शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

मिरवट येथे ‘सीआरए’ पद्धतीने फळबाग लागवड प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST

घाटनांदूर : सातत्याने कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फळबागा जगविणे अवघड होत आहे. यासाठी सीआरए तंत्रज्ञानाचा अवलंब ...

घाटनांदूर : सातत्याने कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फळबागा जगविणे अवघड होत आहे. यासाठी सीआरए तंत्रज्ञानाचा अवलंब करून रोपांची लागवड केल्यास दुष्काळी परिस्थितीत फळबाग जगविण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार असल्याचे मत पोकरा प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी व्यक्त केले.

कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत सीआरए (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) म्हणजेच हवामान अनुकूल शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मिरवट येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक प्रशिक्षण आयोजित केले होते.

१) शेतीशाळा प्रशिक्षक राहुल मुंडे यांनी पारंपरिक फळबाग लागवड पद्धतीमुळे होणारे तोटे शेतकऱ्यांना समजावून सांगितले आणि सीआरए तंत्रज्ञानाचा अवलंब फळबाग लागवडीसाठी करण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक संतोष तेलंग्रे, भरत इंगळे, पंडितराव भदाडे, रतन इंगळे, दत्ता भदाडे, रोहन भदाडे दीपक भदाडे, अंगद भदाडे, विठ्ठल बोंबले, ज्ञानोबा बोंबले, अनंत बोंबले, सुभाष इंगळे, धनंजय इंगळे आदी शेतकरी उपस्थित होते.

२) प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी पंडितराव भदाडे यांच्या शेतात दोन फूट लांब, दोन फूट रुंद, दोन फूट खोल खड्डा करून त्या खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांवर चार इंच व्यासाचे तीन फूट लांब पाईप उभे केले. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे बायोमिक्स जैविक औषध चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून खड्डा शेणखत, पाचशे ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व मातीच्या मिश्रणाने दीड फूट भरला.

३) तेथे नारळाचे झाड लावून उर्वरित खड्डा मातीने भरून घेतला. त्यानंतर खड्ड्यामध्ये उभ्या केलेल्या सर्व पाइपमध्ये अर्धा फूट कुजलेले शेणखत व रिक्त दीड फूट जागेमध्ये जमीन पातळीपर्यंत वाळू भरली. त्यानंतर पाइप हळूवारपणे वर ओढून बाहेर काढले. पाइप काढल्याने चारही कोपऱ्यांत वाळूचा दीड फूट खोलीचा ‘कॉलम’ तयार होऊन रोपांना दिलेले पाणी प्रथम चार कॉलम्समध्ये शोषले जाते.

४) कॉलम पाण्याने पूर्ण भरला की आजूबाजूला पाणी झिरपण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे मुळांच्या परिसरास तत्काळ ओलावा मिळतो, सिंचनाची कार्यक्षमता वाढते, पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, मोकाट सिंचनापेक्षा कमी पाणी लागून जलसंवर्धन होते. तसेच शेणखतामुळे पाणी धरून ठेवले जाते, मुळांना अन्नद्रव्ये मिळतात, रोपांची वाढ झपाट्याने होऊन सशक्त झाड निर्माण होते असे येळकर म्हणाले.

===Photopath===

110321\narshingh suryvanshi_img-20210311-wa0024_14.jpg

===Caption===

मिरवट येथे पोकरा प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी  प्रात्यक्षिक करून दाखवले