शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

अतिवृष्टी ; यंत्रणा हाय अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:40 IST

बीड : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टी सुरूच आहे. यामुळे नदी, ओढे, प्रकल्प, तलाव, धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. असाच ...

बीड : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टी सुरूच आहे. यामुळे नदी, ओढे, प्रकल्प, तलाव, धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. असाच पाऊस झाला तर, महापूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याची यंत्रणा सतर्क झाली असून सर्वांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मदतीसाठी गाव, तालुका पातळीवर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन केल्या आहेत. नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले माजलगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच उर्ध्व कुंडलिका, बिंदुसरा ही धरणेही ओसंडून वाहत आहेत. गावातील तलाव, नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थतीत मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती विभाग सतर्क आहे. तालुकास्तरावरील सर्वच अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देऊन गावपातळीवरील यंत्रणाही सक्षम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्यासह काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गोदाकाठच्या ६३ गावांना नोटीस

साधारण १५ वर्षांपूर्वी नगर, नाशिक जिल्ह्यात पाऊस झाल्याने गोदावरी नदीला पूर आला होता. तेव्हा गेवराई, माजलगाव व परळी तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना धोका पोहचला होता. याचेच सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाने केले असता तब्बल ६३ गावांची यादी समोर आली आहे. या सर्वांना नोटीस बजावून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच स्थलांतराबाबतही आदेश दिल्याचे सांगण्यात आले.

वेळप्रसंगी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण

अद्याप जिल्ह्यातील स्थिती शांत आहे. परंतु २०१६ सारखी पूरस्थिती निर्माण झाल्यास शासनाला पत्र पाठवून एनडीआरएफ पथकाला बोलावले जाणार आहे. सध्या जिल्ह्यात एकाही ठिकाणी पूरस्थितीजन्य परिस्थितीचा अहवाल आपत्ती विभागाकडे आलेला नाही.

ग्रामसेवकांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मदतीला

तीन दिवसांपासून पाऊस होत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. या स्थितीत मदत करण्यासाठी गावातील ग्रामसेवकांपासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गावातील लोकांनी अडचण असल्यास ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार अथवा पोलिसांना संपर्क साधावा. त्यांनी मदत न केल्यास २२२६०४ या क्रमांकावर संपर्क साधावा. नियंत्रण कक्षात २४ तास यंत्रणा सतर्क राहून मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे.

--

गोदाकाठच्या ६३ गावांना नोटीस बजावल्या आहेत. तसेच चार दिवसांपूर्वीच सर्वच यंत्रणेला हाय अलर्ट केले आहे. अडचणीत मदतीसाठी गावपातळीपासून ते जिल्ह्यापर्यंत नियंत्रण कक्ष तयार केले आहेत. ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार यांच्यासह २२२६०४ हा क्रमांक नियंत्रण कक्षात २४ तास मदतीसाठी सेवेत आहे.

उमेश शिरके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बीड