शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचे नियम पाळल्यास व्यवहार लवकर सुरळीत होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST

बीड : जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. मात्र, इतर काही जिल्ह्यांप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोर ...

बीड : जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. मात्र, इतर काही जिल्ह्यांप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करणे गरजेे आहे. तसेच दुसऱ्या लाटेत प्रशासनाने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे टेस्टच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे, गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषेदत नागरिकांना केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर. राजा, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे, तहसीलदार शिरीष वमने यांची उपस्थिती होती. दरम्यान, मागील लाट ७ एप्रिल ते २८ फेब्रुवारी या दरम्यान १९ हजार १६८ रुग्ण संख्या होती. तर, दुसऱ्या लाटेत म्हणचे ३ मार्च ते ३ जून या काळात तपासणीच्या तुलनेत ६८ हजार जणांना कोरोनाची लागण झाली होती. मागील लाटेत ५८९ मृत्यू झाले तर, या लाटेत १,४३२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहनदेखील यावेळी रवींद्र जगताप यांनी केले. कायदा आणि सुव्यवस्था पाळणे सर्वांची जबाबदारी असून, भंग केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारादेखील यावेळी प्रशासनाकडून देण्यात आला.

म्युकरमायकोसिस रुग्णांवर होणार प्रभावी उपचार

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार होत आहे. त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे, तसेच यातील तज्ज्ञ डॉक्टरदेखील आहेत. दरम्यान, या ठिकाणी यंत्रसामग्री उपलब्ध असल्यामुळे उपचार होत असून, अन्य एक मशीन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यास गती मिळणार आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत १२८ रुग्ण आढळले होते. त्यापैकी १७ जण पूर्ण बरे झाले आहेत तर, १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील १२७ जणांना कोरोनाची यापूर्वी लागण झाली होती. ९० जणांना मधुमेहाचा आजार असल्याचे समोर आले होते.

संभाव्य धोका लक्षात घेत केली तयारी -कुंभार

तिसऱ्या लाटेत बालकांना धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता, जिल्ह्यात दरवर्षी ४९ हजार प्रसूती होतात. त्यामुळे नवजात शिशू १ ते २८ दिवस यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून १९६ पॉझिटिव्ह बेड तर १९६ निगेटिव्ह बेड तयार करण्यात आले आहेत. तर, लहान मुलांसाठी आयसीयू १०० बेडची तयारी करण्यात आली आहे. तसेच एनआयसीयूचे ८४, इतर ५०६ खाटा तयार आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी लागणारी सर्व औषधी साठा उपलब्ध करून ठेवला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.

तर, कायदेशीर कारवाई होणार

१५ जूनपर्यंत कोरोना संकटामुळे व आपल्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या लक्षात घेता लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या काळात मोर्चा काढला तर, कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी समाजिक भान लक्षात घेत घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नागरिकांना केले.

===Photopath===

030621\03_2_bed_10_03062021_14.jpeg

===Caption===

पत्रकारपरिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक आर.राजा आदी.