शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बीड जिल्ह्यात मुसळधार : माजलगाव, बिंदुसरा धरण भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्याच्या अनेक भागात ४ व ५ ऑगस्ट रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्याच्या अनेक भागात ४ व ५ ऑगस्ट रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसाने माजलगाव, बिंदुसरा, सिंदफणासह जवळपास सर्वच लहान, मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. दरम्यान, या पावसाने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, सोमवारी वडवणी नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडालेल्या चिमुकल्याला वाचविताना बाप-लेकासह तिघे बुडाले. वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे ही घटना घडली. गेवराई येथे घर पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. माजलगाव धरण क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असल्याने या धरणाचे सोमवारी पहाटे ६ वाजता ११ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून सिंदफणा पात्रात ८८ हजार क्यूसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तालुक्यातील सांडस चिंचोली गावाचा संपर्क तुटला आहे. बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरणही सोमवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले. गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरेसह सर्वच नद्यांना पूर आला असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. केज तालुक्यात केजडी नदीसह तालुक्यातील मस्साजोग व कोरेगाव परिसरातील नदी, नाल्यांना पूर आल्याने नदीपात्रातील पाण्यात वाढ झाली. धारूर तालुक्यातील अरणवाडी साठवण तलाव भरला असून, या तलावाला धोका निर्माण झाला आहे. आष्टी तालुक्यातील जवळपास मेहकरी प्रकल्पावगळता सर्वच धरणे भरली आहेत. गेवराई तालुक्यातील सर्वाधिक अतिवृष्टीची नोंद झाली आहे. येथे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आष्टी तालुक्यातही अनेक गावांचा नद्यांना आलेल्या पुरामुळे संपर्क तुटला आहे.