शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बीड : शहरात जलशुद्धीकरण अथवा पाणी टाकीतून पाणी पुरवठा करण्यापूर्वी त्याची चाचणी केली जाते. यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बीड : शहरात जलशुद्धीकरण अथवा पाणी टाकीतून पाणी पुरवठा करण्यापूर्वी त्याची चाचणी केली जाते. यात ती योग्य असेल तरच ते पाणी पुढे सोडले जाते. यासाठी बीडमध्ये जिल्हा आरोग्य प्रयोगशाळाही कार्यान्वित आहे. आतापर्यंत तरी एकही अहवाल पाणी पुरवठ्यास अयोग्य असल्याचा आलेला नाही. परंतु तुटलेले नळ, नाल्यांतील कुजलेली पाईपलाईन आदी कारणांमुळे काहींच्या नळाला अशुद्ध पाणी येत असल्याचे दिसते. परंतु या चुका सुधारण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज असून, पालिकेने त्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.

बीड शहराला माजलगाव आणि बिंदुसरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. दररोज ३४ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु २८ एमएलडी पाणी शहरात दररोज येते. त्यातच शहराची हद्दवाढ झाल्याने पाणी जास्त प्रमाणात लागते. शहरात प्रति दिवस प्रति माणूस १०० लीटर, तर हद्दवाढ भागात ९० लीटर पाणी दिले जाते. सध्या आठवड्याला पाणी येत आहे. असे असले तरी जेवढे पाणी लागते, तेवढे माणसांना दिले जात असल्याचा दावा पालिका करीत आहे. हे पाणी पुरवठा करण्यापूर्वी प्रत्येक चार तासाला जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी नमुन्यांची चाचणी केली जाते. तसेच पाणी टाक्या आणि नळांमधूनही जवळपास १०० मिलिलीटर पाणी घेऊन प्रयोगशाळेत पाठिवले जात असल्याचे सांगण्यात आले.

नाली, गटारीतील नळांना अशुद्ध पाणी

जलशुद्धीकरण केंद्र अथवा पाण्याच्या टाकीतून होणारा पाणी पुरवठा शुद्ध असतो. परंतु ज्यांचे नळ नाली अथवा गटारातून गेलेले आहेत, ते अनेक ठिकाणी लिकेज असतात. त्यामुळे पाणी आत जाते आणि नळाला अशुद्ध पाणी येते. या नळांना कव्हरींग असणे खूप महत्वाचे आहे. परंतु नागरिक ते बसवत नाहीत. सध्या रस्त्याची कामे सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळेही कचरा, माती आत गेल्याने नळाला अशुद्ध पाणी येत असल्याचे दिसते.

अशी हाेते तपासणी

n बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, नळ या ठिकाणचे दरराेज जवळपास १० नमुने तपासणीसाठी घेतले जातात. हे सर्व नमुने ठराविक अंतराने संकलित केले जातात.

n संकलित केलेले पाणी नमुने चाचणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले जातात. आतापर्यंत टाकी अथवा जलशुद्धीकरण केंद्राचे अहवाल अशुद्ध पाणी आले नसल्याचे सांगण्यात आले.

दररोज ठराविक अंतराने पाण्याचे १० नमुने चाचणीसाठी घेतले जातात. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासले जातात. अद्याप तरी पाणी अयोग्य असा अहवाल आलेला नाही. शहरात दररोज प्रति माणसी, प्रति दिवस १०० लीटर पाणी दिले जाते. आऊटकटला ९० लीटर पाणी दिले जाते.

- राहुल टाळके, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, नगर परिषद, बीड