शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बीड : शहरात जलशुद्धीकरण अथवा पाणी टाकीतून पाणी पुरवठा करण्यापूर्वी त्याची चाचणी केली जाते. यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बीड : शहरात जलशुद्धीकरण अथवा पाणी टाकीतून पाणी पुरवठा करण्यापूर्वी त्याची चाचणी केली जाते. यात ती योग्य असेल तरच ते पाणी पुढे सोडले जाते. यासाठी बीडमध्ये जिल्हा आरोग्य प्रयोगशाळाही कार्यान्वित आहे. आतापर्यंत तरी एकही अहवाल पाणी पुरवठ्यास अयोग्य असल्याचा आलेला नाही. परंतु तुटलेले नळ, नाल्यांतील कुजलेली पाईपलाईन आदी कारणांमुळे काहींच्या नळाला अशुद्ध पाणी येत असल्याचे दिसते. परंतु या चुका सुधारण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज असून, पालिकेने त्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.

बीड शहराला माजलगाव आणि बिंदुसरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. दररोज ३४ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु २८ एमएलडी पाणी शहरात दररोज येते. त्यातच शहराची हद्दवाढ झाल्याने पाणी जास्त प्रमाणात लागते. शहरात प्रति दिवस प्रति माणूस १०० लीटर, तर हद्दवाढ भागात ९० लीटर पाणी दिले जाते. सध्या आठवड्याला पाणी येत आहे. असे असले तरी जेवढे पाणी लागते, तेवढे माणसांना दिले जात असल्याचा दावा पालिका करीत आहे. हे पाणी पुरवठा करण्यापूर्वी प्रत्येक चार तासाला जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी नमुन्यांची चाचणी केली जाते. तसेच पाणी टाक्या आणि नळांमधूनही जवळपास १०० मिलिलीटर पाणी घेऊन प्रयोगशाळेत पाठिवले जात असल्याचे सांगण्यात आले.

नाली, गटारीतील नळांना अशुद्ध पाणी

जलशुद्धीकरण केंद्र अथवा पाण्याच्या टाकीतून होणारा पाणी पुरवठा शुद्ध असतो. परंतु ज्यांचे नळ नाली अथवा गटारातून गेलेले आहेत, ते अनेक ठिकाणी लिकेज असतात. त्यामुळे पाणी आत जाते आणि नळाला अशुद्ध पाणी येते. या नळांना कव्हरींग असणे खूप महत्वाचे आहे. परंतु नागरिक ते बसवत नाहीत. सध्या रस्त्याची कामे सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळेही कचरा, माती आत गेल्याने नळाला अशुद्ध पाणी येत असल्याचे दिसते.

अशी हाेते तपासणी

n बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, नळ या ठिकाणचे दरराेज जवळपास १० नमुने तपासणीसाठी घेतले जातात. हे सर्व नमुने ठराविक अंतराने संकलित केले जातात.

n संकलित केलेले पाणी नमुने चाचणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले जातात. आतापर्यंत टाकी अथवा जलशुद्धीकरण केंद्राचे अहवाल अशुद्ध पाणी आले नसल्याचे सांगण्यात आले.

दररोज ठराविक अंतराने पाण्याचे १० नमुने चाचणीसाठी घेतले जातात. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासले जातात. अद्याप तरी पाणी अयोग्य असा अहवाल आलेला नाही. शहरात दररोज प्रति माणसी, प्रति दिवस १०० लीटर पाणी दिले जाते. आऊटकटला ९० लीटर पाणी दिले जाते.

- राहुल टाळके, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, नगर परिषद, बीड