शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

आदित्य पाटीलसह तिघांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:27 IST

आदित्य पाटलांसह तिघांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी फेटाळून लावत अपहाराचा गुन्हा रद्द करणे योग्य होणार नसल्याचे म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : शहरातील वार्ड क्र मांक बारा मधीलरस्ता, नालीचे बांधकाम न करता ७ लाख ३६ हजार ७८६ रु पयांचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार आदित्य पाटलांसह सात जणांविरु द्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी आदित्य पाटलांसह तिघांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी फेटाळून लावत अपहाराचा गुन्हा रद्द करणे योग्य होणार नसल्याचे म्हटले आहे.केज नगरपंचायतीला २०१४ मध्ये विशेष रस्ते अनुदान योजनेअंतर्गत तीन कोटी रु पयांचा निधी प्राप्त झाला होता. नगरपंचायतीने प्राप्त निधीमधून २ कोटी ९४ लाख ६९ हजार २५५ रु पयांची एकूण ६३ कामे प्रस्तावित करत त्याला जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता घेतली. तर शहरातील प्रभाग क्र . १२ मध्ये ( पुर्वीच्या प्रभाग क्र .९ मध्ये ) नखाते यांचे घर ते भागवत गुंड यांच्या घरापर्यंत रस्ता कामासाठी नगरपंचायतीने ७ लाख ८० हजार १११ रु पयांचा निधी मंजूर केला होता. मात्र या रस्त्याचे काम कागदोपत्री पुर्ण करु न त्यातील ७ लाख ३६ हजार ७८६ रु पयांचा अपहार केल्याची तक्र ार नगरसेविका मालती गुंड यांनी करु न चौकशीची मागणी केली. या तक्रारीची दखल न घेतल्याने गुंड यांनी अंबाजोगाईच्या न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी सखोल चौकशी करून दहा दिवसाच्या आत गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्या.के. आर. चौधरी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला २९ सप्टेंबर २०१७ रोजी दिले होते.न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांनी चौकशी करून अहवाल न्यायालयात सादर केला होता. नंतर न्यायालयाच्या आदेशावरून व नगरसेविका मालती गुंड यांच्या फिर्यादीवरून नव्याने नगराध्यक्षपदी निवड झालेले आदित्य अशोकराव पाटील, मुख्याधिकारी पुष्पगंधा बालासाहेब भगत, गुत्तेदार विलास ज्ञानोबा थोरात, माजी नगराध्यक्ष कबीरोद्दीन निसरोद्दीन इनामदार, नगरसेवक पशुपतीनाथ दांगट, सल्लागार अभियंता सुभाष रोकडे यांच्याविरुध्द अपहार, फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत केज पोलिस ठाण्यात २० नोव्हेंबर २०१७ रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी नगराध्यक्ष आदित्य पाटील, माजी नगराध्यक्ष कबीरोद्दीन इनामदार, नगरसेवक पशुपतीनाथ दांगट यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज व याचिका दाखल केली होती. या अर्जावरील अंतिम सुनावणी न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्यासमोर झाली. न्यायालयाने म्हटले की, प्रथमदर्शनी शासकीय मान्यतेनुसार केलेली रस्त्याची कामे दिसून येत नाहीत. शिवाय कंत्राटदाराला देयके अदा केल्याचे दिसून येते.कंत्राटदाराने संबंधित देयकाची रक्कम नगरपंचायतला परत दिली असली तरी परतफेड गुन्हा दाखल झाल्यानंतर केल्याचे दिसून येते. त्यामुळे आरोपींवरील गुन्हा रद्द करणे योग्य होणार नाही. फिर्यादी मालती गुंड यांच्यातर्फे अ‍ॅड. सुदर्शन साळुंके यांनी तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. आर. व्ही. डासाळकर यांनी कामपाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCorruptionभ्रष्टाचार