शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अतिवृष्टी ; यंत्रणा हाय अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:40 IST

बीड : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टी सुरूच आहे. यामुळे नदी, ओढे, प्रकल्प, तलाव, धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. असाच ...

बीड : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टी सुरूच आहे. यामुळे नदी, ओढे, प्रकल्प, तलाव, धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. असाच पाऊस झाला तर, महापूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याची यंत्रणा सतर्क झाली असून सर्वांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मदतीसाठी गाव, तालुका पातळीवर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन केल्या आहेत. नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले माजलगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच उर्ध्व कुंडलिका, बिंदुसरा ही धरणेही ओसंडून वाहत आहेत. गावातील तलाव, नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थतीत मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती विभाग सतर्क आहे. तालुकास्तरावरील सर्वच अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देऊन गावपातळीवरील यंत्रणाही सक्षम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्यासह काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गोदाकाठच्या ६३ गावांना नोटीस

साधारण १५ वर्षांपूर्वी नगर, नाशिक जिल्ह्यात पाऊस झाल्याने गोदावरी नदीला पूर आला होता. तेव्हा गेवराई, माजलगाव व परळी तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना धोका पोहचला होता. याचेच सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाने केले असता तब्बल ६३ गावांची यादी समोर आली आहे. या सर्वांना नोटीस बजावून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच स्थलांतराबाबतही आदेश दिल्याचे सांगण्यात आले.

वेळप्रसंगी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण

अद्याप जिल्ह्यातील स्थिती शांत आहे. परंतु २०१६ सारखी पूरस्थिती निर्माण झाल्यास शासनाला पत्र पाठवून एनडीआरएफ पथकाला बोलावले जाणार आहे. सध्या जिल्ह्यात एकाही ठिकाणी पूरस्थितीजन्य परिस्थितीचा अहवाल आपत्ती विभागाकडे आलेला नाही.

ग्रामसेवकांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मदतीला

तीन दिवसांपासून पाऊस होत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. या स्थितीत मदत करण्यासाठी गावातील ग्रामसेवकांपासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गावातील लोकांनी अडचण असल्यास ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार अथवा पोलिसांना संपर्क साधावा. त्यांनी मदत न केल्यास २२२६०४ या क्रमांकावर संपर्क साधावा. नियंत्रण कक्षात २४ तास यंत्रणा सतर्क राहून मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे.

--

गोदाकाठच्या ६३ गावांना नोटीस बजावल्या आहेत. तसेच चार दिवसांपूर्वीच सर्वच यंत्रणेला हाय अलर्ट केले आहे. अडचणीत मदतीसाठी गावपातळीपासून ते जिल्ह्यापर्यंत नियंत्रण कक्ष तयार केले आहेत. ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार यांच्यासह २२२६०४ हा क्रमांक नियंत्रण कक्षात २४ तास मदतीसाठी सेवेत आहे.

उमेश शिरके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बीड