शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

शेतकऱ्यांना पीकविमा दिला नाही, तर कंपन्यांचे पैसे सरकार देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST

परळी : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा द्यावाच लागेल; अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही, असे आश्वासन किसान सभेच्या शिष्टमंडळाला ...

परळी : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा द्यावाच लागेल; अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही, असे आश्वासन किसान सभेच्या शिष्टमंडळाला राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले, अशी माहिती किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी दिली.

२०२० चा खरीप पीकविमा मिळावा यासाठी मुंबई येथे मंत्रालयात कृषिमंत्री दादा भुसे यांची अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी भेट घेतली. सरकारच्या वतीने कृषिमंत्री भुसे यांच्यासह राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, विमा कंपनीचे अधिकारी व किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. अजित नवले, कॉ. अजय बुरांडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. ३० ऑगस्ट रोजी पुणे येथील कृषी आयुक्तालयावर किसान सभेने मोर्चा काढून दिवसभर धरणे आंदोलन केले होते. त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीत कृषिमंत्र्यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला आश्वस्त करताना विमा कंपन्यांना निर्देश दिले की एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारे सरसकट शेतकऱ्यांना पीकविमा परतावा रक्कम नियमाप्रमाणे वाटप करावी. जोपर्यंत विमा कंपन्या शेतकऱ्यांना ही रक्कम वाटप करणार नाहीत तोपर्यंत राज्य शासन स्वतःच्या हिश्शाची दुसऱ्या टप्प्यातील प्रिमियमची रक्कम विमा कंपन्यांना देणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतल्याची ग्वाही कृषिमंत्र्यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला दिली.

शेतकऱ्यांनी त्यांच्या अपरिहार्य कारणांमुळे नुकसानीची माहिती दिलेल्या मुदतीत कळवली नाही हा त्यांचा दोष नाही. समजा जर तो नियमभंग असेल तर विमा कंपन्यांनीदेखील कराराप्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये ऑफिस व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या नाहीत, कंपनीचा पुरेसा कर्मचारीवर्ग तिथे कार्यरत नाही हादेखील नियमभंगच आहे. ही किसान सभेचे आणि शेतकऱ्यांची भूमिका कृषिमंत्र्यांनी उचलून धरली. शेतकऱ्यांकडे चुकीचे बोट दाखविण्याचा कोणताही अधिकार कंपनीस उरत नाही, अशा शब्दांत कृषिमंत्र्यांनी कंपन्यांची कानउघाडणी केली. विमा कंपन्या शेतकऱ्यांना यथायोग्य विमा परतावा देतील, अशी ग्वाही कृषिमंत्री भुसे यांनी दिली.

आंदोलन अद्याप संपलेले नाही

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत किसान सभा स्वस्थ बसणार नाही. हे आंदोलन केवळ २०२० चा पीकविमा मिळविण्यापुरतेच मार्यदित नसून पीकविमा कायम शेतकऱ्यांना आधार देणारा, शेतकरीधार्जिणा असावा, यासाठी असल्याची प्रतिक्रिया किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी दिली.