शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
2
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
3
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
4
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
5
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
6
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
7
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
8
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
9
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
10
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
11
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
12
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
13
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
14
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
15
Pune Crime: पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
16
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
17
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
18
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
19
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
20
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...

तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बीड : शहरात जलशुद्धीकरण अथवा पाणी टाकीतून पाणी पुरवठा करण्यापूर्वी त्याची चाचणी केली जाते. यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बीड : शहरात जलशुद्धीकरण अथवा पाणी टाकीतून पाणी पुरवठा करण्यापूर्वी त्याची चाचणी केली जाते. यात ती योग्य असेल तरच ते पाणी पुढे सोडले जाते. यासाठी बीडमध्ये जिल्हा आरोग्य प्रयोगशाळाही कार्यान्वित आहे. आतापर्यंत तरी एकही अहवाल पाणी पुरवठ्यास अयोग्य असल्याचा आलेला नाही. परंतु तुटलेले नळ, नाल्यांतील कुजलेली पाईपलाईन आदी कारणांमुळे काहींच्या नळाला अशुद्ध पाणी येत असल्याचे दिसते. परंतु या चुका सुधारण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज असून, पालिकेने त्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.

बीड शहराला माजलगाव आणि बिंदुसरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. दररोज ३४ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु २८ एमएलडी पाणी शहरात दररोज येते. त्यातच शहराची हद्दवाढ झाल्याने पाणी जास्त प्रमाणात लागते. शहरात प्रति दिवस प्रति माणूस १०० लीटर, तर हद्दवाढ भागात ९० लीटर पाणी दिले जाते. सध्या आठवड्याला पाणी येत आहे. असे असले तरी जेवढे पाणी लागते, तेवढे माणसांना दिले जात असल्याचा दावा पालिका करीत आहे. हे पाणी पुरवठा करण्यापूर्वी प्रत्येक चार तासाला जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी नमुन्यांची चाचणी केली जाते. तसेच पाणी टाक्या आणि नळांमधूनही जवळपास १०० मिलिलीटर पाणी घेऊन प्रयोगशाळेत पाठिवले जात असल्याचे सांगण्यात आले.

नाली, गटारीतील नळांना अशुद्ध पाणी

जलशुद्धीकरण केंद्र अथवा पाण्याच्या टाकीतून होणारा पाणी पुरवठा शुद्ध असतो. परंतु ज्यांचे नळ नाली अथवा गटारातून गेलेले आहेत, ते अनेक ठिकाणी लिकेज असतात. त्यामुळे पाणी आत जाते आणि नळाला अशुद्ध पाणी येते. या नळांना कव्हरींग असणे खूप महत्वाचे आहे. परंतु नागरिक ते बसवत नाहीत. सध्या रस्त्याची कामे सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळेही कचरा, माती आत गेल्याने नळाला अशुद्ध पाणी येत असल्याचे दिसते.

अशी हाेते तपासणी

n बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, नळ या ठिकाणचे दरराेज जवळपास १० नमुने तपासणीसाठी घेतले जातात. हे सर्व नमुने ठराविक अंतराने संकलित केले जातात.

n संकलित केलेले पाणी नमुने चाचणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले जातात. आतापर्यंत टाकी अथवा जलशुद्धीकरण केंद्राचे अहवाल अशुद्ध पाणी आले नसल्याचे सांगण्यात आले.

दररोज ठराविक अंतराने पाण्याचे १० नमुने चाचणीसाठी घेतले जातात. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासले जातात. अद्याप तरी पाणी अयोग्य असा अहवाल आलेला नाही. शहरात दररोज प्रति माणसी, प्रति दिवस १०० लीटर पाणी दिले जाते. आऊटकटला ९० लीटर पाणी दिले जाते.

- राहुल टाळके, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, नगर परिषद, बीड