शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

वादळी पावसाने अंबाजोगाई तालुक्यात मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:36 IST

अंबाजोगाई तालुक्यात वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने ज्वारी, गहू ही पिके आडवी पडली.तर ज्वारी पावसामुळे ...

अंबाजोगाई तालुक्यात वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने ज्वारी, गहू ही पिके आडवी पडली.तर ज्वारी पावसामुळे काळी पडली आहे. अनेक शेतकऱ्यांनी हरबरा शेतात काढून ठेवला होता. ते ढिगारे भिजून मोठे नुकसान झाले आहे. तर जोरदार वाऱ्याने ढिगारे विस्कटून गेले आहेत. आंब्याला आलेला मोहर ही झडून गेला आहे. काढणी पूर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर या पावसाने रात्री पासूनच अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.पाऊस व वीज यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चौकट,

पंचनामे करून आर्थिक मदत द्या : नमिता मुंदडा

अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी, हरबरा, टरबूज, आंबा व विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केज विधानसभेच्या आ. नमिता मुंदडा यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.