शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महामार्गाच्या ढिसाळ कामाने शेकडो लोकांचे बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:38 IST

विशाल शिंदे/ लोकमत न्यूज नेटवर्क नेकनूर : गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी या महामार्गाचे काम एचपीएम कंपनीमार्फत सुरू ...

विशाल शिंदे/

लोकमत न्यूज नेटवर्क

नेकनूर : गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी या महामार्गाचे काम एचपीएम कंपनीमार्फत सुरू आहे. कंपनीने नेमलेल्या कंत्राटदाराच्या कामाची गती पाहता हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजून २ ते ३ वर्षे लागतील असे चित्र आहे. ठेकेदार कंपनीच्या व कंत्राटदाराच्या ढिसाळ कामामुळे या महामार्गावर शेकडो लोकांना जीव गमवावे लागले आहेत. दरम्यान, रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांनी रविवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महामार्गाचे काम चालू असताना रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांना दिशादर्शक फलकही लावण्याची कंत्राटदाराची मानसिकता नाही. यामुळे महामार्गावर शेकडो लोकांचे अपघात झाले आहेत. कित्येक लोकांचे हात, पाय व कितीतरी लोकांनी आपला जीव गमवला आहे. या कामामध्ये प्रशासन का लक्ष घालत नाही? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

....

राजकारणी गप्प का?

सर्वसामान्य लोकांचे जीव जात आहे; पण छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणारे राजकारणी या निकृष्ट रस्त्याच्या कामावर बोलायला का तयार नाहीत. एचपीएम कंपनीवर हे पुढारी इतके मेहेरबान का झाले? सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, राजकारणातील सर्व पदाधिकारी गप्प का? असा प्रश्न जनतेतून केला जात आहे.

....

उद्घाटनाआधीच रस्त्याला तडे

ग्रामीण भागातील छोटछोट्या गावांना जोडणारा या महामार्गाचे काम मंजूर होण्याअगोदर लोकांनी खूप हाल सोसले. आता तरी चांगला नवीन रोड मिळेल असे वाटत होते; पण एचपीएम कंपनीचे कंत्राटदारांनी केलेले काम पाहता ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसत आहे. उद्घाटन होण्याअगोदरच आताच तयार झालेल्या रस्त्याला तडे पडले आहेत.

...

जुन्याच पुलाची केली डागडुजी, नाल्यांचे काम अपूर्ण

नेकनूरमधील कालिकादेवी मंदिराजवळील जुन्या पुलाला डागडुजी करून त्यावर काम केलं जातं आहे. या रस्त्याच्या हिशेबाने हा पूल अरुंद होत आहे. नेकनूूरमधील काम चालू होऊन किमान ३ ते ४ वर्षे झाली. तरी रस्त्यालगतच्या नाल्या अजून तशाच आहेत. या अर्धवट कामामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी रोडवरच साचून राहत आहे. या पाण्यात दुचाकीस्वारांच्या गाड्या घसरून अपघात होत आहेत.

....

कंपनीने महामार्गाच्या कामाबाबत ठेकेदारांना सूचना केल्या आहेत. ठेकेदाराकडून कामाला विलंब होत आहे. आता कामाला गती मिळत आहे.

-शिंदे, व्यवस्थापक, एचपीएम कंपनी.

.....

रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने रोज अपघात होत आहे. अनेकांना जीव गमावावा लागला आहे. तरी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.

-अरविंद जाधव, सामाजिक कार्यकर्ते., नेकनूर.

...

राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. खड्ड्यांमुळे भविष्यात अपघाताची प्रमाण वाढू शकते. जर काम अशाच पद्धतीने चालू राहिले तर या महामार्गावर बसणारा टोल आम्ही भरणार नाहीत. प्रशासनाने या कामाची चौकशी करावी, अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील.

-जितेंद्र शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य, नेकनूर.

110921\11_2_bed_10_11092021_14.jpg

राष्टमीय महामार्गावर नेकनूर गावाजवळ पडलेला खड्डे.