शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

९७ दिवसांत पावसाची जोरदार बॅटिंग, बीड जिल्ह्यात सरासरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:38 IST

बीड : जिल्ह्यात ३० व ३१ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने चिंता मिटविली असून, ९७ दिवसांत ...

बीड : जिल्ह्यात ३० व ३१ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने चिंता मिटविली असून, ९७ दिवसांत जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मोसमातील पुढील २५ दिवसांत होणारे संभाव्य पाऊसप्रमाण बोनस ठरणार आहे. बीड जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५६६.१ मिमी इतके आहे. जून ते ५ सप्टेंबरपर्यंत ९७ दिवसांत ६५४ मिमी पाऊस नोंदला आहे. पावसाळ्याचे आणखी २५ दिवस, तसेच ऑक्टाेबरमधील परतीच्या पावसाचा अनुभव पाहता, पाण्याच्या बाबतीत समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, ३० व ३१ ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या मुसळधारेने पिकांचे कमालीचे नुकसान केले आहे.

२४ तासांत पाऊस कुठे किती

५ सप्टेंबर रोजी मागील २४ तासांत जिल्ह्यात एकूण ६९.६ मिमी पावसाची नोंद झाली. बीड तालुक्यात ७७.७ मिमी, पाटोदा ८४.९, आष्टी ७८.३, गेवराई १२९.४, माजलगाव १०.९, अंबेजोगाई ६७.४, केज ५९.८, परळी ४.१, धारूर १६.८, वडवणी २२.४ आणि शिरुर तालुक्यात १३८ मिमी पाऊस नोंदला.

३३ मंडळात अतिवृष्टीची नोंद

बीड तालुक्यात बीड मंडळात ८०.३ मिमी, पाली ९४, म्हाळस जवळा ८२, नाळवंडी ८५, राजुरी नवगण ११०, पिंपळनेर ७५, पेंडगाव ८९.५ आणि नेकनूर मंडळात ९० मिमी पाऊस झाला. पाटोदा तालुक्यातील थेरला मंडळात ९४, तर अंमळनेरमध्ये १४५ मिमी पाऊस नोंदला आहे. आष्टी तालुक्यातील आष्टी मंडळात ६८, कडा १२१.५, दौला वडगाव ७०, धामणगाव ११२ मिमी आणि पिंपळा मंडळात ७५ मिमी पाऊस झाला.

अंबेजोगाई तालुक्यात पाटोदा ममदापूर मंडळात ८८ आणि बर्दापूर मंडळात ११७.८ मिमी पाऊस नोंदला. केज तालुक्यात केज मंडळात ७७.५, विडा ७३.८, नांदुरघाट मंडळात १०८ मिमी पाऊस झाला. शिरुर कासार तालुक्यात शिरुर मंडळात ९८, रायमोहा येथे १५९ तर तिंतरवणी मंडळात १५५ मिमी पाऊस नोंदला आहे.

गेवराई तालुक्यात सर्व दहा मंडळांत अतिवृष्टी

४ सप्टेंबर रोजी गेवराई तालुक्यातील सर्व दहा मंडळांत अतिवृष्टीची नोंद झली. गेवराई मंडळात १२३, मादळमोही १७९, जातेगाव १२१.८, पाचेगाव १०५, धोंडराई ७८.८, उमापूर १३४.८, चकलांबा १४९.३, सिरसदेवी ११४, रेवकी १३८ आणि तलवाडा मंडळात १४९ मिमी पाऊस नोंदला आहे.

----