शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा हैदोस,शेतकऱ्यांची पिके नष्ट होण्याच्या मार्गावर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:33 IST

एकीकडे निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडासमोर आलेला घास हिरावला जात आहे. तर दुसरीकडे शेतातील उभे पीक वन्य प्राणी फस्त करू ...

एकीकडे निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडासमोर आलेला घास हिरावला जात आहे. तर दुसरीकडे शेतातील उभे पीक वन्य प्राणी फस्त करू लागले आहेत. अशा आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला. यामुळे रब्बीच्या पेरण्या धडाक्यात झाल्या. सध्या शेतात गहू, ज्वारी, हरभरा, करडई, ऊस, ही पिके मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तर या पिकांना आता विविध संकटांबरोबरच वन्य प्राण्यांनीही ग्रासले आहे. रानडुकरे, हरीण यांचे मोठे कळप शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरू लागले आहेत. हरणाच्या कळपांनी तर तालुक्यात ठिकठिकाणी गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात फस्त केले आहे. तर रानडुकरांचा मोठा उपद्रव ऊस, ज्वारी, या पिकांना होऊ लागला आहे. तालुक्यात रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. रानडुकरांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना परवडणारे मोठे पीक बटाटा, हळद, अद्रक, भुईमूग, ही पिके घेण्याचे टाळले जात आहे. जर एकदा रानडुकरांनी या पिकांमध्ये शिरकाव केला तर त्या शेताची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे उत्पादन मिळणारी पिके टाळण्याची वेळ रानडुकरांमुळे आली आहे.

रानडुकरांची भीती

तालुक्यात आजतागायत रानडुकरांच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महिनाभरापूर्वी कुरणवाडी येथे एक महिलेवर रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात त्या महिलेला ८० टाके घ्यावे लागले. अशा अनेक अपघाती घटना वारंवार घडू लागल्या आहेत. रानडुकरांच्या भीतीमुळे शेतात थांबणे अथवा एकटे शेतात जाणे यासाठीही शेतकरी धजावत नाहीत.

प्रशासकीय यंत्रणा उदासीन

वन्यप्राण्यांकडून शेतकरी व शेतमजुरांवर होणाऱ्या अचानक हल्ल्यांमुळे या रानडुकरांबाबत मोठी भीती निर्माण झाली आहे. रानडुक्कर अथवा हरीण यांच्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळविण्यासाठी मोठी कसरत शासन दरबारी करावी लागते. तसेच या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग अथवा प्रशासनही म्हणावी तशी दखल घेत नसल्याने आता शेतकऱ्यांना या नवीन संकटांना सामोरे जावे लागत आहे.