शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

शेतकऱ्यांना पीकविमा दिला नाही, तर कंपन्यांचे पैसे सरकार देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST

परळी : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा द्यावाच लागेल; अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही, असे आश्वासन किसान सभेच्या शिष्टमंडळाला ...

परळी : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा द्यावाच लागेल; अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही, असे आश्वासन किसान सभेच्या शिष्टमंडळाला राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले, अशी माहिती किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी दिली.

२०२० चा खरीप पीकविमा मिळावा यासाठी मुंबई येथे मंत्रालयात कृषिमंत्री दादा भुसे यांची अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी भेट घेतली. सरकारच्या वतीने कृषिमंत्री भुसे यांच्यासह राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, विमा कंपनीचे अधिकारी व किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. अजित नवले, कॉ. अजय बुरांडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. ३० ऑगस्ट रोजी पुणे येथील कृषी आयुक्तालयावर किसान सभेने मोर्चा काढून दिवसभर धरणे आंदोलन केले होते. त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीत कृषिमंत्र्यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला आश्वस्त करताना विमा कंपन्यांना निर्देश दिले की एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारे सरसकट शेतकऱ्यांना पीकविमा परतावा रक्कम नियमाप्रमाणे वाटप करावी. जोपर्यंत विमा कंपन्या शेतकऱ्यांना ही रक्कम वाटप करणार नाहीत तोपर्यंत राज्य शासन स्वतःच्या हिश्शाची दुसऱ्या टप्प्यातील प्रिमियमची रक्कम विमा कंपन्यांना देणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतल्याची ग्वाही कृषिमंत्र्यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला दिली.

शेतकऱ्यांनी त्यांच्या अपरिहार्य कारणांमुळे नुकसानीची माहिती दिलेल्या मुदतीत कळवली नाही हा त्यांचा दोष नाही. समजा जर तो नियमभंग असेल तर विमा कंपन्यांनीदेखील कराराप्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये ऑफिस व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या नाहीत, कंपनीचा पुरेसा कर्मचारीवर्ग तिथे कार्यरत नाही हादेखील नियमभंगच आहे. ही किसान सभेचे आणि शेतकऱ्यांची भूमिका कृषिमंत्र्यांनी उचलून धरली. शेतकऱ्यांकडे चुकीचे बोट दाखविण्याचा कोणताही अधिकार कंपनीस उरत नाही, अशा शब्दांत कृषिमंत्र्यांनी कंपन्यांची कानउघाडणी केली. विमा कंपन्या शेतकऱ्यांना यथायोग्य विमा परतावा देतील, अशी ग्वाही कृषिमंत्री भुसे यांनी दिली.

आंदोलन अद्याप संपलेले नाही

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत किसान सभा स्वस्थ बसणार नाही. हे आंदोलन केवळ २०२० चा पीकविमा मिळविण्यापुरतेच मार्यदित नसून पीकविमा कायम शेतकऱ्यांना आधार देणारा, शेतकरीधार्जिणा असावा, यासाठी असल्याची प्रतिक्रिया किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी दिली.