शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाचे विमा कंपनीला फर्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

राजेश राजगुरू तलवाडा : चकलांबा येथील सतीश केशवराव देशमुख व इतर शेतकऱ्यांनी ॲड.आशिष शिंदे व ॲड.योगेश बोबडे यांच्यामार्फत ...

राजेश राजगुरू

तलवाडा : चकलांबा येथील सतीश केशवराव देशमुख व इतर शेतकऱ्यांनी ॲड.आशिष शिंदे व ॲड.योगेश बोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर केंद्र सरकार व राज्य सरकारसह विमा कंपनीस नोटीस बजावून ११ ऑगस्टला बाजू मांडण्यास सांगितले होते. या सुनावणीसाठी विमा कंपनीचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने, राज्य व केंद्र सरकारलाही बाजू मांडता आली नाही. त्यामुळे विमा कंपनीस पुढच्या तारखेस हजर राहा, अन्यथा वाॅरंट बजावले जाईल, अशी तंबी न्या.एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या.एम.जी. शेवलीकर यांच्या खंडपीठाने दिली.

मागील वर्षी जून ते ऑक्टोबर, २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग या पिकांसह सर्वच पिकांचे नुकसान झाले होते.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शासन निर्णयानुसार पिकांचा विमा काढला होता. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कंपनीस भरपाई द्यावी लागते, म्हणून विमा कंपनीने ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या होत्या. त्यांनाच भरपाई देण्याचा पवित्रा घेतला. प्रत्यक्षात मात्र, सर्वच महसूल मंडळात नुकसान झाले होते व त्या प्रकारचे महसूल विभागाने पंचनामे करून शासन स्तरावर कळविले. त्यानंतर, शासनानेही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करून वाटप केले. हे अनुदान हे तालुक्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळाला जाहीर केले, तसेच चकलांबा महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या, त्यांना विमा रक्कमही मिळाली, परंतु त्याच महसूल मंडळातील उर्वरित शेतकरी विमा रक्कम मिळण्यापासून वंचित राहिले, म्हणून चकलांबा येथील सतीश केशवराव देशमुख व इतर शेतकऱ्यांनी ॲड.शिंदे व ॲड.बोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

पुढील सुनावणी

माननीय उच्च न्यायालयाने केंद्र, राज्य सरकारसह विमा कंपनीस हजर राहून बाजू मांडण्यास सांगितले होते. कालच्या तारखेस केंद्र, राज्य सरकारची बाजू मांडण्यास त्यांचे प्रतिनिधी आले, पण कंपनीचा कोणताही प्रतिनिधी हजर नसल्याने सुनावणी होऊ शकली नाही. आता न्यायालयाने कंपनीस हजर राहा, अन्यथा कोर्ट वाॅरंट जारी करण्यात येईल, असे बजावून अंतिम निकालासाठी नोटीस बजावली आहे. पुढील तारीख १२ सप्टेंबरला ठेवली आहे.

- ॲड.योगेश बोबडे, शेतकऱ्यांचे वकील, उच्च न्यायालय, औरंगाबाद.