शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मिरवट येथे ‘सीआरए’ पद्धतीने फळबाग लागवड प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST

घाटनांदूर : सातत्याने कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फळबागा जगविणे अवघड होत आहे. यासाठी सीआरए तंत्रज्ञानाचा अवलंब ...

घाटनांदूर : सातत्याने कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फळबागा जगविणे अवघड होत आहे. यासाठी सीआरए तंत्रज्ञानाचा अवलंब करून रोपांची लागवड केल्यास दुष्काळी परिस्थितीत फळबाग जगविण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार असल्याचे मत पोकरा प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी व्यक्त केले.

कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत सीआरए (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) म्हणजेच हवामान अनुकूल शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मिरवट येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक प्रशिक्षण आयोजित केले होते.

१) शेतीशाळा प्रशिक्षक राहुल मुंडे यांनी पारंपरिक फळबाग लागवड पद्धतीमुळे होणारे तोटे शेतकऱ्यांना समजावून सांगितले आणि सीआरए तंत्रज्ञानाचा अवलंब फळबाग लागवडीसाठी करण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक संतोष तेलंग्रे, भरत इंगळे, पंडितराव भदाडे, रतन इंगळे, दत्ता भदाडे, रोहन भदाडे दीपक भदाडे, अंगद भदाडे, विठ्ठल बोंबले, ज्ञानोबा बोंबले, अनंत बोंबले, सुभाष इंगळे, धनंजय इंगळे आदी शेतकरी उपस्थित होते.

२) प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी पंडितराव भदाडे यांच्या शेतात दोन फूट लांब, दोन फूट रुंद, दोन फूट खोल खड्डा करून त्या खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांवर चार इंच व्यासाचे तीन फूट लांब पाईप उभे केले. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे बायोमिक्स जैविक औषध चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून खड्डा शेणखत, पाचशे ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व मातीच्या मिश्रणाने दीड फूट भरला.

३) तेथे नारळाचे झाड लावून उर्वरित खड्डा मातीने भरून घेतला. त्यानंतर खड्ड्यामध्ये उभ्या केलेल्या सर्व पाइपमध्ये अर्धा फूट कुजलेले शेणखत व रिक्त दीड फूट जागेमध्ये जमीन पातळीपर्यंत वाळू भरली. त्यानंतर पाइप हळूवारपणे वर ओढून बाहेर काढले. पाइप काढल्याने चारही कोपऱ्यांत वाळूचा दीड फूट खोलीचा ‘कॉलम’ तयार होऊन रोपांना दिलेले पाणी प्रथम चार कॉलम्समध्ये शोषले जाते.

४) कॉलम पाण्याने पूर्ण भरला की आजूबाजूला पाणी झिरपण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे मुळांच्या परिसरास तत्काळ ओलावा मिळतो, सिंचनाची कार्यक्षमता वाढते, पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, मोकाट सिंचनापेक्षा कमी पाणी लागून जलसंवर्धन होते. तसेच शेणखतामुळे पाणी धरून ठेवले जाते, मुळांना अन्नद्रव्ये मिळतात, रोपांची वाढ झपाट्याने होऊन सशक्त झाड निर्माण होते असे येळकर म्हणाले.

===Photopath===

110321\narshingh suryvanshi_img-20210311-wa0024_14.jpg

===Caption===

मिरवट येथे पोकरा प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी  प्रात्यक्षिक करून दाखवले