शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पोदार जम्बो किड्समध्ये आरोग्य जनजागृती शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:26 IST

भारत सरकारने सुरु केलेल्या फिट इंडिया अभियानात सहभागी होत अंबाजोगाई येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि पोदार जम्बो किड्स येथे ...

भारत सरकारने सुरु केलेल्या फिट इंडिया अभियानात सहभागी होत अंबाजोगाई येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि पोदार जम्बो किड्स येथे महाराष्ट्र सरकारच्या कोविड 19 च्या काळात घ्यावयाच्या खबरदारीच्या सर्व नियमांचे पालन करीत पालक आणि शिक्षकांसाठी ''''फिट इंडिया सप्ताह'''' साजरा केला. या सप्ताहात आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शिबिराचे आयोजन केले गेले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शाळेच्या समन्वयिका डॉ. रेणू झिरमिरे-कुदळे यांनी केले. यावेळी डॉ. अनघा पाठक यांनी ''''संतुलित आहार आणि वेट लॉस'''' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “फिटनेस म्हणजे शरीररचना, लवचिकता, चिवटपणा, सामर्थ्य आणि तग धरून ठेवण्याची क्षमता यांचा उत्तम समतोल होय. पारंपारिक, षड्रसात्मक, आपल्या भौगोलिक परिसरात उत्पादित होणारे अन्न हेच आपल्या शरीरासाठी उत्तम असते.आपण आपल्या प्रकृतीनुसार आहाराचे सेवन करावे. विरुध्द अन्न, कोल्ड्रिंक्स, जंक फूड यांचे सेवन टाळावे. व्यायाम करताना आनंद घेऊन करणे आणि त्यात सातत्य ठेवणे आवश्यक असते. याने दिवसभर उत्साह वाटतो आणि थकवा येत नाही.” याचबरोबर जेवणात मीठ आणि साखरेचे प्रमाण नगण्य ठेवल्यास शरीर निरोगी काटक राहण्यास मदत होते असेही त्या यावेळी म्हणाल्या. ''''मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी जीवन'''' या विषयावर डॉ. शुभदा लोहिया यांनी पालकांशी संवाद साधताना दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत त्यांचे आजवरचे त्यांचे पेशंटसोबत आलेले काही अनुभवही कथन केले. त्या म्हणाल्या, “चिंता, स्पर्धा, भीती, कमी वयातल्या वाढत्या अपेक्षा, इत्यादी गोष्टी आपले मानसिक आरोग्य बिघडवतात. आपल्या कामाबद्दल प्रतिष्ठा वाटणे, चांगल्या कामाचे कौतुक करणे/करवून घेणे, छंद जोपासणे, स्वतःसाठी वेळ काढणे अशा मनाला आनंद देणाऱ्या आल्हाददायक गोष्टी करण्याने मनाला प्रसन्न वाटते. जेणेकरून आपण काही काळासाठी का होईना दैनंदिन ताण तणाव कमी करू शकतो मानसिकरीत्या सुदृढ राहतो. पालकांनी स्वतःमध्ये रुजलेली ''''स्पर्धा'''' मुलांमध्ये रुजवू नये. जेणेकरून बालपण केवळ आनंदीच राहील.” तसेच आपला आहार ज्याप्रमाणे शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करतो तसेच आपले विचार मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतात असेही त्या म्हणाल्या. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती ही तिच्या आहार आणि विचारांचे प्रतिरूप असते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य अजय इंगळे सर, मुख्याध्यापिका ज्योती स्वामी, प्रशासकीय अधिकारी साईनाथ लुटे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-र्यांचे सहकार्य लाभले.