच आरोग्य विभागाला कळवावे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी सांगितले.

तहसील कार्यालयात नुकतीच प्रशासनातील सर्व अधिकारी यांची बैठक घेतली असून भरारी पथके, स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांना दंड केला जाणार असून गर्दीच्या ठिकाणी वरवर लक्ष ठेवून नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना तालुकास्तरावरील प्रशासकीय अधिकारी यांना दिल्या असून जनजागृतीची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी लोकमतला सांगितले.

आष्टी,पाटोदा, शिरूर या तिनही तालुक्यात विनामास्क असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू असून जनजागृती सुरू आहे. जनतेने देखील नियमाचे पालन करावे असे आवाहन आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांनी लोकमतला सांगितले.