शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कोथिंबीरवाडीचा धारूर तालुक्यात आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी कोथिंबीरवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत गावात सलोखा राखण्यासाठी आपसातील वादविवाद, मतभेद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी कोथिंबीरवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत गावात सलोखा राखण्यासाठी आपसातील वादविवाद, मतभेद बाजूला ठेवत ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. या गावातील निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या जहागीरमोहा, रुईधारूर, भोपा, कासारी, कोथींबीरवाडी या पाच ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यामध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोथिंबीरवाडी ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाले. यामध्ये शामबाला युवराज वैरट, विनोद सत्यप्रेम ढोरे, श्रीधर वैजनाथ पंडित, शारदा कारभारी कोथिंबीरे, भागिर्थी वैजनाथ पंडित, आश्रूबा नामदेव जाधव, रामकंवर दत्ता कोथिंबीरे यांचा समावेश आहे. या उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले. गावातील सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

कोथिंबीरवाडी ग्रामपंचायतीच्या निर्मितीनंतर गेल्या ४० वर्षांत या ग्रामपंचायतीची निवडणूक दुसऱ्यांदा बिनविरोध झाली आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी एकदा येथील निवडणूक बिनविरोध झाली होती. माजी सरपंच युवराज वैरट, विनोद ढोरे आदींनी पुढाकार घेत बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू केले. ग्रामपंचायत निवडणूक गट-तटात झाली तर वादविवाद वाढतात, गावातील वातावरणही खराब होते. विनाकारण मतभेद, मनभेद वाढतात याचा विचार करून सर्वपक्षीय मतभेद बाजूला ठेवत ग्रामपंचायत निवडणूक गावाचे हित समोर ठेवत बिनविरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. सर्वांनी एकत्रितपणे हे अवघड काम यशस्वी केले.