शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर सर्व ताकदीने मैदानात उतरू - अमरसिंह पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:33 IST

अमरसिंह पंडित यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून निश्चित मानली जात असून तशी चर्चाही जोरात चालू आहे.

ठळक मुद्देभाजप-शिवसेना युती झाल्यामुळे इकडे भाजपात ‘अतिउत्साह’ दिसून येत आहे. राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर न करणे ही बाब भाजपाच्या पथ्यावर पडत आहे.

- सतीश जोशीबीड : निवडणूक जाहीर झाली तरी बीड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंगेसचा उमेदवार अजून जाहीर झाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार अमरसिंह पंडित यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून निश्चित मानली जात असून तशी चर्चाही जोरात चालू आहे. यासंदर्भात अमरसिंह पंडित यांच्याशी चर्चा केली असता याबद्दल माझ्याशी कुणीही चर्चा केली नाही. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर सर्वताकदीने मैदानात उतरू, हे ही तितकेच खरे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यासंदर्भात व्यक्त केली.

मी नित्यनियमानुसार ग्रामीण भागात जनतेच्या संपर्कात असून दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. माझे नाव निश्चित झाले असेल तर ते सर्वप्रथम मला समजेल. माझ्याशी कुणीही यासंदर्भात संपर्क केला नाही, त्यामुळे उमेदवारीच्या संदर्भात बोलणे उचित होणार नाही, असे मुत्सद्दीपणाचे उत्तर देऊन उमेदवारीचा विषय टाळला. उमेदवार कुणीही असो, आम्ही सर्व ताकदीने निवडणूक लढवू. पक्षश्रेष्ठीने आदेश दिला तर रिंगणातही सर्वताकदीने उतरू. रिंगणात उतरल्यानंतरच बोलणे उचित ठरेल, असे ते म्हणाले.सर्वकाही अलबेल आहे, विजय निश्चित आहे, असे वातावरण निर्माण करण्याचा केविलवाणी प्रयत्न भाजपाकडून होत आहे. एवढे जर वातावरण पोषक असेल तर फिरता कशाला? घरी बसूनच निकालाची प्रतीक्षा करा ना. गेल्या पाच वर्षात जनतेने खूप काही सोसले आहे. त्यांच्या ह्या यातना मतदानातून प्रकट होतील, असा उपरोधिक टोलाही पंडित यांनी यावेळी मारला.

भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे इकडे भाजपात ‘अतिउत्साह’ दिसून येत आहे. भाजपाच्या विद्यमान खासदार तथा युतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे ह्यांचा मतदार संघात संपर्कही सुरु झाला आहे. गोपीनाथरावांच्या अपघाती मृत्यूमुळे मतदार संघात निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना मिळाला होता. विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये फाटाफूट झाली असतानाही शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. शरद पवार यांनीही राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही, असे त्यावेळी जाहीर केल्यामुळे काँग्रेसने माजी मंत्री अशोकराव पाटील यांना मैदानात उतरविले होते. या सर्व पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे ह्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.

यावेळी तशी भावनिक लाट नसली तरी राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर न करणे ही बाब भाजपाच्या पथ्यावर पडत आहे.मतदार संघातील सहा विधानसभापैकी पाच मतदार संघ भाजपाच्या ताब्यात आहेत. सुरेश धसांना स्थानिक स्वराज्यमधून विधान परिषदेवर निवडून आणून भाजपाने आपली ताकद वाढविली आहे. वर्चस्वाच्या लढाईत पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यात वारंवार खटके उडत गेले. मंत्रीपदाचा लालदिवा न मिळाल्याने मेटे आणि मुंडे यांच्यातील वाद विकोपाला गेला असून त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत मुंडेना बसू शकतो.

क्षीरसागर बंधू : भूमिकेबद्दल आश्चर्यउमेदवार जाहीर न झाल्यामुळे इकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामसूम आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा असून तेच तगडे उमेदवार ठरू शकतात. दुसरीकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार तथा विधानसभेतील पक्षाचे उपनेते जयदत्त क्षीरसागर हे निवडून आल्यापासून पक्षाच्या संपर्क क्षेत्राबाहेर असून दिवसेंदिवस त्यांचा भाजपाशी घरोबा वाढत आहे. ही बाब राष्ट्रवादीसाठी चिंतेची आहे. निर्धार मेळाव्याच्या परळीतील समारोप कार्यक्रमास शरद पवार आले असतानाही आ.जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. दुसरीकडे मात्र बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बीडमध्ये निमंत्रित करून विविध विकास कामांचा शुभारंभ क्षीरसागर बंधूंनी त्यांच्या हस्ते केला. चार दिवसांपूर्वीच गेवराईत आयोजित भाजपाच्या कार्यक्रमासही ते आवर्जून उपस्थित राहिले. क्षीरसागर बंधूंच्या या भूमिकेबद्दल मात्र जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAmarsingh Punditअमरसिंह पंडित