शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
6
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
7
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
8
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
9
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
10
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
11
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
12
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
13
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
14
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
15
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
16
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
18
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
19
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
20
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल

‘स्मशानभूमी असावी तर घाटनांदूरसारखी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

घाटनांदूर : गाव करील ते राव काय करील ? असे म्हटले जाते. मात्र, घाटनांदूर येथे नेमके उलटे घडले असून ...

घाटनांदूर : गाव करील ते राव काय करील ? असे म्हटले जाते. मात्र, घाटनांदूर येथे नेमके उलटे घडले असून ते केवळ एका व्यक्तीमुळे. माजी सैनिक बन्सीसाहेब जाधव यांच्या पुढाकारातून येथील स्मशानभूमीचा कायापालट झाला आहे. पूर्वी अंत्यविधीवेळी बाहेर गावचे नाक मुरडणारे पाहुणे आज ‘स्मशानभूमी असावी तर घाटनांदूरसारखी’ म्हणताना दिसत आहेत. प्रेक्षणीय स्थळ वाटावे इतपत स्मशानभूमीची सुधारणा करण्यात आली.

निजामकालीन जहागिरीचे गाव असलेल्या घाटनांदूर येथे मराठा समाज (पाटील, देशमुख) मोठ्या प्रमाणात आहे. पांरपरिक स्मशानभूमी गावातील रेल्वे गेटजवळ भदाडा आंबा नामक जागेत होती. सर्वत्र घाणीचे साम्राज्य, जायला धड रस्ता नव्हता. पावसाळ्यात खांदेकऱ्यांना त्रास व्हायचा. एक पाय रोवला की दुसरा काढायचा अशी बिकट अवस्था. रेल्वे पटरीने जावे तर रेल्वे, माल वाहतूक करणाऱ्या वॅगन कधी येतील याचा नेम नसे. त्यामुळे अंत्यविधीला जाणाऱ्यांचा जीव टांगणीला असायचा. अंत्यविधीला पाहुणा येणेही कठीण झाले होते. हे सर्व पाहून प्रा. सुरेश जाधव यांनी तपेश्वर मठ संस्थानाजवळ झोपडपट्टी भागातील स्वतःची विटभट्टीची जागा पाण्याच्या हौदासह स्मशानभूमीसाठी दिली. समाजाच्या निधीतून गेट बसविले आणि मृत्यूनंतर होणारी फरपट थांबली. पण कुंपण सुशोभिकरण, विकासाचे काय? वेळ कोणी द्यायचा या घोळात अनेक वर्षे गेली. अखेर माजी सैनिक तथा लक्ष्मी नारायण पतसंस्थेचे चेअरमन बन्सीसाहेब जाधव यांनी वैयक्तिक लक्ष देऊन सुरुवातीला स्वत: खर्च करत सुधारणेसाठी पुढाकार घेतला. माजी सरपंच ज्ञानोबा जाधव यांच्या सहकार्यातून रहिवाशांना विश्वासात घेत काटेरी कुंपण पूर्ण केले आणि विकासाला चालना मिळाली. साधे शेड असलेल्या स्मशानभूमीत चोहोबाजूने पत्रे वाढविले. सरण रचण्याआधी मृतदेह (तिरडी) ठेवण्यासाठी मोठा ओटा केला. तब्बल साठ टिप्पर काळी माती चोहोबाजूने टाकून वड, पिंपळ, लिंब, चंदन आदींसह शोभेची फुलझाडे लावली. यात प्रामुख्याने २४ तास ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचा भरणा अधिक आहे. आतमध्ये जाण्यासाठी कचखडी टाकून बाजूने विटा लावून रस्ता तयार केला. पितृ पक्षात मोहाच्या पानाशिवाय पितृ जेवू घातल्याचा विधी पूर्ण होत नाही. त्या मोहाच्या झाडाची जवळपास ३० रोपे लावली. तुळशीपत्र, मंजुळांशिवाय अंत्यविधी होत नाही, याची जाणीव ठेवत तुळशीबन तयार केले आहे. अस्थिकलश ठेवण्यासाठी लॉकर, अंत्यविधीसाठी आलेल्यांना विश्रांतीसाठी सिमेंटचे बाकडे आहेत. विशेष म्हणजे लावलेल्या संपूर्ण झाडांना नियमित पाणी मिळावे म्हणून सर्वत्रच ठिबक बसविले. रोपट्यांची आता दहा ते बारा फुटांपर्यंत वाढ झाली आहे. बन्सीसाहेब जाधव स्वतः दररोज सकाळी व संध्याकाळी फेरफटका मारून देखभाल करतात. त्यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून आदर्शवत असे वैकुंठधाम प्रत्यक्षात साकार झाले आहे.

मृत्यू हेच अंतिम सत्य

सेवानिवृत्त सैनिक बन्सीसाहेब जाधव यांना स्मशानभूमी सुधारणेबाबत विचारले असता जन्मानंतर मृत्यू हेच आयुष्याचे अंतिम सत्य असून जन्माचा उत्सव करतो तसेच अंतिम ध्येय साध्य झाल्यास त्याचाही उत्सव व्हायला पाहिजे. सर्वांना प्रसन्न वाटावे या दृष्टीने स्मशानभूमीची सुधारणा करण्याचे ध्येय मी अंगीकारले असून आता अंत्यविधीला आलेल्यांना बसण्यासाठी शेड उभारायचे आहे. यात समाजबांधव यथाशक्ती सहकार्य करीत असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

130821\0753img-20210807-wa0022.jpg

घाटनांदूर येथील जाधव-देशमुख या मराठा समाजाच्या स्मशानभूमीचा कायापालट झाला असून

बागेसारखे स्वरूप प्राप्त झाले आहे . दुरुस्ती करून घेताना श्री लक्ष्मी नारायण पतसंस्था चेअरमन बन्सीसाहेब जाधव .