शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

वन्यप्राण्यांचा हैदोस,शेतकऱ्यांची पिके नष्ट होण्याच्या मार्गावर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:33 IST

एकीकडे निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडासमोर आलेला घास हिरावला जात आहे. तर दुसरीकडे शेतातील उभे पीक वन्य प्राणी फस्त करू ...

एकीकडे निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडासमोर आलेला घास हिरावला जात आहे. तर दुसरीकडे शेतातील उभे पीक वन्य प्राणी फस्त करू लागले आहेत. अशा आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला. यामुळे रब्बीच्या पेरण्या धडाक्यात झाल्या. सध्या शेतात गहू, ज्वारी, हरभरा, करडई, ऊस, ही पिके मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तर या पिकांना आता विविध संकटांबरोबरच वन्य प्राण्यांनीही ग्रासले आहे. रानडुकरे, हरीण यांचे मोठे कळप शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरू लागले आहेत. हरणाच्या कळपांनी तर तालुक्यात ठिकठिकाणी गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात फस्त केले आहे. तर रानडुकरांचा मोठा उपद्रव ऊस, ज्वारी, या पिकांना होऊ लागला आहे. तालुक्यात रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. रानडुकरांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना परवडणारे मोठे पीक बटाटा, हळद, अद्रक, भुईमूग, ही पिके घेण्याचे टाळले जात आहे. जर एकदा रानडुकरांनी या पिकांमध्ये शिरकाव केला तर त्या शेताची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे उत्पादन मिळणारी पिके टाळण्याची वेळ रानडुकरांमुळे आली आहे.

रानडुकरांची भीती

तालुक्यात आजतागायत रानडुकरांच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महिनाभरापूर्वी कुरणवाडी येथे एक महिलेवर रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात त्या महिलेला ८० टाके घ्यावे लागले. अशा अनेक अपघाती घटना वारंवार घडू लागल्या आहेत. रानडुकरांच्या भीतीमुळे शेतात थांबणे अथवा एकटे शेतात जाणे यासाठीही शेतकरी धजावत नाहीत.

प्रशासकीय यंत्रणा उदासीन

वन्यप्राण्यांकडून शेतकरी व शेतमजुरांवर होणाऱ्या अचानक हल्ल्यांमुळे या रानडुकरांबाबत मोठी भीती निर्माण झाली आहे. रानडुक्कर अथवा हरीण यांच्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळविण्यासाठी मोठी कसरत शासन दरबारी करावी लागते. तसेच या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग अथवा प्रशासनही म्हणावी तशी दखल घेत नसल्याने आता शेतकऱ्यांना या नवीन संकटांना सामोरे जावे लागत आहे.