शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

या १३३ फरार आरोपींना आपण पाहिलंत का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:41 IST

बीड: विविध गुन्ह्यात वर्षानुवर्षे पोलिसांना सापडत नसलेल्या आरोपींना न्यायालयाकडून फरार घोषित केले जाते. जिल्ह्यात आठ महिन्यांत ३२ जणांना पकडण्यात ...

बीड: विविध गुन्ह्यात वर्षानुवर्षे पोलिसांना सापडत नसलेल्या आरोपींना न्यायालयाकडून फरार घोषित केले जाते. जिल्ह्यात आठ महिन्यांत ३२ जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून फरार आरोपींची संख्या १३३ इतकी आहे.

गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपींच्या अटकेची कारवाई केली जाते;मात्र आरोपी मिळून न आल्यास त्यांना फरार घोषित केले जाते. त्यासाठी न्यायालयामार्फत जाहीरनामा काढला जातो, त्याद्वारे त्यास फरार असल्याचे जाहीर केले जाते. दरम्यान, जिल्ह्यात १३३ आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांना पकडण्याचे आव्हान जिल्हा पोलीस यंत्रणेसमोर आहे.

...

तीस वर्षांपासून आरोपी सापडेना

न्यायालयाने फरार घोषित केलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांमार्फत तपास केला जातो. यात काही आरोपी ३० वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यांतील आरोपींचाही समावेश आहे. चोरी, दरोडे, लुटमार, खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांतील आरोपी वर्षानुवर्षे फरार आहेत. आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेने मोहिमा देखील राबविल्या आहेत.

....

मृत्यूनंतरही तपास सुरुच

पोलिसांच्या अभिलेख्यावर फरार असलेेले काही आरोपी मयत झाले तरी त्यांना शोधून काढण्यात यश आले नाही; मात्र जोपर्यंत त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत ते पोलीस दप्तरी फरारच असतात. पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवून ३२ जणांना पकडले होते.

....

उपविभागनिहाय फरारी

....

फरार आराेपींच्या शोधासाठी ठाणे स्तरावरुन तसेच गुन्हे शाखेकडून वेळोवेळी प्रयत्न सुरु असतात. याशिवाय कोम्बिंग, ऑल आऊट ऑपरेशनद्वारेही आरोपींची शोधमोहीम राबविली जाते. पोलीस ठाण्यात फरार आरोपींचे फ्लेक्स लावले असून त्यावर त्यांची नावे देऊन नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

- सतीश वाघ,पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड

......