शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

पोदार जम्बो किड्समध्ये आरोग्य जनजागृती शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:26 IST

भारत सरकारने सुरु केलेल्या फिट इंडिया अभियानात सहभागी होत अंबाजोगाई येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि पोदार जम्बो किड्स येथे ...

भारत सरकारने सुरु केलेल्या फिट इंडिया अभियानात सहभागी होत अंबाजोगाई येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि पोदार जम्बो किड्स येथे महाराष्ट्र सरकारच्या कोविड 19 च्या काळात घ्यावयाच्या खबरदारीच्या सर्व नियमांचे पालन करीत पालक आणि शिक्षकांसाठी ''''फिट इंडिया सप्ताह'''' साजरा केला. या सप्ताहात आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शिबिराचे आयोजन केले गेले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शाळेच्या समन्वयिका डॉ. रेणू झिरमिरे-कुदळे यांनी केले. यावेळी डॉ. अनघा पाठक यांनी ''''संतुलित आहार आणि वेट लॉस'''' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “फिटनेस म्हणजे शरीररचना, लवचिकता, चिवटपणा, सामर्थ्य आणि तग धरून ठेवण्याची क्षमता यांचा उत्तम समतोल होय. पारंपारिक, षड्रसात्मक, आपल्या भौगोलिक परिसरात उत्पादित होणारे अन्न हेच आपल्या शरीरासाठी उत्तम असते.आपण आपल्या प्रकृतीनुसार आहाराचे सेवन करावे. विरुध्द अन्न, कोल्ड्रिंक्स, जंक फूड यांचे सेवन टाळावे. व्यायाम करताना आनंद घेऊन करणे आणि त्यात सातत्य ठेवणे आवश्यक असते. याने दिवसभर उत्साह वाटतो आणि थकवा येत नाही.” याचबरोबर जेवणात मीठ आणि साखरेचे प्रमाण नगण्य ठेवल्यास शरीर निरोगी काटक राहण्यास मदत होते असेही त्या यावेळी म्हणाल्या. ''''मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी जीवन'''' या विषयावर डॉ. शुभदा लोहिया यांनी पालकांशी संवाद साधताना दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत त्यांचे आजवरचे त्यांचे पेशंटसोबत आलेले काही अनुभवही कथन केले. त्या म्हणाल्या, “चिंता, स्पर्धा, भीती, कमी वयातल्या वाढत्या अपेक्षा, इत्यादी गोष्टी आपले मानसिक आरोग्य बिघडवतात. आपल्या कामाबद्दल प्रतिष्ठा वाटणे, चांगल्या कामाचे कौतुक करणे/करवून घेणे, छंद जोपासणे, स्वतःसाठी वेळ काढणे अशा मनाला आनंद देणाऱ्या आल्हाददायक गोष्टी करण्याने मनाला प्रसन्न वाटते. जेणेकरून आपण काही काळासाठी का होईना दैनंदिन ताण तणाव कमी करू शकतो मानसिकरीत्या सुदृढ राहतो. पालकांनी स्वतःमध्ये रुजलेली ''''स्पर्धा'''' मुलांमध्ये रुजवू नये. जेणेकरून बालपण केवळ आनंदीच राहील.” तसेच आपला आहार ज्याप्रमाणे शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करतो तसेच आपले विचार मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतात असेही त्या म्हणाल्या. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती ही तिच्या आहार आणि विचारांचे प्रतिरूप असते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य अजय इंगळे सर, मुख्याध्यापिका ज्योती स्वामी, प्रशासकीय अधिकारी साईनाथ लुटे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-र्यांचे सहकार्य लाभले.