शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शेतीशाळेत हरभरा पिकावर मार्गदर्शन - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:22 IST

जिल्हा कृषी अधीक्षक व आत्मा प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी माजलगाव मडके, तालुका कृषी अधिकारी ...

जिल्हा कृषी अधीक्षक व आत्मा प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी माजलगाव मडके, तालुका कृषी अधिकारी एस. डी. शिनगारे, प्रकल्प सहाय्यक अतिश चाटे व समन्वयक रामेश्वर चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली शेती शाळेचे आयोजन केले होते. यावेळी मागील पाच शेती शाळेमध्ये घेतलेल्या तंत्रज्ञानावर चर्चा करण्यात आली. प्रशिक्षक अमोल राठोड बोलताना म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी शेती शाळेतील तंत्रज्ञानाचा अवलंब केला, त्यांना कमी खर्च लागला आहे. बीजप्रक्रिया करणे, पक्षी थांबे उभारणे, योग्यवेळी शेंडे खुडणे, पिवळे व निळे चिकट सापळे लावणे,कामगंध सापळे लावणे, ५ टक्के निंबोळी अर्क फवारणे, बरेच शेतकऱ्यांनी या गोष्टीचा अवलंब केला त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये पीक हातात आले. तसेच अनावश्यक फवारणीचा खर्चही टळले. पुढील हंगामातही शेतकऱ्यांनी याच तंत्राचा अवलंब करण्याचे आवाहन राठोड यांनी केले. यावेळी काही शेतकऱ्यांनी आपले मनोगत मांडले. ५ टक्के निंबोळी अर्क घरीच बनवून फवारल्याने माझा रासायनिक फवारणीचा खर्च कमी झाला, असा अनुभव व्यंकटेश देशमुख या प्रगतशील तरुण शेतकऱ्याने सांगितला. यावेळी कृषी सहाय्यक स्वामी,समूह सहाय्यक महादेव कणसे, सरपंच सूर्यकांत साळुंके, व जीवराज देशमुख, अशोक देशमुख, रमेश काचगुंडे, मोबीन शेख, अशोक काळे, अश्रुबा काजगुंडे व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.