शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

यशस्वी व्हायचे तर मनातील जळमटे काढून टाका - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST

अंबाजोगाई : यशस्वी व्हायचे तर मनातील जळमटे काढून टाकणे आवश्यक आहेत. त्याशिवाय मनातील स्वप्ने गाठणे शक्य होत नाही, असे ...

अंबाजोगाई : यशस्वी व्हायचे तर मनातील जळमटे काढून टाकणे आवश्यक आहेत. त्याशिवाय मनातील स्वप्ने गाठणे शक्य होत नाही, असे प्रतिपादन औरंगाबाद उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ लेखा परीक्षक शरद भिंगारे यांनी केले.

येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राची सुरुवात भिंगारे यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वनमाला गुंडरे होत्या. विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे, उपप्राचार्य पी. के. जाधव, उच्च शिक्षण कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक व्ही. एस. राऊत, आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी शरद भिंगारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी घडलो. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगणे ही सर्वांत मोठी चूक असते. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेचे स्वरूप समजावून सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. शिकवण्या न लावता यश कसे प्राप्त करता येईल हा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. अंबाजोगाईचा परिसर आणि माती ही ऊर्जामय आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

प्राचार्या डॉ. वनमाला गुंडरे यांनी काळाची गरज ओळखून स्वतःला विकसित करणे हे आपल्या हाती असते. आयुष्यात ध्येय बाळगणे अतिशय महत्त्वाचे आहे, मोठे स्वप्न पाहणे व ते अंमलात आणणे हा ध्यास विद्यार्थ्यांनी कायम घेतला पाहिजे. स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून उत्तम मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. इंद्रजित भगत यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. अनंत मरकाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. दिनकर तांदळे, डॉ. मुकुंद राजपंखे, डॉ. संजय सुरेवाड, डॉ. अरविंद घोडके, डॉ. विठ्ठल केदारी, प्रा. प्रशांत जगताप, प्रा. धनाजी खेबडे, कार्यालयीन अधीक्षक सतीश एरंडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.