शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

९७ दिवसांत पावसाची जोरदार बॅटिंग, बीड जिल्ह्यात सरासरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:38 IST

बीड : जिल्ह्यात ३० व ३१ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने चिंता मिटविली असून, ९७ दिवसांत ...

बीड : जिल्ह्यात ३० व ३१ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने चिंता मिटविली असून, ९७ दिवसांत जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मोसमातील पुढील २५ दिवसांत होणारे संभाव्य पाऊसप्रमाण बोनस ठरणार आहे. बीड जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५६६.१ मिमी इतके आहे. जून ते ५ सप्टेंबरपर्यंत ९७ दिवसांत ६५४ मिमी पाऊस नोंदला आहे. पावसाळ्याचे आणखी २५ दिवस, तसेच ऑक्टाेबरमधील परतीच्या पावसाचा अनुभव पाहता, पाण्याच्या बाबतीत समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, ३० व ३१ ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या मुसळधारेने पिकांचे कमालीचे नुकसान केले आहे.

२४ तासांत पाऊस कुठे किती

५ सप्टेंबर रोजी मागील २४ तासांत जिल्ह्यात एकूण ६९.६ मिमी पावसाची नोंद झाली. बीड तालुक्यात ७७.७ मिमी, पाटोदा ८४.९, आष्टी ७८.३, गेवराई १२९.४, माजलगाव १०.९, अंबेजोगाई ६७.४, केज ५९.८, परळी ४.१, धारूर १६.८, वडवणी २२.४ आणि शिरुर तालुक्यात १३८ मिमी पाऊस नोंदला.

३३ मंडळात अतिवृष्टीची नोंद

बीड तालुक्यात बीड मंडळात ८०.३ मिमी, पाली ९४, म्हाळस जवळा ८२, नाळवंडी ८५, राजुरी नवगण ११०, पिंपळनेर ७५, पेंडगाव ८९.५ आणि नेकनूर मंडळात ९० मिमी पाऊस झाला. पाटोदा तालुक्यातील थेरला मंडळात ९४, तर अंमळनेरमध्ये १४५ मिमी पाऊस नोंदला आहे. आष्टी तालुक्यातील आष्टी मंडळात ६८, कडा १२१.५, दौला वडगाव ७०, धामणगाव ११२ मिमी आणि पिंपळा मंडळात ७५ मिमी पाऊस झाला.

अंबेजोगाई तालुक्यात पाटोदा ममदापूर मंडळात ८८ आणि बर्दापूर मंडळात ११७.८ मिमी पाऊस नोंदला. केज तालुक्यात केज मंडळात ७७.५, विडा ७३.८, नांदुरघाट मंडळात १०८ मिमी पाऊस झाला. शिरुर कासार तालुक्यात शिरुर मंडळात ९८, रायमोहा येथे १५९ तर तिंतरवणी मंडळात १५५ मिमी पाऊस नोंदला आहे.

गेवराई तालुक्यात सर्व दहा मंडळांत अतिवृष्टी

४ सप्टेंबर रोजी गेवराई तालुक्यातील सर्व दहा मंडळांत अतिवृष्टीची नोंद झली. गेवराई मंडळात १२३, मादळमोही १७९, जातेगाव १२१.८, पाचेगाव १०५, धोंडराई ७८.८, उमापूर १३४.८, चकलांबा १४९.३, सिरसदेवी ११४, रेवकी १३८ आणि तलवाडा मंडळात १४९ मिमी पाऊस नोंदला आहे.

----